महाराष्ट्र

पंतप्रधान मोदींनीच राष्ट्रहितासाठी वानप्रस्थाश्रम स्वीकारावा; हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई : पंतप्रधान Narendra Modi यांनी देशातील जनतेला पेट्रोल-डिझेल, सोने खरेदी, खतांचा वापर आणि खाद्यतेलाच्या वापरावर केलेला उपदेश म्हणजे देश चालवण्यात ते सपशेल अपयशी ठरल्याचे द्योतक असल्याची घणाघाती टीका Harshvardhan Sapkal यांनी केली आहे. “जनतेनेच सतत त्याग करायचा आणि मोदी फक्त कॅमेऱ्यासमोर भाषण देत फिरणार का?” असा संतप्त सवाल करत “राष्ट्रहितासाठी नरेंद्र मोदी यांनीच वानप्रस्थाश्रमाकडे मार्गस्थ व्हावे, ही १४० कोटी जनतेची भावना आहे,” असा हल्लाबोल त्यांनी केला.

सपकाळ म्हणाले की, संभाव्य आर्थिक संकटासाठी जगातील अनेक देश नियोजन आणि तयारी करत असताना मोदी सरकार आणि भाजप निवडणुका, जाहिराती, धर्मांधता आणि द्वेषाच्या राजकारणात गुंतले होते. “नरेंद्र मोदी यांच्या निष्काळजी, अहंकारी आणि लहरी कारभाराची मोठी किंमत देशातील नागरिकांना मोजावी लागत आहे,” असे ते म्हणाले.

देशात इंधन आणि एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. सोने-चांदी सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले असून अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे, असा आरोपही सपकाळ यांनी केला. “निवडणुका जिंकण्यासाठी देशाच्या अर्थव्यवस्थेची राखरांगोळी करण्यात आली आणि आता जनतेलाच त्यागाचे उपदेश दिले जात आहेत. स्वतः मात्र ४०-५० गाड्यांच्या ताफ्यासह फिरतात,” अशी टीकाही त्यांनी केली.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते Rahul Gandhi यांनी मार्च महिन्यात देशासमोरील संभाव्य धोक्याचा इशारा दिला होता, मात्र सत्तेच्या अहंकारात बुडालेल्या मोदी सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप करत सपकाळ म्हणाले की, “कोविड काळात लोक ऑक्सिजनअभावी मरत असताना टाळ्या-थाळ्या वाजवण्याचे आवाहन करण्यात येत होते. नोटबंदी, जीएसटी आणि कोविड संकटानंतर आता देशावर आणखी मोठे संकट आले असून त्याला मोदी सरकारच जबाबदार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विद्यार्थ्यांच्या सूचनांचे चंद्रकांत पाटलांकडून स्वागत; परीक्षा सुरक्षेसह सामाजिक प्रश्नांवर थेट संवाद

मुंबई : उच्च शिक्षणातील विविध योजना, शिक्षणातील पारदर्शकता, करिअर मार्गदर्शन, परीक्षा सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारी…

2 सेकंद ago

महाराष्ट्रात स्वातंत्र्यदिनाची जय्यत तयारी; फडणवीसांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण

मुंबई: भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.…

13 मिनिटे ago

घोडगंगा कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय

शिरूर : शिरूर तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी शासनस्तरावर हालचालींना…

16 मिनिटे ago

रूसा, पीएम उषा प्रकल्पांना गती द्या; विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा वेळेत मिळाव्यात; चंद्रकांत पाटील

मुंबई : विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध विकासकामे…

2 तास ago

नांदेडमध्ये शिवसेनेला बळ; असंख्य पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई : नांदेड जिल्ह्यात शिवसेनेच्या संघटनविस्ताराला आणखी बळ मिळाले आहे. शंकरअण्णा धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि…

2 तास ago

अहिल्यानगरमधील गंभीर गुन्ह्यातील आरोपी पुणे LCB जाळ्यात

शिरुर (तेजस फडके): अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या खुनाचा प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यातील…

6 तास ago