महाराष्ट्र

12 वीत इंग्रजीच्या ‘त्या’ चुकीच्या प्रश्नासाठी फक्त ‘या’ विद्यार्थ्यालाच मिळतील ६ गुण…

औरंगाबाद: पुणे बोर्डाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावीची परीक्षेत इंग्रजी विषयाच्या पहिल्याच पेपरमध्ये शेवटचा पोएट्रीचा प्रश्न देण्याऐवजी उत्तरपत्रिका तपासणाऱ्याला दिलेल्या सूचना छापल्या गेल्या होत्या.

त्यासंदर्भात आता पुणे बोर्डाने विद्यार्थ्यांना गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाच्या सचिवा अनुराधा ओक यांनी त्यासंबंधीचे आदेश काढले आहेत. प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला असल्यास किंवा त्या प्रश्नावरील तीन प्रश्न सोडवलेल्या विद्यार्थ्यांनाच सहा गुण दिले जाणार आहेत. त्या प्रश्नाची उत्तरे चुकीची जरी लिहिली असल्यास तरीदेखील गुण मिळणार आहेत.

या आहे आदेशातील ठळक बाबी…

पोएट्री सेक्शन-२, पोएट्री किंवा सेक्शन-२ असा केवळ उत्तरपत्रिकेत उल्लेख केला असल्यास तरीदेखील मिळणार ६ गुण

पोएट्री सेक्शन-२ मधील अन्य कोणतेही प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला असल्यास मिळतील गुण

त्रुटी असलेल्या प्रश्नांचे क्रमांक ए-३, ए-४ आणि ए-५ असे केवळ उत्तरपत्रिकेत नमूद केले असल्यास त्या विद्यार्थ्याने सोडविण्याचा प्रयत्न केल्याचे ग्राह्य धरून सहा गुण दिले जाणार आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

12 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

12 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

12 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

12 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

14 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

14 तास ago