महाराष्ट्र

अध्यात्म समाजाला सकारात्मक ऊर्जा देते; डॉ. नीलम गोऱ्हे

समाज हिंसा आणि द्वेषापासुन मुक्त करण्याची प्रेरणा मिळते

मुंबई: सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित ‘श्रीगुरू पादुका दर्शन उत्सव’ हा भक्तिभावाने संपन्न होत असून, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही या भक्तिमय सोहळ्यास हजेरी लावली. त्या म्हणाल्या, “अध्यात्म समाजाला सकारात्मक ऊर्जा देण्याचे मोठे साधन आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून भक्तांना विविध महान गुरूंच्या पादुकांचे दर्शन घेण्याची संधी मिळते, हे निश्चितच स्तुत्य आहे.” ८ आणि ९ मार्च रोजी वरळी येथील NSCI डोममध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला असून, देशभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येत आहेत.

उत्सवामध्ये २१ महान गुरूंच्या पादुकांचे भव्य मंदिरे उभारण्यात आली असून, श्रद्धाळूंना पवित्र वातावरणाचा अनुभव घेता यावा, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. प्रकाशयोजना, भक्तिमय संगीत आणि आकर्षक सजावटीमुळे संपूर्ण परिसर आध्यात्मिक चैतन्याने भारलेला आहे.

डॉ. नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या, “अध्यात्म हे मनःशांती व सामाजिक एकतेसाठी प्रेरणादायी ठरते. समाज हिंसा व द्वेषापासुन मुक्त व्हावी ही विविध गुरूंच्या शिकवणी आपल्याला उत्तम जीवन मूल्ये शिकवतात आणि समाजाला समतोल, सौहार्दपूर्ण जीवन जगण्याची दिशा दाखवतात. ‘सकाळ माध्यम समूहा’ने हा अनोखा उपक्रम राबवून भक्तांसाठी मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे म्हणुन सकाळ माध्यम समुह व सकाळ टीमचे त्यांनी अभिनंदन केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर सरकारचा बुलडोझर; जीआर मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; अतुल लोंढे

सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…

4 तास ago

पोटात होणाऱ्या या समस्येमुळे मेंदुवर पडतो वाईट प्रभाव, जाणून घ्या कसा कराल बचाव

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…

5 तास ago

आल्याचा वापर करून शरीरातील Uric Acid करू शकता कमी

आजकाल शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…

5 तास ago

बेलाचे सरबत आरोग्यासाठी फायदेशीर

पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…

5 तास ago

ठाण्यातील ९०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम फास्टट्रॅकवर पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…

5 तास ago

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या विकासाला गती; ५०० कोटींच्या आराखड्यासाठी म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…

5 तास ago