मुंबई: गोरेगाव येथील फिल्मसिटी परिसरात प्राइम फोकसच्या जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक स्टुडिओच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारताला सर्जनशील अर्थव्यवस्थेचे (क्रिएटर इकॉनॉमी) जागतिक केंद्र बनविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि दर्जेदार पायाभूत सुविधा आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, ‘वेव्ह्स 2025’ परिषदेदरम्यान झालेल्या सामंजस्य करारानंतर अवघ्या एका वर्षात या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. भारतीय संस्कृती, इतिहास आणि परंपरेतील प्रेरणादायी कथा जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी हा स्टुडिओ महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याच स्टुडिओमध्ये जगातील सर्वात मोठ्या चित्रपट सहनिर्मिती प्रकल्पांपैकी एक असलेल्या ‘रामायण’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असल्याचा उल्लेख करत त्यांनी संपूर्ण चित्रपट चमूचे अभिनंदन केले. तसेच फिल्मसिटीचा जागतिक दर्जाच्या सर्जनशील आणि मनोरंजन केंद्र म्हणून पुनर्विकास लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, केंद्रीय माहिती व प्रसारण विभागाचे सचिव चंचल कुमार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, प्राइम फोकसचे नमित मल्होत्रा तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी संस्कृती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी संगम या प्रकल्पातून साकार झाल्याचे सांगितले. तर प्राइम फोकसचे नमित मल्होत्रा यांनी राज्य शासनाच्या सहकार्यामुळे मुंबईत जागतिक दर्जाचे सर्जनशील सामग्री निर्मिती केंद्र उभारणे शक्य झाल्याचे सांगत दुसरा टप्पाही लवकर पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला.
दक्षिण रत्नागिरीतील भाजप संघटनेचे शिल्पकार हरपले; गुरुवारी मूळ गावी अंत्यसंस्कार मुंबई: राजेश सावंत यांच्या निधनाने…
पवित्र पोर्टलवरून गुणवत्ताधारित प्रक्रिया; १.७० लाख उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि…
न्हावरे (तेजस फडके): मांडवगण फराटा (ता. शिरुर) दारु पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन ७२…
प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर मुंढे यांची भूमिका; "एफडीएची लॅब ही २४ तास कार्यरत आणीबाणीची सेवा" मुंबई…
मुंबई: मुंबईतील केंद्र सरकारच्या अखत्यारीतील जमिनींवरील रखडलेले पुनर्विकास प्रकल्प, मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनी, रेल्वेच्या जागा,…
नवी दिल्ली: शेण आणि इतर जैविक कचऱ्यापासून आता शेतकरी आणि ग्रामीण उद्योजकांना मोठे उत्पन्न मिळवण्याची…