महाराष्ट्र

नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द करणे म्हणजे उत्तर महाराष्ट्राच्या विकासावर घाला; आमदार सत्यजीत तांबे

नाशिक: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द करून तो नाशिक–शिर्डी–अहिल्यानगर मार्गे नेण्याची घोषणा केल्याने उत्तर महाराष्ट्रात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या निर्णयावर आमदार सत्यजीत तांबे यांनी तीव्र आक्षेप घेत हा निर्णय उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी घातक असल्याचे म्हटले आहे.

तांबे यांनी सांगितले की, नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग हा केवळ नाशिक आणि अहिल्यानगरसाठीच नव्हे, तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड आणि मार्गावरील ग्रामीण भागासाठीही महत्त्वाचा ठरणार होता. या रेल्वेमुळे पुणे शहरावरील लोकसंख्या आणि वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत झाली असती. मात्र सरळ आणि सोपा प्रकल्प गुंतागुंतीचा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची टीका त्यांनी केली.

या निर्णयामागे राजकारण किंवा अन्य काही कारणे आहेत का, असा सवाल उपस्थित करत तांबे म्हणाले की, रेल्वे प्रकल्प हे शंभर वर्षांच्या दृष्टीने नियोजन केले जाणारे प्रकल्प असतात. त्यामुळे जनतेच्या दीर्घकालीन हिताचा विचार करूनच निर्णय घेतले पाहिजेत. अन्यथा भविष्यातील पिढ्या हा निर्णय माफ करणार नाहीत, असेही त्यांनी नमूद केले.

यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या विषयात वैयक्तिक लक्ष घालण्याची विनंती करणार असल्याचे तांबे यांनी सांगितले. यापूर्वी मुख्यमंत्री यांनी या प्रश्नावर तज्ज्ञ समिती नेमून मध्यम मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते, अशी आठवणही त्यांनी l दिली.

नाशिकच्या औद्योगिक, आयटी आणि सेवा क्षेत्राच्या विकासासाठी उत्तम रेल्वे कनेक्टिव्हिटी अत्यावश्यक असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांनीही या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून जनआंदोलन उभारण्याचे आवाहन केले. तसेच सिन्नर, संगमनेर, अकोले, जुन्नर, खेड आणि संपूर्ण प्रस्तावित मार्गावरील नागरिकांनी एकत्र येऊन या निर्णयाविरोधात आवाज उठवावा, असे आवाहन त्यांनी केले.

सत्ताधारी पक्षातील आमदार आणि खासदारांनी पक्षीय दबावापेक्षा जनहिताला प्राधान्य देऊन भूमिका घ्यावी, असेही तांबे म्हणाले. “लोकप्रतिनिधी म्हणून जनतेचा आवाज उठवणे हेच आपले कर्तव्य आहे. जनहितापेक्षा कोणताही पक्ष किंवा नेतृत्व मोठे नाही,” असे सांगत त्यांनी सरकारच्या निर्णयाचा तीव्र निषेlध केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

माहिती अधिकारावर सरकारचा घाला; बेकायदेशीर तरतुदी तात्काळ रद्द करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: माहितीचा अधिकार (RTI) हा नागरिकांना शासनाच्या कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी मिळालेला महत्त्वाचा…

40 मिनिटे ago

ओबीसी जनगणनेत स्वतंत्र कॉलम नसल्यास राज्यभर आंदोलन; विजय वडेट्टीवारांचा इशारा

नागपूर: ओबीसी समाजाची अचूक लोकसंख्या देशासमोर यावी यासाठी होणाऱ्या जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलमचा समावेश करणे…

53 मिनिटे ago

देशाचे पहिले शक्तीपीठ मोदी, दुसरे शक्तीपीठ अमित शाह; एकनाथ शिंदे

इचलकरंजी: देशाच्या राजनैतिक शक्तीपीठांचा विचार केला तर पहिले शक्तीपीठ म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरे…

55 मिनिटे ago

पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात उच्च न्यायालयात अपील; अमित शाह यांचे सीबीआयला निर्देश; एकनाथ शिंदे

कोल्हापूर : पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून…

1 तास ago

अंबाबाई मंदिराच्या १५०० कोटींच्या विकास प्रकल्पाचा शुभारंभ; कोल्हापुरात ‘विकासाची पंचगंगा’ वाहणार; एकनाथ शिंदे

कोल्हापूर: श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिराच्या सुमारे १५०० कोटी रुपयांच्या आधुनिकीकरण व सुशोभीकरण प्रकल्पाचा शुभारंभ केंद्रीय…

1 तास ago

जनादेशाचा बाजार, संविधानावर घाव; पक्षफोडीच्या राजकारणावर काँग्रेसची टीका

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माध्यम समन्वयक ॲड. श्रीनिवास बिक्कड यांनी जनादेशाची पायमल्ली, पक्षफोडीचे…

1 तास ago