महाराष्ट्र

लैंगिक अत्याचार सहन केला जाणार नाही; पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे

सांगलीतील अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची गंभीर दखल

सांगली: करगणी (ता. आटपाडी, जि. सांगली) येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील सामूहिक लैंगिक अत्याचाराच्या संतापजनक घटनेनंतर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तातडीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून कठोर कारवाईची मागणी केली. अत्याचारानंतर मानसिक व सामाजिक दबावामुळे पीडित मुलीने आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे की, आरोपींवर कठोर आणि तातडीची कारवाई होणे अत्यावश्यक आहे. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निर्देश दिले आहेत की, या प्रकरणातील संपूर्ण साक्षी, फॉरेन्सिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल डेटा असे सर्व आवश्यक तपशील गोळा करून दोषारोपपत्र लवकरात लवकर न्यायालयात सादर करण्यात यावा. यासोबतच त्यांनी सरकारी वकिलांमार्फत मागणी करून प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात वर्ग करण्याची शिफारसही करण्याचे निर्देश दिले.

या प्रकरणात कोणताही राजकीय, सामाजिक किंवा स्थानिक दबाव येऊ नये म्हणून पीडितेच्या कुटुंबीयांना आणि साक्षीदारांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी स्पष्ट सूचना त्यांनी केली आहे. तपासात पारदर्शकता राखली जावी आणि पीडित कुटुंबीयांना वेळोवेळी माहिती देऊन त्यांचा विश्वास जिंकण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणेवर आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.

पुढे बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, “अशा घटना केवळ गुन्हा नसून समाजाच्या मानसिकतेवर ओरखडा आहेत. त्यामुळे अशा गुन्ह्यांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी स्थानिक पातळीवर लैंगिक शोषणविरोधी कायदे आणि POCSO कायद्याबाबत जनजागृती करणे अत्यावश्यक आहे.” त्यांनी जिल्हा प्रशासनाला सामाजिक जागरूकता उपक्रम तातडीने राबवण्याचे आवाहन केले.

शेवटी, आरोपींना जामीन मिळण्याची शक्यता टाळण्यासाठी सरकारी वकिलांनी कोर्टात ठोस भूमिका मांडावी, जेणेकरून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळावा, असेही त्यांनी आपल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

8 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

8 तास ago

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य? राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रस्ताव

मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…

8 तास ago

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…

10 तास ago

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

22 तास ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

22 तास ago