ठाणे: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील जमिनीच्या टीडीआर प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचा निर्णय घेत मोठा दिलासा दिला आहे. दोन्ही पक्षांची बाजू आणि कागदपत्रे तपासून अंतिम निर्णय होईपर्यंत संबंधित टीडीआर व्यवहाराला तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
धनकवडी येथील जमिनीच्या वादाबाबत उषा चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केला होता. तसेच त्यांचे पती दत्तात्रय कडू देशमुख यांनीही पुण्यात प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडली होती.
गेल्या २६ वर्षांपासून या जमिनीचा वाद न्यायालयात सुरू होता. अखेरीस न्यायालयाने त्यांचा मुलगा हृदयनाथ याचा जमिनीवरील दावा मान्य केला. मात्र, त्यानंतरही पुण्यातील गोयल गंगा या खासगी विकासकाने या जमिनीचा टीडीआर आपल्या नावे करून घेतल्याचा आरोप करत उषा चव्हाण यांनी न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती.
या मागणीसाठी उषा चव्हाण आज आपल्या मुलासह ठाण्यातील आनंदआश्रम येथे आल्या होत्या. तेथे उपस्थित शिवसैनिकांना त्यांनी आपली भूमिका सांगितली. त्यानंतर अभिनेते-निर्माते मंगेश देसाई यांनी त्यांचे म्हणणे समजून घेत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवला.
यानंतर शिंदे यांनी नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डी. गोविंदराज यांच्याशी संपर्क साधून पुणे महानगरपालिकेने केलेल्या टीडीआर व्यवहाराला तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश दिले. तसेच संबंधित दोन्ही पक्ष, विकासक आणि पुणे महापालिकेची स्वतंत्र सुनावणी घेण्यात यावी आणि सर्वांनी आपली कागदपत्रे सादर करावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगेश देसाई यांच्या फोनवरून उषा चव्हाण यांच्याशी संवाद साधत, “कुणावरही अन्याय होऊ देणार नाही,” असे आश्वासन दिले. पुढील सुनावणीवेळी सर्व कागदपत्रांची तपासणी करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.यावेळी उषा चव्हाण यांनी आपल्या प्रश्नाची तत्काळ दखल घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे आणि मंगेश देसाई यांचे आभार मानले. तसेच स्वर्गीय आनंद दिघे यांच्या कार्याचा वारसा शिंदे पुढे नेत असल्याचे सांगत, आता या प्रकरणात न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष NDAसोबत जाणार…
उन्हाळ्यात शरीराला आतून थंडगार ठेवण्यासाठी आपण आहारात दही - ताकाचा समावेश करतो. या दिवसांत दही…
२४ तासात मनुष्य किती वेळा श्वास घेतो? मानवी शरीर प्रत्यक्षात एखाद्या रहस्याहून कमी नाही. किंबहुना…
किडनी स्टोनचा त्रास खूप भयंकर आणि असह्य असतो. चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी सोबतच कमी पाणी पिण्याची…
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. शिंदे गटाचे…
पुणे : आंबेगाव तालुक्यात अंगणवाडीतील चिमुकल्यांना आणि स्तनदा मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या दर्जावर प्रश्न…