महाराष्ट्र

राज्यात आज उत्साहात ‘शाळा प्रवेशोत्सव’; प्रत्येक बालकाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा निर्धार

मुंबई: राज्यातील सर्व मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पटसंख्या वाढविणे आणि शाळेच्या पहिल्या दिवसाचे उत्सवात रूपांतर करणे या उद्देशाने राज्यभर आज ‘शाळा प्रवेशोत्सव 2026’ मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. विदर्भ विभागातील शाळा वगळता उर्वरित महाराष्ट्रातील शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

शालेय शिक्षणाचा पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि संस्मरणीय क्षण असल्याने विद्यार्थ्यांचे आनंददायी वातावरणात स्वागत करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रीमंडळातील सदस्य, लोकप्रतिनिधी तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी विविध शाळांना भेट देऊन नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत.

‘पहिले पाऊल’ या विशेष उपक्रमांतर्गत इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पायाचा ठसा घेऊन त्याची प्रत पालकांना दिली जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेशांचे वितरण करण्यात येणार असून शाळेचा पहिला दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला जाणार आहे. नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात येणार आहे.

शाळा प्रवेशोत्सव हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आकर्षण निर्माण करणे, पालकांचा विश्वास दृढ करणे आणि शासकीय शाळांबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करणे हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे. मागील वर्षी राबविण्यात आलेल्या उपक्रमामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पटसंख्येतील घट कमी होऊन काही ठिकाणी वाढही नोंदविण्यात आली होती.

यंदा प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्याला किमान एका शाळेला भेट देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी एक शाळा ‘दत्तक शाळा’ म्हणून स्वीकारून तिच्या शैक्षणिक गुणवत्ता, भौतिक सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा नियमित आढावा घेण्याची जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे.

शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांना अंगणवाडी व बालवाडी केंद्रांना भेटी देऊन प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यास, पालकांशी संवाद साधण्यास आणि शासकीय शाळांमधील विविध सुविधा व शिष्यवृत्ती योजनांची माहिती देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. समाजमाध्यमे, ग्रामस्तरीय जनजागृती, दवंडी आणि व्हॉट्सॲप गटांच्या माध्यमातूनही व्यापक प्रचार-प्रसार करण्यात येत आहे.

राज्यभर या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर ‘शाळा प्रवेशोत्सव कक्ष’ स्थापन करण्यात आले असून कार्यक्रमाच्या प्रत्येक टप्प्यावर नियंत्रण ठेवले जाणार आहे. लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या शाळा भेटींची माहिती, छायाचित्रे आणि अहवाल ऑनलाईन प्रणालीद्वारे नोंदविण्यात येणार आहेत.

शासन, प्रशासन, शिक्षक, पालक आणि समाज यांच्या संयुक्त सहभागातून प्रत्येक बालक शिक्षणाच्या प्रवाहात यावे आणि ‘शिक्षणसमृद्ध महाराष्ट्र’ घडविण्याच्या दिशेने हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचा विश्वास शालेय शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

12 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago