महाराष्ट्र

भोंदू बाबावर कडक कारवाई होणारच; आनंद परांजपे यांचा इशारा

ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणावरून आक्रमक भूमिका घेत विकास लवांडे यांच्यावर जोरदार टीका केली. “गांडुळासारखी वळवळ बंद करा,” असा थेट टोला लगावत त्यांनी महायुती सरकारकडून कठोर कारवाई सुरू असल्याचे स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या प्रकरणावर सविस्तर माहिती देत, भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात याला मदत करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केल्याचे परांजपे म्हणाले. गृहमंत्री म्हणून स्वतः फडणवीस या प्रकरणावर लक्ष ठेवून असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, रुपाली चाकणकर यांनी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचा उल्लेख करत, “निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे,” अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

विकास लवांडे यांनी केलेल्या आरोपांवर पलटवार करताना परांजपे म्हणाले की, “पहिल्या दिवसापासून सातत्याने आरोप करणाऱ्या लवांडेंच्या वक्तव्यांमागे रोहित पवार यांचा प्रभाव आहे का?” अशी शंका उपस्थित होते. तसेच त्यांनी सुनील तटकरे यांना सह-आरोपी करण्याच्या मागणीवरही टीका केली.याचबरोबर त्यांनी माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावरही प्रश्न उपस्थित करत, “त्या काळात ट्रस्टला पाणी कोणाच्या आदेशाने दिलं?” असा सवाल केला.

पक्ष नेतृत्वावर बोलताना परांजपे यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार घेत होते आणि आता ती जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर आहे. “आमचा पक्ष ठाम नेतृत्वाखाली चालतो; पण तुमचा पक्ष नेमका कोण चालवतो?” असा सवाल करत त्यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे यांचा उल्लेख केला.

सामाजिक कार्यकर्त्यांना आवाहन करताना त्यांनी सांगितले की, अंजली दमानिया यांच्यासह ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांनी SIT कडे सादर करावेत. तसेच सुषमा अंधारे यांनी त्यांच्या पक्षातील अंतर्गत प्रश्नांवरही बोलावे, असा टोला त्यांनी लगावला.शेवटी, “नुसता हवेत गोळीबार करू नका; ठोस पुरावे द्या. SIT मार्फत प्रत्येक बाबीची निष्पक्ष चौकशी होईल,” असे ठाम आवाहन परांजपे यांनी केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा फायरींग प्रकरणातील दोन मुख्य सराईत आरोपी साताऱ्यातून जेरबंद

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे क्रिकेट स्पर्धेदरम्यान झालेल्या फायरींग प्रकरणातील दोन मुख्य…

1 तास ago

जेजुरी पोलिसांच्या तत्परतेमुळे हरवलेली चिमुकली सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन

संवेदनशीलता आणि मानवतेचे दर्शन घडवणारी घटना जेजुरी: जेजुरी येथे दर्शनासाठी आलेली तीन वर्षांची चिमुकली हरवल्याने काही…

2 तास ago

पारोडीतील जिओ टॉवर रात्री बंद; संतप्त ग्रामस्थांचा टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा

शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद…

3 तास ago

आठवडे बाजारातील चोऱ्यांना आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांची विशेष मोहीम

नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…

4 तास ago

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरुर तालुका अध्यक्षपदी सागर रोकडे तर उपाध्यक्षपदी सुनिल जिते

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…

5 तास ago

जास्त वेळ झोपल्याने शरीरावर काय होतो परिणाम

सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…

6 तास ago