महाराष्ट्र

पुणे हादरल! हिंजवडी आयटी पार्क मध्ये आयटी इंजिनीअर तरुणाने कंपनीतच आयुष्य संपवल

पुणे: पुण्यातील इंजिनीअर तरुण-तरुणींच्या आत्महत्येचं सत्र सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी एका इंजिनीअर तरुणीने आयुष्य संपवलं होतं. त्यानंतर आता एका आयटी इंजिनीअर तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तरुणाच्या आत्महत्येने हिंजवडी आयटी पार्कात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडी आयटी पार्कमध्ये आयटी इंजिनीअर तरुणाने कंपनीतच आयुष्य संपवलं. पियुष अशोक कावडे असं आत्महत्या केलेल्या आयटी इंजिनीअर तरुणाचे नाव होतं. सोमवारी सकाळी कंपनीमध्ये मिटिंग सुरु होती. याचवेळी छातीत दुखत असल्याचे कारण देऊन पियुष मिटिंगमधून बाहेर पडला. त्यानंतर त्याने सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

पियुष आत्महत्या केल्याचं कळताच कंपनीसह हिंजवडी आयटी पार्कमध्ये खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पियुषचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. याबाबत पोलिसांनी पियुषच्या कुटुंबीयांना माहिती दिली. या घटनेने त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

पियुष हा मूळचा नाशिकचा होता. तो हिंजवडीतील ॲटलास कॉपको ग्रुप या कंपनीत कार्यरत होता. एका महिन्यापूर्वी पियुष कंपनीत रुजू झाला होता. पियुषने टोकाचं पाऊल का उचललं, याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. पियुषच्या आत्महत्येने त्याच्या कुटुंबीय आणि मित्रांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

1 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

7 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

7 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

7 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

8 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

1 दिवस ago