ST
जालना: औरंगाबाद-जालना महामार्गावरील वरुड काजी फाट्याजवळ स्मार्ट बसने पेट घेतल्याची घटना उघडीस आली असून बस मधील लहान मुलासह 7 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.
सविस्तर माहिती अशी की, स्मार्ट बसच्या पुढील डाव्या टायरमध्ये आवाज येत असल्यामुळे चालकाने बस डाव्या बाजूला उभी करुन बसमध्ये आवाज कशाचा येतोय हे पाहण्यासाठी खाली उतरले असता त्यांना इंजिनच्या खालून धूर येत असल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांनी गाडीतील पूर्ण प्रवाशांना मागील दरवाजाने खाली उतरवले.
सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेत बस पूर्णपणे जळून खाक झाली. चिकलठाणा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने या घटनेचा तपास सुरु आहे. गाडीमध्ये असलेल्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट होऊन ही आग लागली असावी, असा चालकाचा प्राथमिक अंदाज आहे.
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे क्रिकेट स्पर्धेदरम्यान झालेल्या फायरींग प्रकरणातील दोन मुख्य…
संवेदनशीलता आणि मानवतेचे दर्शन घडवणारी घटना जेजुरी: जेजुरी येथे दर्शनासाठी आलेली तीन वर्षांची चिमुकली हरवल्याने काही…
शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद…
नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…
शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…
सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…