महाराष्ट्र

भोंदू बाबावर कडक कारवाई होणारच; आनंद परांजपे यांचा इशारा

ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणावरून आक्रमक भूमिका घेत विकास लवांडे यांच्यावर जोरदार टीका केली. “गांडुळासारखी वळवळ बंद करा,” असा थेट टोला लगावत त्यांनी महायुती सरकारकडून कठोर कारवाई सुरू असल्याचे स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या प्रकरणावर सविस्तर माहिती देत, भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात याला मदत करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केल्याचे परांजपे म्हणाले. गृहमंत्री म्हणून स्वतः फडणवीस या प्रकरणावर लक्ष ठेवून असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, रुपाली चाकणकर यांनी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचा उल्लेख करत, “निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे,” अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

विकास लवांडे यांनी केलेल्या आरोपांवर पलटवार करताना परांजपे म्हणाले की, “पहिल्या दिवसापासून सातत्याने आरोप करणाऱ्या लवांडेंच्या वक्तव्यांमागे रोहित पवार यांचा प्रभाव आहे का?” अशी शंका उपस्थित होते. तसेच त्यांनी सुनील तटकरे यांना सह-आरोपी करण्याच्या मागणीवरही टीका केली.याचबरोबर त्यांनी माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावरही प्रश्न उपस्थित करत, “त्या काळात ट्रस्टला पाणी कोणाच्या आदेशाने दिलं?” असा सवाल केला.

पक्ष नेतृत्वावर बोलताना परांजपे यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार घेत होते आणि आता ती जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर आहे. “आमचा पक्ष ठाम नेतृत्वाखाली चालतो; पण तुमचा पक्ष नेमका कोण चालवतो?” असा सवाल करत त्यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे यांचा उल्लेख केला.

सामाजिक कार्यकर्त्यांना आवाहन करताना त्यांनी सांगितले की, अंजली दमानिया यांच्यासह ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांनी SIT कडे सादर करावेत. तसेच सुषमा अंधारे यांनी त्यांच्या पक्षातील अंतर्गत प्रश्नांवरही बोलावे, असा टोला त्यांनी लगावला.शेवटी, “नुसता हवेत गोळीबार करू नका; ठोस पुरावे द्या. SIT मार्फत प्रत्येक बाबीची निष्पक्ष चौकशी होईल,” असे ठाम आवाहन परांजपे यांनी केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेला उद्घाटन; प्रवास ३० मिनिटांनी जलद, टोलवाढ नाही

मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…

12 तास ago

आपली बस, आपली सेवा १ मे पासून एसटीचे नवे अभियान;  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…

17 तास ago

महापुरुषांच्या अपमानावर सरकार गप्प का? वडेट्टीवारांचा संतप्त सवाल

नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…

17 तास ago

पनवेलमध्ये ९ दिवसीय मोफत अभिनय प्रशिक्षण शिबिर; नोंदणी ५ मेपर्यंत

पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…

17 तास ago

तेलंगणात एसटी विलीनीकरणाचा ऐतिहासिक निर्णय; महाराष्ट्र सरकारवर काँग्रेसची टीका

मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…

17 तास ago

VSI चे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; संशोधन सहकार्याचा नवा मार्ग खुला होणार

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…

19 तास ago