महाराष्ट्र

ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदेंची मोठी कोंडी; भाजपने नेमका काय डाव खेळला?

मुंबई: भारतीय जनता पक्षाकडून सध्या एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. याचे उदाहरण आपण पाहिले तर अशा अनेक पदाधिकारी आणि नेत्यांच्या प्रवेश गेल्या काही काळात भाजपमध्ये झालेला आहे ज्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेविरोधात निवडणूक लढवली आहे अथवा ते स्थानिक पातळीवर शिंदेंच्या नेत्यांचे कट्टर विरोधक आहेत.

 

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात संग्राम थोपटे यांचा एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार विजय शिवतारे यांनी पराभव केला होता. मात्र निवडणूक झाल्यानंतरच्या काही महिन्यातच संग्राम थोपटे यांना भाजपमध्ये सामावून घेण्यात आलं. दुसरीकडे आज मंगळवारी मुंबईत एक महत्त्वाचा प्रवेश सोहळा पार पडला. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराला तगडे आव्हान देणाऱ्या वैशाली सूर्यवंशी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

 

वैशाली सूर्यवंशी यांनी ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत एकनाथ शिंदे यांचे उमेदवार किशोर पाटील यांना कडवे आव्हान दिले होते. वैशाली सूर्यवंशी या किशोर पाटील यांच्या सख्ख्या चुलत बहिण आहेत. भावा-बहिणीची ही लढत राज्यभरात चर्चेचा विषय ठरली होती. किशोर पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर वैशाली सूर्यवंशी यांनी ठाकरेंसोबत जाऊन किशोर पाटलांसमोर मोठं आव्हान उभं केलं होतं. पाचोरा-भडगाव मतदारसंघातील प्रमुख महिला नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूर्यवंशी यांनी मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत अधिकृत प्रवेश केला.

 

वैशाली सूर्यवंशी यांनी भाजपात प्रवेश करण्यामागे काही राजकीय आणि स्थानिक कारणे असू शकतात

 

राजकीय स्थैर्य व व्यापक संधी: भाजप सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर विस्तारत आहे. त्यामुळे पक्षाच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे काम करण्याची, सत्ता आणि संसाधनांमध्ये सक्रिय सहभाग मिळवण्याची संधी मिळते.

 

स्थानिक राजकारणातील बदलती समीकरणे: पाचोरा-भडगाव मतदारसंघात स्थानिक गटांतर्फे आणि कुटुंबांमध्ये स्पर्धा दिसून येते. पूर्वी त्यांनी भावाच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यामुळे मजबूत पक्षाची साथ मिळवण्यासाठी त्यांनी भाजपची निवड केली असावी.

 

ठाकरे गटाशी नाराजी: गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात अंतर्गत मतभेद, स्थानिक नेतृत्वातील वाद, किंवा अपेक्षित नेतृत्व स्थान न मिळाल्याने त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असू शकतो.

 

महिला सशक्तीकरणाचा अजेंडा: स्थानिक पातळीवर महिला नेतृत्वांना भाजप जास्त प्रोत्साहन देते, अशी प्रतिमा आहे. त्यामुळे त्यांच्या सामाजिक, राजकीय कार्याला भाजपद्वारे अधिक व्यापक व्यासपीठ मिळेल, असा विश्वास असू शकतो.

 

भविष्यकालीन राजकीय ambitions: आगामी निवडणुका आणि सत्तास्थानी भागीदारीसाठी मजबूत पक्षाची जोड ही महत्त्वाची ठरते, हेही एक कारण असू शकते.

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

5 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

5 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

5 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

5 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

5 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

6 तास ago