जालना: औरंगाबाद-जालना महामार्गावरील वरुड काजी फाट्याजवळ स्मार्ट बसने पेट घेतल्याची घटना उघडीस आली असून बस मधील लहान मुलासह 7 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.
सविस्तर माहिती अशी की, स्मार्ट बसच्या पुढील डाव्या टायरमध्ये आवाज येत असल्यामुळे चालकाने बस डाव्या बाजूला उभी करुन बसमध्ये आवाज कशाचा येतोय हे पाहण्यासाठी खाली उतरले असता त्यांना इंजिनच्या खालून धूर येत असल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांनी गाडीतील पूर्ण प्रवाशांना मागील दरवाजाने खाली उतरवले.
सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेत बस पूर्णपणे जळून खाक झाली. चिकलठाणा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने या घटनेचा तपास सुरु आहे. गाडीमध्ये असलेल्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट होऊन ही आग लागली असावी, असा चालकाचा प्राथमिक अंदाज आहे.
वाघोली (प्रतिनिधी) शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मजबूत असुन या दोन्ही तालुक्यात…
शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी शिरुर येथे मंगळवार…
शिरुर (तेजस फडके) 'गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवत आहात. तुम्ही १५ वर्षे खासदार असताना…
शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ शिरुर…
कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील औद्योगीक वसाहतीमध्ये काही ठिकाणी अवैधरीत्या गांजाची चोरुन…
शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील शेतकरी संतोष सुभाष चौधरी यांनी विषारी औषध…