महाराष्ट्र

जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण…

मुंबई: मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे २९ ऑगस्टपासून मुंबईत आंदोलन होणार आहे. या पार्श्वभूमीवर ते प्रत्येक जिल्ह्यात समाजाची बैठक घेऊन आंदोलनाची तयारी करीत आहेत.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा तरुण मुंबईला जाण्यावर ठाम आहेत. मराठ्यांची पोरे आता थांबणार नाहीत. आरक्षण घेतल्याशिवाय कुणाचेही ऐकणार नाहीत, अशी मनःस्थिती समाजाची आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आरक्षण द्यावे, आम्ही मुंबईला येत नाही, आरक्षण जाहीर केले तर आम्ही मुंबईला जाणार नाही. उगीचच आम्ही कुणाला टार्गेट का करू, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली. याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी खोचक शब्दांत टीका केली.

पत्रकारांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, कोण अडवत आहे तुला. जालन्यात कर, अंतरवाली सरटीत कर, मुंबईत कर, दिल्लीत कर, देशात लोकशाही आहे, कुठेही आंदोलन करू शकतो. परंतु, ज्या संविधानाने तुम्हाला अशा प्रकारचा अधिकार दिलेला आहे. उपोषण करण्याचा, लोक जमवण्याचा, भाषण करण्याचा, त्या संविधानाने हे सुद्धा सांगितलेले आहे की, जे वेगवेगळे घटक आहेत, त्यांनी एकमेकांवर कुरघोडी करता कामा नये. तेवढे लक्षात ठेवावे, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

मराठा समाजाला आरक्षण दिलेले आहे

मराठा समाजाला आरक्षण द्यायचे होते, ते दिलेले आहे. तेलंगणाच्या काही भागातील लोक आहेत, जी कुणबी प्रमाणपत्र द्यायची होती, ती दिली. आणखी काय पाहिजे, अशी विचारणा करत, प्रत्येक घटक जो आहे, तो आपापल्या गोष्टी सांभाळत आहे. दलित समाजात कुणी घुसण्याचा प्रयत्न केला, तर ते गप्प बसणार का, आदिवासी समाज गप्प बसेल का, तर नाही. ओबीसी समाजही गप्प बसणार नाही, असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

दरम्यान, सुरज चव्हाण यांच्या नियुक्तीबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, माझ्यासमोर सुरत चव्हाण यांना सरचिटणीसपदाची जबाबदारी दिली आहे. त्याने अनेक वर्ष पक्षात काम केले आहे, त्यांची चूक झाली, त्याची माफी मागितली आहे. काही कारणामुळे त्यांना महत्त्वाच्या पदावरून दूर करणे किंवा त्यांना शिक्षा देणे, कायमस्वरूपी लांब ठेवणे हे योग्य नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ठरतं घातक

हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…

12 तास ago

आंबट ढेकर, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय

कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…

12 तास ago

आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो

1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…

12 तास ago

7 तारखेपर्यंत पगार अनिवार्य; नोकरी सोडल्यानंतर 2 दिवसांत Full & Final, नवीन कामगार नियमांची माहिती

मुंबई : कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावे आणि नोकरी सोडल्यानंतर देय रक्कम मिळण्यासाठी होणारा विलंब टाळावा,…

12 तास ago

प्रदीप कबरे यांच्या ‘खिडकी’ अभिवाचनाचा विशेष प्रयोग ३० जुलैला दादरच्या शिवाजी मंदिरात

मुंबई: प्रसिद्ध नाटककार प्रदीप कबरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या 'खिडकी' या पुस्तकातील निवडक अनुभवांवर आधारित…

12 तास ago

अपघातग्रस्त तरुणीला सुनेत्रा पवार यांची तात्काळ मदत; रुग्णालयात दाखल करून उपचाराची केली व्यवस्था

बारामतीत विकासकामांच्या पाहणीदरम्यान थांबवला ताफा; जखमी तरुणीच्या उपचारासाठी अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना बारामती: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित…

12 तास ago