महाराष्ट्र

फक्त 20 रुपयांत 4 महिने सुरू राहणार सिमकार्ड; कसे ते जाणून घ्या…

Jio, BSNL, Airtel अन् Vi ग्राहकांचं टेन्शन मिटलं, TRAI चे नवीन नियम

मुंबई: भारतातील अनेकजण दोन सिमकार्ड वापरतात एक मुख्य सिम कॉलिंग आणि डेटासाठी, तर दुसरे आपत्कालीन परिस्थितीसाठी राखून ठेवले जाते. पण जुलै २०२४ मध्ये रिचार्ज दर वाढल्यामुळे हे दुसरे सिम रिचार्ज करून सक्रिय ठेवणे कठीण झाले आहे. यावर TRAI च्या नव्या नियमांनी तोडगा काढला आहे.

२० रुपयांत ४ महिने सक्रिय सिम

TRAI च्या नव्या नियमानुसार, जर सिम कार्ड ९० दिवसांपेक्षा जास्त काळ वापरले गेले नाही, तर फक्त ₹२० कापून ते पुढील ३० दिवसांसाठी सक्रिय ठेवता येईल. यामुळे कमी वापरल्या जाणाऱ्या सिमसाठी मोठा खर्च करण्याची गरज नाही.

9० दिवसांनंतर काय होईल

जर सिम ९० दिवसांपर्यंत वापरले गेले नाही, तर कंपनी १५ दिवसांचा ग्रेस पीरियड देते. यादरम्यान, ग्राहक कस्टमर केअरशी संपर्क साधून किंवा कंपनीच्या स्टोअरला जाऊन सिम पुन्हा सक्रिय करू शकतात.

काय फायदे मिळणार

फक्त ₹२० मध्ये सिम सक्रिय ठेवता येणार.

दुसरे सिम निष्क्रिय होण्याची चिंता मिटणार.

सर्व प्रमुख कंपन्या – Jio, BSNL, Airtel, Vi यांच्याकडून ही सुविधा उपलब्ध

TRAI च्या नियमानुसार, “न वापरणे” म्हणजे जर ९० दिवसांपर्यंत सिमवर कोणत्याही प्रकारचे व्यवहार झाले नाहीत, तर ते निष्क्रिय मानले जाते. यात खालील व्यवहारांचा समावेश होतो.

येणारे आणि जाणारे कॉल्स

मेसेजेस

इंटरनेट डेटा सत्र

व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस (VAS)

कसा वापरायचा ₹20 चा प्लॅन

Jio ग्राहकांसाठी:

Jio ॲप किंवा MyJio वर ₹20 चा रिचार्ज निवडा.

Jio स्टोअरला भेट देऊन सिम सक्रिय करा.

BSNL ग्राहकांसाठी:

BSNL च्या अधिकृत वेबसाइट किंवा ॲपवरून रिचार्ज करा.

BSNL कस्टमर केअरशी संपर्क साधा.

Airtel ग्राहकांसाठी:

Airtel Thanks ॲपवरून ₹20 चा प्लॅन निवडा.

Airtel स्टोअरमध्ये भेट द्या.

Vodafone-Idea (Vi) ग्राहकांसाठी

Vi ॲप किंवा वेबसाइटवरून प्लॅन ॲक्टिव्हेट करा.

कस्टमर केअरवर कॉल करून मार्गदर्शन घ्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आमदार संजय गायकवाडांचे विधान विकृत; कारवाईस सरकार का घाबरते? हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे…

9 मिनिटे ago

हाच का डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भाजपचा आदर? अनंत गाडगीळ यांचा संतप्त सवाल

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक ‘राजगृह’ परिसरातील परिस्थितीवरून काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते…

12 मिनिटे ago

मुंबईत 27-28 एप्रिलला आंतरराष्ट्रीय रिव्हर्स बायर-सेलर मीट; एमएसएमई उद्योगांना निर्यातीच्या नव्या संधी

मुंबई: महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादिततर्फे महाराष्ट्र शासनाच्या ‘रॅम्प’ (रायझिंग अँड ॲक्सेलेरेटिंग एमएसएमई परफॉर्मन्स) उपक्रमांतर्गत…

15 मिनिटे ago

शिरूर तालुक्यात अवैध दारूविरोधात पोलिसांची धडक मोहीम; विविध ठिकाणी छापे…

शिरूर : अवैध धंदे बंद करण्यासाठी व इतर मागण्यांसाठी शिरूरमध्ये निलेश वाळुंज यांचे सत्याग्रह आंदोलन…

1 तास ago

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

22 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

22 तास ago