महाराष्ट्र

१० वी, १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार 10 हजार रुपये शैक्षणिक शिष्यवृत्ती, असा करा अर्ज

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १०वी आणि १२वीचे निकाल जाहीर केले आहेत. या निकालांसोबतच, राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाच्या एका विशेष शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत, १०वी किंवा १२वीच्या परीक्षेत ५० टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना मदत दिली जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थी पुढील शिक्षणाच्या तयारीला लागले आहेत. अशातच, राज्य सरकारकडून राबवण्यात येणारी एक विशेष शिष्यवृत्ती योजना गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे. ‘महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा’मार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबवली जाते. या योजनेनुसार, पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट १० हजार रुपयांची रक्कम जमा केली जाते.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ (MBOCWW) नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवते. त्यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे ‘इयत्ता १०वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य’. या योजनेचा मुख्य उद्देश बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवणे आणि त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हा आहे. या योजनेअंतर्गत, एका नोंदणीकृत कामगाराच्या अधिकतम दोन मुलांना १०वी किंवा १२वीच्या परीक्षेत ५० टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळाल्यास शिष्यवृत्ती दिली जाते.

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये

१०वी किंवा १२वीच्या परीक्षेत ५०% किंवा अधिक गुण मिळवल्यास १०,००० रुपयांची आर्थिक मदत.

बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न.

श्रमिक कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून देणे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:

विद्यार्थ्याचे पालक (आई किंवा वडील) महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत असावेत.

विद्यार्थी आणि त्याचे कुटुंब महाराष्ट्राचे कायम रहिवासी असावेत.

अर्जदाराला १०वी किंवा १२वीच्या परीक्षेत किमान ५० टक्के गुण मिळालेले असावेत.

एका कामगाराच्या केवळ दोन पाल्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.

अर्ज कसा करावा?

या शिष्यवृत्तीसाठी अर्ज प्रक्रिया सध्या ऑफलाइन पद्धतीने राबवली जाते. अर्ज करण्यासाठी खालील टप्प्यांचे अनुसरण करा:

टप्पा १: अर्ज डाउनलोड करणे

सर्वप्रथम, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या (MBOCWW) अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

वेबसाइटवरील ‘Welfare Scheme’ या टॅबवर क्लिक करा.

येथे ‘Education’ या पर्यायाखाली ’10th to 12th Student’s 10,000/yr’ या लिंकवर क्लिक करा.

त्यानंतर ‘Download Form’ या बटणावर क्लिक करून अर्ज डाउनलोड करा.

टप्पा २: अर्ज भरणे

अर्जात कामगाराचे नाव, नोंदणी क्रमांक, नोंदणीची तारीख, आधार क्रमांक, मोबाईल नंबर आणि पत्ता अचूकपणे भरा.

त्यानंतर विद्यार्थ्याची माहिती, जसे की नाव, लिंग, जन्मतारीख, शाळा/कॉलेजचे नाव आणि आधार क्रमांक नमूद करा.

पहिल्या किंवा दुसऱ्या पाल्यासाठी अर्ज करत आहात, याचा उल्लेख करा.

टप्पा ३: बँक खात्याचा तपशील

विद्यार्थ्याच्या बँक खात्याचे नाव, शाखेचे नाव, बँकेचे नाव आणि IFSC कोड भरा.

येथे केवळ आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्याचाच तपशील द्या.

टप्पा ४: अर्ज सादर करणे

पूर्ण भरलेला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे जोडून तो तुमच्या जिल्ह्यातील कामगार आयुक्त किंवा सरकारी कामगार कार्यालयात जमा करा.

अर्ज जमा केल्यानंतर कार्यालयातून पावती घ्यायला विसरू नका. या पावतीवर अर्ज जमा केल्याची तारीख आणि एक युनिक क्रमांक असेल.

पालकांचा कामगार नोंदणी क्रमांक

विद्यार्थ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे ओळखपत्र

बँक पासबुकची प्रत (आधार लिंक असलेले)

१०वी किंवा १२वीची गुणपत्रिका (किमान ५०% गुणांसह)

आधार कार्ड

रहिवासी प्रमाणपत्र

सध्याच्या इयत्तेतील प्रवेशाची पावती

शाळा/कॉलेजचे ओळखपत्र

शाळा किंवा कॉलेजकडून मिळवलेले बोनाफाईड प्रमाणपत्र

७५ टक्के उपस्थितीचा दाखला

लाभाची रक्कम जमा झाली की नाही, हे कसे तपासावे?

शिष्यवृत्तीची रक्कम तुमच्या खात्यात जमा झाली आहे की नाही, याची माहिती तुम्ही ऑनलाइन तपासू शकता.

मंडळाच्या अधिकृत पोर्टलवर जा.

मुख्यपृष्ठावरील ‘Various Scheme Benefits Transferred’ या लिंकवर क्लिक करा.

तुमचा जिल्हा, नाव, खाते क्रमांक किंवा IFSC कोड टाकून तुम्ही तुमची स्थिती तपासू शकता.

येथे ‘Scheme’ या पर्यायामध्ये ‘E02’ हा कोड निवडण्याचे लक्षात ठेवा.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आपली बस, आपली सेवा १ मे पासून एसटीचे नवे अभियान;  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…

3 तास ago

महापुरुषांच्या अपमानावर सरकार गप्प का? वडेट्टीवारांचा संतप्त सवाल

नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…

3 तास ago

पनवेलमध्ये ९ दिवसीय मोफत अभिनय प्रशिक्षण शिबिर; नोंदणी ५ मेपर्यंत

पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…

3 तास ago

तेलंगणात एसटी विलीनीकरणाचा ऐतिहासिक निर्णय; महाराष्ट्र सरकारवर काँग्रेसची टीका

मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…

3 तास ago

VSI चे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; संशोधन सहकार्याचा नवा मार्ग खुला होणार

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…

5 तास ago

जन्मभूमीतून कर्मभूमीकडे! गोदा ते नर्मदा जलयात्रा; नारीशक्ती आणि विकासाचा नवा महामंत्र

अहिल्यानगर: नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नसून ऊर्जा, श्रद्धा आणि सृष्टीचा आधार आहे—आणि म्हणूनच नदी…

6 तास ago