मुंबई: राज्यातील एसटी बसस्थानके आणि एसटी प्रवास महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी अधिक सुरक्षित करण्याच्या मागणीची परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी गंभीर दखल घेतली आहे. बसस्थानकांवरील सुविधा आणि आवश्यक सुधारणांचा आढावा घेऊन सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश परिवहन विभाग आणि एसटी महामंडळाच्या प्रशासनाला देण्यात आले आहेत.
विधान परिषद सदस्या तथा माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यासंदर्भात मंत्री सरनाईक यांना निवेदन दिले. महिला प्रतिनिधींनी राज्यातील २० जिल्ह्यांमधील ८७ बसस्थानकांची पाहणी केली असून, अनेक ठिकाणी महिला प्रवाशांसाठी आवश्यक सुविधांमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचे निदर्शनास आणून दिले.
या पाहणीत स्वच्छतागृहे, हिरकणी कक्ष, पिण्याचे पाणी, दिव्यांगांसाठी रॅम्प, प्रकाशव्यवस्था, सुरक्षा रक्षक, पोलीस गस्त, सीसीटीव्ही तसेच महिला कर्मचाऱ्यांसाठी विश्रांतीगृह या सुविधांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
महिला सुरक्षेसाठी सर्व प्रमुख बसस्थानकांचे सुरक्षा ऑडिट करावे, चालक-वाहक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना लिंगसंवेदनशीलतेचे प्रशिक्षण द्यावे, छळाच्या घटनांवर तातडीने कारवाई करण्यासाठी स्पष्ट एसओपी तयार करावी, हेल्पलाईन व तक्रार यंत्रणेची माहिती ठळकपणे प्रदर्शित करावी आणि विभागीय स्तरावर नोडल अधिकारी नियुक्त करावेत, अशी मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली.
दरम्यान, महिला प्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच परिवहन विभाग आणि एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत विशेष आढावा बैठक घेण्याचे आश्वासन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. सार्वजनिक वाहतुकीतील महिला सुरक्षेबाबत अक्षरा सेंटरच्या सह-संचालिका डॉ. नंदिता शहा यांच्या कामाचाही निवेदनात उल्लेख करण्यात आला.
“सुरक्षित प्रवास हा महिला प्रवाशांचा अधिकार आहे. सर्व संबंधित विभाग आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयातून कालबद्ध कृती आराखडा राबविल्यास राज्यातील एसटी सेवा अधिक सुरक्षित आणि प्रवासीस्नेही होईल,” असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.
मुंबई : माती आणि जलसंधारणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने…
मुंबई: विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच आरोग्य सुविधा आणि विद्यार्थीपूरक वातावरण उपलब्ध करून देणे ही विद्यापीठांची जबाबदारी आहे.…
मुंबई: २२व्या कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिप-२०२६ मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सुवर्णपदक…
मुंबई: पुणे येथे २०३२ मध्ये ‘यूसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप’ आयोजित करण्यासाठी निविदा सादर करण्यास महाराष्ट्र…
मुंबई : दादर रेल्वे स्थानक परिसरात लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी आणि मंगळसूत्र चोरीच्या सलग घटनांनी रेल्वे…
मुंबई: लावणी म्हणजे महाराष्ट्राच्या मातीतून जन्मलेली कला. तिच्या ठेक्यात महाराष्ट्राचा इतिहास आहे, शब्दांत लोकजीवन आहे…