ठाणे: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ठाणे जिल्ह्यात मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) अंतर्गत नियोजित कामे 100 टक्के पूर्ण करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आली.
ठाणे जिल्ह्यात नोंदणीकृत असलेल्या 74 लाख 50 हजार 515 मतदारांचे 100 टक्के EF प्रिंट काढण्यात आले आहे. त्यानंतर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या माध्यमातून EF डिजिटायझेशनचे काम सुरू असून, आतापर्यंत 45 लाख 88 हजार 756 मतदारांचे म्हणजेच 61.59 टक्के डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे.
जिल्ह्यात एकूण 6 हजार 894 मतदार यादी भाग असून, तेवढ्याच संख्येने BLO कार्यरत आहेत. सर्व BLOना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले असून, मतदार यादीतील सर्व भागांचे EF डाउनलोड करण्याचे कामही पूर्ण करण्यात आले आहे.
या मोहिमेत जिल्हा निवडणूक अधिकारी, महापालिका आयुक्त, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, BLO, सहाय्यक, पर्यवेक्षक, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि प्रसारमाध्यमांचे सहकार्य लाभले.
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी संपूर्ण प्रक्रियेवर सातत्याने लक्ष ठेवून अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी विविध पथकांमध्ये समन्वय साधत क्षेत्रीय स्तरावरील अडचणी दूर करून कामाला गती दिली.
अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन तसेच मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, BLO आणि जिल्हा निवडणूक शाखेतील कर्मचाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नांमुळे SIR अंतर्गत निर्धारित उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यात आले. या कामगिरीबद्दल ठाणे जिल्हा प्रशासनाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
मुंबई : माती आणि जलसंधारणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने…
मुंबई: विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच आरोग्य सुविधा आणि विद्यार्थीपूरक वातावरण उपलब्ध करून देणे ही विद्यापीठांची जबाबदारी आहे.…
मुंबई: २२व्या कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिप-२०२६ मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सुवर्णपदक…
मुंबई: पुणे येथे २०३२ मध्ये ‘यूसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप’ आयोजित करण्यासाठी निविदा सादर करण्यास महाराष्ट्र…
मुंबई : दादर रेल्वे स्थानक परिसरात लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी आणि मंगळसूत्र चोरीच्या सलग घटनांनी रेल्वे…
मुंबई: लावणी म्हणजे महाराष्ट्राच्या मातीतून जन्मलेली कला. तिच्या ठेक्यात महाराष्ट्राचा इतिहास आहे, शब्दांत लोकजीवन आहे…