महाराष्ट्र

प्रो बैलगाडा लीग लवकरच; महाराष्ट्राच्या वारशाचे जागतिकीकरण करण्याचा शासनाचा संकल्प

शेतकऱ्यांचा सन्मान, संस्कृतीचे संवर्धन आणि परंपरेला आधुनिकता देणे हेच आमचे ध्येय आहे

मुंबई: “बैलगाडा शर्यत ही महाराष्ट्राचा गौरवशाली वारसा आहे. ही परंपरा जगभर पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. यासाठी पुढील कालावधीमध्ये प्रो बैलगाडा लीग सुरू करण्यात येईल. शेतकऱ्यांचा सन्मान, संस्कृतीचे संवर्धन आणि परंपरेला आधुनिकता देणे हेच आमचे ध्येय आहे.” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यत 2025 च्या बक्षीस वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी विविध स्पर्धांतील विजेत्यांना गौरवण्यात आले. परिसरात हजारोंच्या संख्येने उपस्थित शेतकरी, रसिक आणि चाहत्यांची उत्स्फूर्त उपस्थिती पाहून महाराष्ट्राच्या बैलगाडा संस्कृतीची लोकप्रियता स्पष्ट होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी केले होते. जागतिक स्तरावर गिनीज रेकॉर्डची अपेक्षा शर्यतीला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले, गर्दीवरून सांगू शकतो ही शर्यत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होईल यात शंका नाही.” बैलजोड्यांची संख्या, चाहत्यांची उपस्थिती, रेकॉर्ड ब्रेकिंग सहभाग आणि थरारक स्पर्धा हाच या वर्षीचा श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यतीचे वैशिष्ट्य ठरले असे नमूद केले.

परंपरा, श्रद्धा आणि भविष्यातील योजना शर्यतींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रेरणा, रोजगार आणि आर्थिक पाठबळ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. “बैल हा शेतकऱ्याचा विश्वासू साथी आहे. बैलगाडा शर्यत म्हणजे मातीचा अभिमान. ती आपण जपलीच पाहिजे,” असे ते म्हणाले. त्यांनी पुढील काळात प्रो बैलगाडा लीग सुरू करण्याचा संकेत देत, योजनेच्या नेतृत्वाबाबत आयोजक चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या कार्यसंघाचे कौतुक केले.

शेतकरी कल्याण आणि शासन निर्णय संबंधित योजनांचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, गोमातेला राज्यमातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य. शेतकऱ्यांसाठी बांबू लागवड, मनरेगातून अनुदान आणि कृषी पायाभूत सुविधा यांसाठी अतिरिक्त प्रकल्प राबविण्यात येत आहेत.

बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातग्रस्त कुटुंबियांना ५ लाखांची आर्थिक मदत देण्याची घोषणाही त्यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज, सैनिकांचा गौरव आणि देशभक्ती या प्रसंगी त्यांनी भारतीय लष्करासाठी शिबिर व रक्तदान मोहिमांचे उल्लेख करत देशभक्तीचा संदेश दिला. “सीमेवरील जवानांची सेवा म्हणजे राष्ट्रसेवा. त्यांच्यासाठी महाराष्ट्र सदैव तयार आहे,” असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आणि बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांची आठवण करून दिली. “ही मालक-नोकरांची पक्ष संस्था नाही; हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच यावेळी बैलगाडा शर्यतीतील विजेत्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फोर्चूनर आणि थार गाड्यांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आचारसंहितेदरम्यान घेतलेल्या निर्णयांवर काँग्रेसचा सवाल; निवडणूक आयोगाने चौकशी करावी; अनंत गाडगीळ

मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…

1 तास ago

शेतकरी कर्जमाफी फसवी; सर्वपक्षीय बैठक बोलवा; विजय वडेट्टीवार

नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…

1 तास ago

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर समर्थ पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व; सर्व १४ जागांवर विजय

मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…

1 तास ago

जागतिक नेत्रदान दिनानिमित्त राज्यभर जनजागृती व नेत्र चिकित्सा शिबिरे; चंद्रकांत पाटील

मुंबई: "नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ…

1 तास ago

एनडीए बैठकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा २७ वा वर्धापन दिन ११ जूनला

षण्मुखानंद सभागृहात दुपारी २ वाजता होणार कार्यक्रम; संघटन विस्ताराला प्राधान्य मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०…

2 तास ago

भारतातील आर्थिक-राजकीय संकटे! वास्तव आणि परिणाम विषयावर काँग्रेसचे चर्चासत्र १३ जूनला

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थशास्त्र विभाग आणि ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस यांच्या संयुक्त…

2 तास ago