ST
जालना: औरंगाबाद-जालना महामार्गावरील वरुड काजी फाट्याजवळ स्मार्ट बसने पेट घेतल्याची घटना उघडीस आली असून बस मधील लहान मुलासह 7 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.
सविस्तर माहिती अशी की, स्मार्ट बसच्या पुढील डाव्या टायरमध्ये आवाज येत असल्यामुळे चालकाने बस डाव्या बाजूला उभी करुन बसमध्ये आवाज कशाचा येतोय हे पाहण्यासाठी खाली उतरले असता त्यांना इंजिनच्या खालून धूर येत असल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांनी गाडीतील पूर्ण प्रवाशांना मागील दरवाजाने खाली उतरवले.
सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेत बस पूर्णपणे जळून खाक झाली. चिकलठाणा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने या घटनेचा तपास सुरु आहे. गाडीमध्ये असलेल्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट होऊन ही आग लागली असावी, असा चालकाचा प्राथमिक अंदाज आहे.
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…
मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…
मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…
मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…