महाराष्ट्र

लैंगिक अत्याचार सहन केला जाणार नाही; पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे

सांगलीतील अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची गंभीर दखल

सांगली: करगणी (ता. आटपाडी, जि. सांगली) येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील सामूहिक लैंगिक अत्याचाराच्या संतापजनक घटनेनंतर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तातडीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून कठोर कारवाईची मागणी केली. अत्याचारानंतर मानसिक व सामाजिक दबावामुळे पीडित मुलीने आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे की, आरोपींवर कठोर आणि तातडीची कारवाई होणे अत्यावश्यक आहे. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निर्देश दिले आहेत की, या प्रकरणातील संपूर्ण साक्षी, फॉरेन्सिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल डेटा असे सर्व आवश्यक तपशील गोळा करून दोषारोपपत्र लवकरात लवकर न्यायालयात सादर करण्यात यावा. यासोबतच त्यांनी सरकारी वकिलांमार्फत मागणी करून प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात वर्ग करण्याची शिफारसही करण्याचे निर्देश दिले.

या प्रकरणात कोणताही राजकीय, सामाजिक किंवा स्थानिक दबाव येऊ नये म्हणून पीडितेच्या कुटुंबीयांना आणि साक्षीदारांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी स्पष्ट सूचना त्यांनी केली आहे. तपासात पारदर्शकता राखली जावी आणि पीडित कुटुंबीयांना वेळोवेळी माहिती देऊन त्यांचा विश्वास जिंकण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणेवर आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.

पुढे बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, “अशा घटना केवळ गुन्हा नसून समाजाच्या मानसिकतेवर ओरखडा आहेत. त्यामुळे अशा गुन्ह्यांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी स्थानिक पातळीवर लैंगिक शोषणविरोधी कायदे आणि POCSO कायद्याबाबत जनजागृती करणे अत्यावश्यक आहे.” त्यांनी जिल्हा प्रशासनाला सामाजिक जागरूकता उपक्रम तातडीने राबवण्याचे आवाहन केले.

शेवटी, आरोपींना जामीन मिळण्याची शक्यता टाळण्यासाठी सरकारी वकिलांनी कोर्टात ठोस भूमिका मांडावी, जेणेकरून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळावा, असेही त्यांनी आपल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शरीरातून बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्याचा बेस्ट घरगुती उपाय

आजकालच्या लाइफ स्टाईलमध्ये शरीरात कोलेस्ट्रॉल जमा होऊन नसा ब्लॉक होणं एक सामान्य समस्या बनली आहे.…

60 मिनिटे ago

लसणाचे औषधी गुणधर्म

लसणाच्या पाकळ्यात अँटिऑक्सिडंट असतात, जे शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकतात. सूक्ष्मजंतू नष्ट करणारे प्रतिजैविक गुणधर्म…

1 तास ago

‘आपले राष्ट्र, आपला स्वाभिमान’; शक्तिशाली भारतासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन

एकता, कर्तव्य, युवाशक्ती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून विकसित भारत घडविण्याचा संदेश मुंबई: भारत हा केवळ भौगोलिक…

1 तास ago

नीट पेपर लीकविरोधात केंद्राच्या कठोर भूमिकेला महाराष्ट्राचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंचे स्वागत

फास्ट ट्रॅक न्यायालये, १० वर्षांपर्यंत कारावास आणि १० कोटी दंडाच्या प्रस्तावित तरतुदींना शिंदेंचा पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या…

1 तास ago

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा म्हणजे लढ्याचा शेवट नाही; मोदींनी देशाची माफी मागावी; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असला तरी…

1 तास ago

नीट पेपरफुटी प्रकरणी शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा हा तरुणाईच्या संघर्षाचा विजय; सचिन सावंत

मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे स्वागत करत अखिल भारतीय…

1 तास ago