महाराष्ट्र

शिवसेनेचा राज्यव्यापी संवाद दौरा; डॉ. श्रीकांत शिंदे २२ जिल्हे, १०० हून अधिक मतदारसंघ पिंजून काढणार

मुंबई: आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना संघटना अधिक मजबूत आणि बूथस्तरापर्यंत प्रभावी करण्यासाठी शिवसेना संसदीय गटनेते तथा Dr. Shrikant Shinde यांचा विधानसभा निहाय कार्यकर्ता, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी संवाद दौरा १६ मे २०२६ पासून सुरू होत आहे. तब्बल दोन महिने चालणाऱ्या या दौऱ्यात राज्यातील २२ जिल्हे आणि १०० हून अधिक विधानसभा मतदारसंघांचा समावेश असणार आहे.

शिवसेना सचिव Bhausaheb Chaudhari यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन या दौऱ्याची माहिती दिली. शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या आदेशानुसार ३० मार्च २०२६ रोजी राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी संपर्कप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे मुंबई आणि ठाणे लोकसभा क्षेत्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

यापूर्वी २०२४ विधानसभा निवडणुकीपूर्वीही डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राज्यातील ६५ ते ७० विधानसभा मतदारसंघांचा दौरा करत तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला होता. मोठ्या सभांपेक्षा प्रत्यक्ष भेटींना प्राधान्य देत त्यांनी स्थानिक पातळीवरील प्रश्न, सूचना आणि निवडणूक रणनीतीवर भर दिला होता.

आता नव्या राज्यव्यापी दौऱ्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी, बूथस्तरावरील पक्षबांधणी, संघटनात्मक रणनीती आणि शिवसेनेच्या विविध आघाड्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. एसआयआर मोहिमेअंतर्गत बीएलए आणि बूथ प्रमुखांच्या नियुक्त्यांवरही चर्चा होणार आहे.

या बैठकींमध्ये जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, तालुकाप्रमुख, शाखाप्रमुख, महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि बूथस्तरावरील शिवसैनिकांशी थेट संवाद साधण्यात येणार आहे. स्थानिक प्रश्न, संघटनात्मक अडचणी, निवडणुकीतील आव्हाने आणि पुढील नियोजनावर सविस्तर चर्चा केली जाणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.

दौऱ्याचे टप्पे असे :

पहिला टप्पा (मे २०२६) : नाशिक, धुळे, अहिल्यानगर, बीड, अमरावती आणि अकोला

दुसरा टप्पा (जून २०२६) : जळगाव, नंदुरबार, यवतमाळ, वाशिम, नांदेड, हिंगोली, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली

तिसरा टप्पा (जुलै २०२६) : बुलढाणा, जालना, नागपूर, भंडारा, गोंदिया, ठाणे आणि पालघर

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक बूथवर पक्षाची पकड मजबूत करणे आणि तळागाळातील शिवसैनिकांना नव्या उमेदीने सक्रिय करणे, हा या राज्यव्यापी दौऱ्यामागील मुख्य उद्देश असल्याचे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महाराष्ट्रात स्वातंत्र्यदिनाची जय्यत तयारी; फडणवीसांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण

मुंबई: भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.…

12 मिनिटे ago

घोडगंगा कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय

शिरूर : शिरूर तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी शासनस्तरावर हालचालींना…

15 मिनिटे ago

रूसा, पीएम उषा प्रकल्पांना गती द्या; विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा वेळेत मिळाव्यात; चंद्रकांत पाटील

मुंबई : विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध विकासकामे…

2 तास ago

नांदेडमध्ये शिवसेनेला बळ; असंख्य पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई : नांदेड जिल्ह्यात शिवसेनेच्या संघटनविस्ताराला आणखी बळ मिळाले आहे. शंकरअण्णा धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि…

2 तास ago

अहिल्यानगरमधील गंभीर गुन्ह्यातील आरोपी पुणे LCB जाळ्यात

शिरुर (तेजस फडके): अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या खुनाचा प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यातील…

6 तास ago

पुणे; दूध भेसळ प्रकरणात कारवाईचा फास आवळला; ११ आरोपींना न्यायालयीन कोठडी तर १४ आरोपी यापुर्वीच येरवडा कारागृहात

मंचर (प्रतिनिधी): दूधात भेसळ करुन नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या टोळीविरुद्ध मंचर पोलिसांनी सुरु केलेल्या कारवाईला…

8 तास ago