पुणे: पुण्यातील इंजिनीअर तरुण-तरुणींच्या आत्महत्येचं सत्र सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी एका इंजिनीअर तरुणीने आयुष्य संपवलं होतं. त्यानंतर आता एका आयटी इंजिनीअर तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तरुणाच्या आत्महत्येने हिंजवडी आयटी पार्कात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडी आयटी पार्कमध्ये आयटी इंजिनीअर तरुणाने कंपनीतच आयुष्य संपवलं. पियुष अशोक कावडे असं आत्महत्या केलेल्या आयटी इंजिनीअर तरुणाचे नाव होतं. सोमवारी सकाळी कंपनीमध्ये मिटिंग सुरु होती. याचवेळी छातीत दुखत असल्याचे कारण देऊन पियुष मिटिंगमधून बाहेर पडला. त्यानंतर त्याने सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.
पियुष आत्महत्या केल्याचं कळताच कंपनीसह हिंजवडी आयटी पार्कमध्ये खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पियुषचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. याबाबत पोलिसांनी पियुषच्या कुटुंबीयांना माहिती दिली. या घटनेने त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
पियुष हा मूळचा नाशिकचा होता. तो हिंजवडीतील ॲटलास कॉपको ग्रुप या कंपनीत कार्यरत होता. एका महिन्यापूर्वी पियुष कंपनीत रुजू झाला होता. पियुषने टोकाचं पाऊल का उचललं, याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. पियुषच्या आत्महत्येने त्याच्या कुटुंबीय आणि मित्रांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…
जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…
जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…
पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…
मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…