महाराष्ट्र

धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याच्या संकेतांवर सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई: त्या माऊलीची काय चूक आहे. 21 ऑक्टोंबर 2023 रोजी महादेव मुंडेंची हत्या झाली. अद्याप आरोपी सापडलेले नाहीत, म्हणून आता विष पिऊन झालं. मुख्यमंत्र्यांनी कुटुंबियांना भेटीची वेळ दिलेली आहे.

मुख्यमंत्र्यांसमोर गाऱ्हाण मांडल्यानंतर त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे” असं बीडचे आमदार सुरेश धस म्हणाले. आकाची टोळी सक्रीय आहे, आका जेलमधून कारभार हाकतो या प्रश्नावर सुरेश धस म्हणाले की, “मी यावर बऱ्याचवेळा बोललो आहे. यामुळे आता बोलायचं नाही. जेलमध्ये एक स्पेशल फोन सुद्धा सापडला आहे. मी मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहे. तो छोटा फोन जो आका वापरत होते, त्याचे डिटेल्स घेतलेत, तर बऱ्याच गोष्टी बाहेर येतील” असा दावा धस यांनी केला.

“महादेव मुंडे प्रकरण मी बाहेर काढलं. आधी कोणी त्यावर बोलत नव्हतं. सर्वात आधी मी त्यावर बोललो” असा दावा सुरेश धस यांनी केला. अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेण्याचे संकेत दिलेत. कृषी घोटाळ्यात त्यांना दिलासा मिळालाय. त्यावर सुरेश धस म्हणाले की, “या बाबतीत मी बोलू शकत नाही, तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. प्रकाश दादा बोलले आहेत. मला बोलायचं नाही. क्लीन चीट मिळाली असली, तरी काही लोक सुप्रीम कोर्टात जाणार आहेत”

एक घोटाळा नाही

सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल आलाय. पोलिसांवर गन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत. त्या विषयीच्या प्रश्नावर सुरेश धस म्हणाले की, “एवढ्या मोठ्या केसबद्दल माझ्या सारख्या छोट्या माणसाने बोलणं योग्य नाही” कृषी अधिकारी रस्तोगींना तुम्ही पत्र दिलेलं का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. “एखाद्या घोटाळ्यात क्लीनचीट मिळाली असेल. एक घोटाळा नाही. मधल्या कालावधीत एवढी मोठी प्रकरणं आहेत. डीबीटीचा निर्णय डावलून अनेक निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आले. 78 कंपन्या स्थापन केल्या. या सगळ्याची स्वतंत्र एसआयटी स्थापन करुन चौकशी व्हावी” अशी मागणी सुरेश धस यांनी केली. जे चौकशी अधिकारी नेमले त्यांच्यावर मी आक्षेप घेतला होता असं सुरेश धस म्हणाले.

खाली आका बैठका घेत होते

वाल्मिक कराड या घोटाळ्यात आहे का? “100 टक्के त्यांच्याच कालवधीतली ही सगळी प्रकरण आहेत. हे स्वत: किती कृषी खातं चालवत होते हा संशोधनाचा विषय आहे. खाली आका बैठका घेत होते” असं सुरेश धस म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेला उद्घाटन; प्रवास ३० मिनिटांनी जलद, टोलवाढ नाही

मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…

13 तास ago

आपली बस, आपली सेवा १ मे पासून एसटीचे नवे अभियान;  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…

17 तास ago

महापुरुषांच्या अपमानावर सरकार गप्प का? वडेट्टीवारांचा संतप्त सवाल

नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…

18 तास ago

पनवेलमध्ये ९ दिवसीय मोफत अभिनय प्रशिक्षण शिबिर; नोंदणी ५ मेपर्यंत

पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…

18 तास ago

तेलंगणात एसटी विलीनीकरणाचा ऐतिहासिक निर्णय; महाराष्ट्र सरकारवर काँग्रेसची टीका

मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…

18 तास ago

VSI चे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; संशोधन सहकार्याचा नवा मार्ग खुला होणार

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…

20 तास ago