महाराष्ट्र

राहुल गांधी’ असणं खरंच सोपं नाही; संजय आवटे

मुंबई: वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी सख्ख्या काकाचा मृत्यू तुम्ही पाहाता. लाडक्या आजीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसतो, तेव्हा तुम्ही उण्यापु-या चौदा वर्षांचे असता. एकविसाव्या वर्षी वडिलांच्या शरीराच्या झालेल्या चिंधड्या तुम्हाला दिसतात. तरीही, तुम्ही विचलित तर होत नाहीच. उलट, वडिलांच्या मारेक-यांना माफ करता. आई-वडिलांचा प्रेमविवाह. आई मूळची वेगळ्या देशाची. म्हणून, असभ्य, अश्लील भाषेत तिच्यावर रोज टीका केली जाते. अगदी खालच्या पातळीवरची, घाणेरडी भाषा वापरली जाते.

आईच्या चारित्र्यावर चिखलफेक होते. ‘कुजबुज कॅम्पेन’ चालवले जाते. तरीही, तुमच्या मनात सुडाची भावना निर्माण होत नाही. देशाची सगळी सत्ता ताब्यात आल्यानंतरही, तुम्ही त्या सत्तेत मश्गुल होत नाही. शिवाय, या अशा लोकांना वेचून-वेचून मारणं तर सोडाच, प्रेमाशिवाय अन्य भाषा तुमच्या ओठी येत नाही.तुमचा धर्म कोणता, आईचा धर्म कोणता, आजोबा- पणजोबांचा धर्म कोणता, यावरून एवढा त्रास दिला गेला, तरी तुमच्या मनात कटुता निर्माण होत नाही. धर्मनिरपेक्षतेबद्दची तुमची मांडणी ओसरत नाही. भाषेचा स्तर घसरत नाही.

कॉंग्रेस सत्तेत असताना तुमची आई राजकारणाच्या रिंगणाकडं फिरकत नाही, पण कॉंग्रेसची स्थिती बिकट झालेली असताना मात्र ती पदर खोचून उभी राहाते. तेव्हा, जे तिच्या वाट्याला येतं, ते सारं तर तुम्हीही सोसत असता. तरी संताप संताप होत नाही. राजकारणात उतरल्यानंतर ‘ते’ तुम्हाला ‘पप्पू’ करून टाकतात. सगळं जग तुमच्यावर तुटून पडतं. तुमची यथेच्छ बदनामी केली जाते. ट्रोलिंगचा अक्षरशः कहर होतो. रोजचे जगणे अवघड व्हावे, एवढा छळ होतो. तरीही तुम्ही निराश होत नाही, विफल होत नाही. ज्यांनी ट्रोल केले, त्यांचे तुम्ही जाहीर आभार मानता आणि विखार हीच मातृभाषा ज्यांची, त्यांनाही मिठी मारता.

सगळं होत्याचं नव्हतं होतं. पक्षाची पडझड सुरूच राहाते. पक्ष आता उभारी घेणार नाही, असे पर्सेप्शन तयार केले जाते. सोबत असलेले सोडून जातात. मूर्खातले मूर्खही तुमच्यावर हसू लागतात. माध्यमे तुम्हाला बदनाम करण्याची प्रत्येक संधी घेत असतात. ‘देशद्रोही’ अशी प्रमाणपत्रे वाटणारे कारखाने वाढत जातात. तरीही, तुम्ही मैदान सोडत नाही. ‘आयडिया ऑफ इंडिया’साठी रान पेटवणं थांबवत नाही. निवडणुकातले जय- पराजय, सत्तेची समीकरणं यात सगळे गुंतलेले असताना, हा व्यापक लढा तुम्ही सोडत नाही. अगदी जवळचे दुरावतात, भलेभले साथ सोडतात, तरी तुमची जिगर कमी होत नाही. आज अशा साध्या माणसासाठी तुम्ही झगडताना दिसता, ज्याला या व्यवस्थेत काही आवाज नाही. तुम्ही मैलोनमैल झपझप चालत राहता आणि त्या भारताशी बोलत असता, जो कधी टीव्हीच्या पडद्यावर उमटत नाही.

खासदारकी जाते, घर जाते… सारे हिरावून घेतले जाते, तरी तुमच्या चेह-यावरचं ‘मिलियन डॉलर स्माइल’ ओसरत नाही. कशी करू शकता तुम्ही अविरत अशी प्रेमाची भाषा? कशी जगू शकता अशी ‘आयडिया ऑफ इंडिया’? आयुष्यभर हिंसा सोसूनही, कशी सांगू शकता अहिंसा? राहुल गांधी, तुम्ही ५३ वर्षांचे झालेले असताना, आज तरी हे धीरोदात्त गुपित आम्हाला सांगाच. जिथं, सुडापोटी माणसं माणसांचे खून करतात. खुल्या अभिव्यक्तीचे सगळे मार्ग बंद केले जातात. धर्माच्या उन्मादातून कोणाला ठेचून मारतात. सातत्यानं होणा-या अवमानामुळं, अपयशामुळं माणसं आत्महत्या करतात. अशावेळी तुमच्यात हे सगळं येतं कुठून? या प्रश्नाचं उत्तर आम्हाला सापडत नाही. ‘राहुल गांधी’ असणं खरंच सोपं नाही.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

1 तास ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

1 तास ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

1 तास ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

2 तास ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

2 तास ago

सक्षम ताटे प्रकरणाला नवा ट्विस्ट; आंचलच्या आरोपांवर कुटुंबीयांचा पलटवार

नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे.…

3 तास ago