महाराष्ट्र

तुकाराम मुंढेंना हटवू नका; परेश रावलांची मुख्यमंत्र्यांकडे थेट मागणी, म्हणाले- ‘त्यांचं संरक्षण करणं हे कर्तव्य’

मुंबई : आपल्या धडक आणि कडक प्रशासकीय निर्णयांसाठी ओळखले जाणारे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे सध्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भेसळखोर, नियम मोडणारे आणि बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईमुळे मुंढे यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असतानाच आता बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांनीही त्यांच्या कामाचं समर्थन केलं आहे.

विशेष म्हणजे, तुकाराम मुंढे यांची सध्याच्या पदावरून बदली किंवा अन्यत्र रवानगी करण्यात येऊ नये, अशी थेट मागणी परेश रावल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. रावल यांनी एक्सवरील पोस्टमध्ये मुख्यमंत्र्यांना टॅग करत मुंढे यांच्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

परेश रावलांची मुख्यमंत्र्यांना थेट विनंती

परेश रावल यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ पोस्ट केली. मुंढे यांची त्यांच्या विभागातून बदली किंवा अन्यत्र रवानगी होऊ नये आणि त्यांचं संरक्षण करणं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्राधान्य आणि कर्तव्य असायला हवं, अशी विनंती त्यांनी केली.रावल यांच्या या पोस्टनंतर तुकाराम मुंढे यांच्या कारवाईची तसेच त्यांच्या भविष्यातील नियुक्तीची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.

मुंढेंच्या कारवाईचा राज्यभर बोलबाला

मे २०२६ मध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्न भेसळ आणि नियमभंगाविरोधात कारवाईचा धडाका सुरू आहे.

अन्नपदार्थांची तपासणी, भेसळयुक्त पदार्थांवर कारवाई, बेकायदेशीर गुटख्याची जप्ती, तसेच हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ विक्रीच्या ठिकाणी नियमांची अंमलबजावणी यावर विभागाकडून विशेष भर देण्यात आला आहे. मुंबईतील काही प्रसिद्ध हॉटेल्सवरही कारवाई करण्यात आली. याशिवाय उच्च न्यायालयाच्या कँटीनमध्ये स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन आढळल्यानंतरही कारवाई करण्यात आली.या धडक कारवाईमुळे तुकाराम मुंढे यांचं नाव पुन्हा चर्चेत आलं आहे.

शाळांमधील जंक फूडवरही कठोर भूमिका

मुंढे यांच्या कार्यकाळात शाळांच्या परिसरात विकल्या जाणाऱ्या जंक फूडबाबतही कठोर भूमिका घेण्यात आली. शाळांच्या ५० मीटर परिसरात हाय-फॅट, हाय-शुगर आणि हाय-सॉल्ट असलेल्या खाद्यपदार्थांच्या विक्री आणि जाहिरातींवर निर्बंध आणण्याच्या निर्णयामुळेही त्यांची चर्चा झाली.विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने घेतलेल्या या भूमिकेमुळे मुंढे यांच्याकडे कठोर आणि नियमांची अंमलबजावणी करणारा अधिकारी म्हणून पाहिलं जात आहे.

२१ वर्षांच्या कारकिर्दीत अनेकदा बदल्या

तुकाराम मुंढे हे आपल्या प्रशासकीय कारकिर्दीत धडक निर्णयांसाठी प्रसिद्ध आहेत. सुमारे २१ वर्षांच्या सेवेत त्यांना अनेकदा बदल्यांना सामोरं जावं लागलं आहे. मात्र, प्रत्येक वेळी त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीची आणि कठोर निर्णयांची चर्चा झाली.

सध्या अन्न व औषध प्रशासन विभागातील त्यांच्या कारवाईला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे. त्यातच आता परेश रावल यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे मुंढे यांना पदावर कायम ठेवण्याची मागणी केल्याने या मुद्द्याला आणखी महत्त्व प्राप्त झालं आहे.

परेश रावल यांच्या या पोस्टमुळे तुकाराम मुंढे यांच्या कारवाईसोबतच त्यांच्या संभाव्य बदलीचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला आहे. आता सरकार मुंढे यांच्या धडक कारवाईला पुढे कितपत पाठबळ देतं, याकडे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अण्णासाहेब पाटील महामंडळात मोठा फेरबदल; नरेंद्र पाटलांच्या मागणीला यश, एमडी विजयसिंह देशमुखांची बदली

मुख्यमंत्री फडणवीसांकडून मागणीची दखल; अविनाश रणखांब यांची नव्या एमडीपदी नियुक्ती मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक…

2 मिनिटे ago

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध विभागांशी संबंधित ८…

7 मिनिटे ago

राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांसाठी आता एकसमान शैक्षणिक वेळापत्रक; NEP अंमलबजावणीला वेग

मुंबई: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP) राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांनी एकसमान शैक्षणिक…

42 मिनिटे ago

केवळ एक लवंग खाण्याचे फायदे

आजकाल महागाईसोबत रोगराई पण वाढत चालली आहे. प्रत्येक आजारासाठी अलोपॅथीच्या महागात महाग गोळ्या बनवल्या जात…

59 मिनिटे ago

व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता

व्हिटॅमिन बी-१२ हे 'सायनोकोबालामिन' म्हणून ओळखले जाते. हे पेशी पर्यंतचे चयापचय, विशेषतः DNA संश्लेषण (अनुवंशिक…

1 तास ago

भाजलेल आल सांधेदुखीपासून वेटलॉसपर्यंत अनेक समस्यांवर असरदार

रोजच्या जेवणात वेगवेगळ्या पदार्थांची चव वाढवण्यासाठी आलं घातलं जातं. खरंतर, 'आलं' मसाल्यांच्या पदार्थांपैकी एक असून…

1 तास ago