महाराष्ट्र

फक्त 20 रुपयांत 4 महिने सुरू राहणार सिमकार्ड; कसे ते जाणून घ्या…

Jio, BSNL, Airtel अन् Vi ग्राहकांचं टेन्शन मिटलं, TRAI चे नवीन नियम

मुंबई: भारतातील अनेकजण दोन सिमकार्ड वापरतात एक मुख्य सिम कॉलिंग आणि डेटासाठी, तर दुसरे आपत्कालीन परिस्थितीसाठी राखून ठेवले जाते. पण जुलै २०२४ मध्ये रिचार्ज दर वाढल्यामुळे हे दुसरे सिम रिचार्ज करून सक्रिय ठेवणे कठीण झाले आहे. यावर TRAI च्या नव्या नियमांनी तोडगा काढला आहे.

२० रुपयांत ४ महिने सक्रिय सिम

TRAI च्या नव्या नियमानुसार, जर सिम कार्ड ९० दिवसांपेक्षा जास्त काळ वापरले गेले नाही, तर फक्त ₹२० कापून ते पुढील ३० दिवसांसाठी सक्रिय ठेवता येईल. यामुळे कमी वापरल्या जाणाऱ्या सिमसाठी मोठा खर्च करण्याची गरज नाही.

9० दिवसांनंतर काय होईल

जर सिम ९० दिवसांपर्यंत वापरले गेले नाही, तर कंपनी १५ दिवसांचा ग्रेस पीरियड देते. यादरम्यान, ग्राहक कस्टमर केअरशी संपर्क साधून किंवा कंपनीच्या स्टोअरला जाऊन सिम पुन्हा सक्रिय करू शकतात.

काय फायदे मिळणार

फक्त ₹२० मध्ये सिम सक्रिय ठेवता येणार.

दुसरे सिम निष्क्रिय होण्याची चिंता मिटणार.

सर्व प्रमुख कंपन्या – Jio, BSNL, Airtel, Vi यांच्याकडून ही सुविधा उपलब्ध

TRAI च्या नियमानुसार, “न वापरणे” म्हणजे जर ९० दिवसांपर्यंत सिमवर कोणत्याही प्रकारचे व्यवहार झाले नाहीत, तर ते निष्क्रिय मानले जाते. यात खालील व्यवहारांचा समावेश होतो.

येणारे आणि जाणारे कॉल्स

मेसेजेस

इंटरनेट डेटा सत्र

व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस (VAS)

कसा वापरायचा ₹20 चा प्लॅन

Jio ग्राहकांसाठी:

Jio ॲप किंवा MyJio वर ₹20 चा रिचार्ज निवडा.

Jio स्टोअरला भेट देऊन सिम सक्रिय करा.

BSNL ग्राहकांसाठी:

BSNL च्या अधिकृत वेबसाइट किंवा ॲपवरून रिचार्ज करा.

BSNL कस्टमर केअरशी संपर्क साधा.

Airtel ग्राहकांसाठी:

Airtel Thanks ॲपवरून ₹20 चा प्लॅन निवडा.

Airtel स्टोअरमध्ये भेट द्या.

Vodafone-Idea (Vi) ग्राहकांसाठी

Vi ॲप किंवा वेबसाइटवरून प्लॅन ॲक्टिव्हेट करा.

कस्टमर केअरवर कॉल करून मार्गदर्शन घ्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर सरकारचा बुलडोझर; जीआर मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; अतुल लोंढे

सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…

10 तास ago

पोटात होणाऱ्या या समस्येमुळे मेंदुवर पडतो वाईट प्रभाव, जाणून घ्या कसा कराल बचाव

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…

11 तास ago

आल्याचा वापर करून शरीरातील Uric Acid करू शकता कमी

आजकाल शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…

11 तास ago

बेलाचे सरबत आरोग्यासाठी फायदेशीर

पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…

11 तास ago

ठाण्यातील ९०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम फास्टट्रॅकवर पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…

11 तास ago

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या विकासाला गती; ५०० कोटींच्या आराखड्यासाठी म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…

12 तास ago