महाराष्ट्र

नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द करणे म्हणजे उत्तर महाराष्ट्राच्या विकासावर घाला; आमदार सत्यजीत तांबे

नाशिक: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द करून तो नाशिक–शिर्डी–अहिल्यानगर मार्गे नेण्याची घोषणा केल्याने उत्तर महाराष्ट्रात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या निर्णयावर आमदार सत्यजीत तांबे यांनी तीव्र आक्षेप घेत हा निर्णय उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी घातक असल्याचे म्हटले आहे.

तांबे यांनी सांगितले की, नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग हा केवळ नाशिक आणि अहिल्यानगरसाठीच नव्हे, तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड आणि मार्गावरील ग्रामीण भागासाठीही महत्त्वाचा ठरणार होता. या रेल्वेमुळे पुणे शहरावरील लोकसंख्या आणि वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत झाली असती. मात्र सरळ आणि सोपा प्रकल्प गुंतागुंतीचा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची टीका त्यांनी केली.

या निर्णयामागे राजकारण किंवा अन्य काही कारणे आहेत का, असा सवाल उपस्थित करत तांबे म्हणाले की, रेल्वे प्रकल्प हे शंभर वर्षांच्या दृष्टीने नियोजन केले जाणारे प्रकल्प असतात. त्यामुळे जनतेच्या दीर्घकालीन हिताचा विचार करूनच निर्णय घेतले पाहिजेत. अन्यथा भविष्यातील पिढ्या हा निर्णय माफ करणार नाहीत, असेही त्यांनी नमूद केले.

यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या विषयात वैयक्तिक लक्ष घालण्याची विनंती करणार असल्याचे तांबे यांनी सांगितले. यापूर्वी मुख्यमंत्री यांनी या प्रश्नावर तज्ज्ञ समिती नेमून मध्यम मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते, अशी आठवणही त्यांनी l दिली.

नाशिकच्या औद्योगिक, आयटी आणि सेवा क्षेत्राच्या विकासासाठी उत्तम रेल्वे कनेक्टिव्हिटी अत्यावश्यक असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांनीही या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून जनआंदोलन उभारण्याचे आवाहन केले. तसेच सिन्नर, संगमनेर, अकोले, जुन्नर, खेड आणि संपूर्ण प्रस्तावित मार्गावरील नागरिकांनी एकत्र येऊन या निर्णयाविरोधात आवाज उठवावा, असे आवाहन त्यांनी केले.

सत्ताधारी पक्षातील आमदार आणि खासदारांनी पक्षीय दबावापेक्षा जनहिताला प्राधान्य देऊन भूमिका घ्यावी, असेही तांबे म्हणाले. “लोकप्रतिनिधी म्हणून जनतेचा आवाज उठवणे हेच आपले कर्तव्य आहे. जनहितापेक्षा कोणताही पक्ष किंवा नेतृत्व मोठे नाही,” असे सांगत त्यांनी सरकारच्या निर्णयाचा तीव्र निषेlध केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आधी तरुणांची माफी मागा, मग संवाद साधा; मोहन भागवतांवर काँग्रेसचा निशाणा

मुंबई: पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील बदलांच्या मागणीसाठी झालेल्या देशव्यापी आंदोलनावरून काँग्रेसने केंद्र सरकार आणि राष्ट्रीय…

7 तास ago

ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा विराट जनआक्रोश मोर्चा; भाजप सरकारवर घणाघाती हल्लाबोल

महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, लाडकी बहीण योजना आणि स्मार्ट मीटरवरून सरकारवर टीका; तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन…

7 तास ago

व्यायाम व योगा करण्याचे फायदे

1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते व्यायाम करणारी व्यक्ती तुलनेने अधिक काळ जगते कारण व्यायामामुळे…

11 तास ago

चयापचय बिघडण्याची कारणे

झोप पूर्ण न होणे आणि शांत झोप न लागणे यामुळे इन्सुलिन आणि कोर्टिसोल सारख्या हार्मोन्सचे…

11 तास ago

छत्रपती संभाजीनगरच्या विकास प्रकल्पांना गती; भूसंपादनासाठी ३० खासगी भूमापकांची नियुक्ती

ऑरिक, ग्रीनफील्ड रस्ता, विमानतळ विस्तार आणि रेल्वे दुहेरीकरणाच्या कामांना मिळणार वेग; नागरिकांच्या जमीन मोजणीची प्रतीक्षाही…

11 तास ago

‘गुंगी गुडिया’ वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा आक्रमक; मुंबईत काँग्रेसविरोधात मूक आंदोलन.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याविरोधात काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवर…

11 तास ago