औरंगाबाद: पुणे बोर्डाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावीची परीक्षेत इंग्रजी विषयाच्या पहिल्याच पेपरमध्ये शेवटचा पोएट्रीचा प्रश्न देण्याऐवजी उत्तरपत्रिका तपासणाऱ्याला दिलेल्या सूचना छापल्या गेल्या होत्या.
त्यासंदर्भात आता पुणे बोर्डाने विद्यार्थ्यांना गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाच्या सचिवा अनुराधा ओक यांनी त्यासंबंधीचे आदेश काढले आहेत. प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला असल्यास किंवा त्या प्रश्नावरील तीन प्रश्न सोडवलेल्या विद्यार्थ्यांनाच सहा गुण दिले जाणार आहेत. त्या प्रश्नाची उत्तरे चुकीची जरी लिहिली असल्यास तरीदेखील गुण मिळणार आहेत.
या आहे आदेशातील ठळक बाबी…
पोएट्री सेक्शन-२, पोएट्री किंवा सेक्शन-२ असा केवळ उत्तरपत्रिकेत उल्लेख केला असल्यास तरीदेखील मिळणार ६ गुण
पोएट्री सेक्शन-२ मधील अन्य कोणतेही प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला असल्यास मिळतील गुण
त्रुटी असलेल्या प्रश्नांचे क्रमांक ए-३, ए-४ आणि ए-५ असे केवळ उत्तरपत्रिकेत नमूद केले असल्यास त्या विद्यार्थ्याने सोडविण्याचा प्रयत्न केल्याचे ग्राह्य धरून सहा गुण दिले जाणार आहेत.
शिरूर (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरील कारेगाव (ता. शिरूर) येथील जयश्री फर्निचरच्या बाजूला असलेल्या लॉजिंगमध्ये सुरू…
शिरूर : शिरूर तालुक्यातील करडे घाटात दोन गुन्हेगार गटांच्या वादातून झालेल्या गोळीबारात विशाल सुनील काळे…
मुंबई: राज्याच्या सांस्कृतिक चळवळीला दिशा देणाऱ्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातील संचालकपद गेल्या दीड महिन्यांपासून रिक्त असल्याने…
पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…
मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…