मुंबई: भारतीय जनता पक्षाकडून सध्या एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. याचे उदाहरण आपण पाहिले तर अशा अनेक पदाधिकारी आणि नेत्यांच्या प्रवेश गेल्या काही काळात भाजपमध्ये झालेला आहे ज्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेविरोधात निवडणूक लढवली आहे अथवा ते स्थानिक पातळीवर शिंदेंच्या नेत्यांचे कट्टर विरोधक आहेत.
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात संग्राम थोपटे यांचा एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार विजय शिवतारे यांनी पराभव केला होता. मात्र निवडणूक झाल्यानंतरच्या काही महिन्यातच संग्राम थोपटे यांना भाजपमध्ये सामावून घेण्यात आलं. दुसरीकडे आज मंगळवारी मुंबईत एक महत्त्वाचा प्रवेश सोहळा पार पडला. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराला तगडे आव्हान देणाऱ्या वैशाली सूर्यवंशी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
वैशाली सूर्यवंशी यांनी ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत एकनाथ शिंदे यांचे उमेदवार किशोर पाटील यांना कडवे आव्हान दिले होते. वैशाली सूर्यवंशी या किशोर पाटील यांच्या सख्ख्या चुलत बहिण आहेत. भावा-बहिणीची ही लढत राज्यभरात चर्चेचा विषय ठरली होती. किशोर पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर वैशाली सूर्यवंशी यांनी ठाकरेंसोबत जाऊन किशोर पाटलांसमोर मोठं आव्हान उभं केलं होतं. पाचोरा-भडगाव मतदारसंघातील प्रमुख महिला नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूर्यवंशी यांनी मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत अधिकृत प्रवेश केला.
वैशाली सूर्यवंशी यांनी भाजपात प्रवेश करण्यामागे काही राजकीय आणि स्थानिक कारणे असू शकतात
राजकीय स्थैर्य व व्यापक संधी: भाजप सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर विस्तारत आहे. त्यामुळे पक्षाच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे काम करण्याची, सत्ता आणि संसाधनांमध्ये सक्रिय सहभाग मिळवण्याची संधी मिळते.
स्थानिक राजकारणातील बदलती समीकरणे: पाचोरा-भडगाव मतदारसंघात स्थानिक गटांतर्फे आणि कुटुंबांमध्ये स्पर्धा दिसून येते. पूर्वी त्यांनी भावाच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यामुळे मजबूत पक्षाची साथ मिळवण्यासाठी त्यांनी भाजपची निवड केली असावी.
ठाकरे गटाशी नाराजी: गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात अंतर्गत मतभेद, स्थानिक नेतृत्वातील वाद, किंवा अपेक्षित नेतृत्व स्थान न मिळाल्याने त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असू शकतो.
महिला सशक्तीकरणाचा अजेंडा: स्थानिक पातळीवर महिला नेतृत्वांना भाजप जास्त प्रोत्साहन देते, अशी प्रतिमा आहे. त्यामुळे त्यांच्या सामाजिक, राजकीय कार्याला भाजपद्वारे अधिक व्यापक व्यासपीठ मिळेल, असा विश्वास असू शकतो.
भविष्यकालीन राजकीय ambitions: आगामी निवडणुका आणि सत्तास्थानी भागीदारीसाठी मजबूत पक्षाची जोड ही महत्त्वाची ठरते, हेही एक कारण असू शकते.
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील संविदणे गावात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : भारतात सायबर गुन्हेगारीने धोकादायक स्वरूप धारण केले असून, ऑनलाइन फसवणुकीतून उकळलेली…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळसुटी येथे बुधवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने…
नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…
ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…
शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…