महाराष्ट्र

ब्रम्हपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांचे तातडीने निलंबन करावे

या पोलिस अधिकाऱ्यांविरोधात चौकशी करून कारवाई करण्यात येईल,तोपर्यंत पदावरून हटवण्यात आल्याची घोषणा मंत्र्यांनी केली

नागपूर: ब्रम्हपुरी पोलिस स्थानकातील उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव हे भ्रष्ट आहेत.अनेक प्रकरणात त्यांच्यावर आरोप झाले असून चौकशी झाली आहे.या अधिकाऱ्याचे तातडीने निलंबन करण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली.

लक्षवेधीच्या माध्यमातून विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी पोलिस स्थानकातील राकेश जाधव हा अत्यंत नियमबाह्य काम करत आहे. रात्री गस्तीवर असताना वाळूने भरलेला ट्रक दहा दिवस पकडून ठेवला. ट्रकमालकाशी आर्थिक देवाणघेवाण झाल्यानंतर गुन्हा न दाखल करता ट्रॅक सोडून दिला.ब्रम्हपुरी मध्ये वाळू तस्करांचा धुमाकुळ सुरू असताना हा पोलिस अधिकारी माज करत माझं कोणी वाकड करू शकत नाही अशा आवेशात कारवाया करत आहे. अशा भ्रष्ट अधिकाऱ्याचे तातडीने निलंबन करावे म्हणून वडेट्टीवार विधानसभेत आक्रमक झाले. गृहराज्यमंत्री कारवाईचे निर्देश देत नसल्यामुळे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार विधानसभेच्या वेलमध्ये जात कारवाईची मागणी केली.

लक्षवेधीच्या उत्तराला गृहराज्यमंत्री यांनी सबंधित पोलिसाविरोधात विभागीय चौकशी सुरू असून अहवाल आल्यावर कारवाई करू असे आश्वासन दिले. यावर विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतला. जाधव हे जर त्याच पोलिस स्थानकात कार्यरत राहिले तर चौकशीवर परिणाम करू शकतात म्हणून त्यांना त्या पदावरून हटवण्यात यावे ही मागणी केली. तेव्हा गृहराज्यमंत्री यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांना तात्काळ त्यांच्या पदावरून हटवण्यात येईल असे आश्वासन सभागृहात दिले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुरचे PI विनोद पाटील यांच्यासाह डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई

तीन गावठी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त  शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याचा…

10 तास ago

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

17 तास ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

17 तास ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

17 तास ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

17 तास ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

17 तास ago