महाराष्ट्र

राम मंदिर देणगीप्रकरणी RSS ने संबंधितांना संघातून काढावे; हर्षवर्धन सपकाळांचे आव्हान

मराठवाडा आढावा बैठकीत सरकारवरही जोरदार टीका; “दुबार पेरणी, दुष्काळ आणि बोगस बियाण्यांप्रमाणे बोगस सरकार” असा हल्लाबोल

छत्रपती संभाजीनगर: काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अयोध्या राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार निशाणा साधला. राम मंदिरावरील देणगीप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करत त्यांना संघातून निष्कासित करण्याची हिंमत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दाखवावी, असे आव्हान त्यांनी दिले.

छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मराठवाडा विभागाच्या जिल्हानिहाय आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, राम मंदिराचा वापर राजकीय फायद्यासाठी करण्यात आला असून आता मंदिरातील आर्थिक व्यवहारांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणात विश्वस्त मंडळाने जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी त्यांनी राज्य सरकारवरही जोरदार टीका केली. राज्यात दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले असून दुष्काळाचा सामना करण्यासाठी सरकारकडे कोणतेही ठोस नियोजन नसल्याचा आरोप त्यांनी केला. “बोगस बियाण्यांप्रमाणेच हे सरकारही बोगस असून त्यांचा कारभारही बोगस आहे,” अशी टीका त्यांनी केली.

शेतकरी कर्जमाफीबाबत सरकार जाणीवपूर्वक विलंब करत असल्याचा आरोप करत त्यांनी आयकर विभागाकडून यादी मागवण्याच्या प्रक्रियेचाही उल्लेख केला. तसेच नीट, टीईटी आणि एमपीएससीसारख्या परीक्षा पेपरफुटी प्रकरणांवर काँग्रेस आक्रमक भूमिका घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना सपकाळ म्हणाले की, पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी या चर्चांचे खंडन केले असून त्यांच्या भूमिकेवर विश्वास ठेवला पाहिजे. तसेच महायुती सरकारमध्ये सर्व काही सुरळीत नसून सत्तेचा समतोल बिघडल्याचेही त्यांनी म्हटले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

बुडाला जळतंय, डोंगराची आग विझवायला पळतंय; उद्धव ठाकरेंवर शिंदेंचा घणाघात

सोनम वांगचूक आंदोलनाच्या समर्थनावरून टीका; हिंदुत्व, मोदी सरकार, एनडीए, पेपर लीक आणि विरोधकांच्या भूमिकेवर एकनाथ…

23 मिनिटे ago

दापचरीत 1,395 एकरांवर उभारणार आंतरराष्ट्रीय कृषी बाजार; महाराष्ट्राच्या कृषी निर्यातीला मिळणार नवी झेप

वाढवण बंदराजवळ जागतिक दर्जाचे कृषी व्यापार केंद्र; 10 हजारांहून अधिक रोजगार, शेतमाल निर्यातीला मोठी चालना…

33 मिनिटे ago

राजर्षी शाहू जयंती निबंध-काव्य स्पर्धेचा निकाल जाहीर; पत्रकार राजन पारकर यांना प्रथम क्रमांक

मुंबई :राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त १८ ते २६ जून २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात…

37 मिनिटे ago

स्वर्गीय अजितदादांच्या जयंतीचा शासकीय जयंती यादीत समावेश करा; भुजबळ-मुश्रीफ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई: स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या २२ जुलै या जयंतीचा राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रपुरुष…

1 तास ago

अमृत भारत योजनेतून बारामती रेल्वे स्थानकाचा कायापालट; सुनेत्रा अजित पवार यांचे मोदी-वैष्णव यांना आभार

मुंबई: अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत बारामती रेल्वे स्थानकाचा ११.४० कोटी रुपये खर्चून जागतिक दर्जाचा पुनर्विकास…

1 तास ago

वारीत पुन्हा अपघात! भरधाव पिकअपने वारकऱ्याला उडवले; चालक फरार

अहिल्यानगरातील रुईछत्तीशी शिवारात घटना; जखमी वारकरी जिल्हा रुग्णालयात उपचाराधीन अहिल्यानगर: पुण्यातील ज्ञानेश्वर माऊलींच्या दिंडीवर झालेल्या…

1 तास ago