मुंबई: ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपर्यंत आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सुरू असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात 1,500 रुपये जमा केले जातात.
दरम्यान, या योजनेचा लाभ घेणाऱ्या काही महिलांसाठी ई-केवायसी (e-KYC) बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, काही महिलांनी केवायसी न केल्यामुळे, तर काहींनी केवायसीमध्ये चुका झाल्यामुळे योजनेचा हाप्ता बंद झाला होता.यावरून आनंदाची बातमी अशी आहे की, महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केले की, ज्या लाभार्थी महिलांनी ई-केवायसीमध्ये चुका केल्यामुळे हाप्ता बंद झाला आहे, त्यांना आता दुरुस्ती करण्याची संधी मिळणार आहे.
आदिती तटकरे म्हणाल्या “e-KYC प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडल्यामुळे योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी आल्या आहेत. ज्या पात्र लाभार्थ्यांनी e-KYC करूनही योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशा सर्व बहिणींना आता ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून 31 मार्च 2026 पर्यंत e-KYC दुरुस्ती करण्याची संधी देण्यात आली आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा हीच महिला व बालविकास विभागाची प्रामाणिक भूमिका आहे.”लाभार्थी महिलांनी ही संधी गमावू नये आणि आपली e-KYC माहिती वेळेत दुरुस्त करावी.
राजगुरूनगर: राजगुरुनगर शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा, मावा, सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम…
मुंबई: मुंबई उपनगरातील घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप परिसरातील डोंगराळ भागांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात घडणाऱ्या दरड कोसळण्याच्या घटनांमुळे…
मुंबई: राज्यातील तंत्रशिक्षण क्षेत्रात प्रशासन अधिक पारदर्शक, कार्यक्षम, उत्तरदायी आणि डेटा-आधारित करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट गावात सामाईक वापरातील इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील न्हावरे-निर्वी अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण कार अपघातात एका महिलेचा मृत्यू…
चणे हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे. रोज भाजलेले हरभऱ्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक आरोग्य समस्यांपासून…