औरंगाबाद: पोलीस दलातील ‘एसीपी’ अधिकाऱ्यानेच नशेत महिलेचा विनयभंग केल्याने नागरिकांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे. अनेक संघटनांनी ढुमे याच्या निलंबनाची मागणी केली आहे. दरम्यान खासदार जलील यांनी मंगळवारी तक्रारदार महिलेच्या कुटुंबाची भेट घेतली. तसेच घडलेल्या घटनेची माहिती जाणून, ढुमे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे आश्वासन त्यांना दिले आहे.
औरंगाबाद बंदची हाक…
खासदार जलील यांनी डीजीपी रजनीश सेठ यांच्याशी संपर्क करुन घडलेल्या घटनेबाबत चर्चा केली आहे. सोबतच ढुमे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच ढुमे यांना बुधवारपर्यंत (18 जानेवारी) निलंबित न केल्यास शुक्रवारी (20 जानेवारी) औरंगाबाद शहरात बंद पाळला जाणार असल्याचा इशारा जलील यांच्याकडून देण्यात आला आहे. सोबतच सर्व राजकीय, सामाजिक संघटना आणि नागरिक एकत्र येऊन हा बंद पाळतील. तसेच शहरातील क्रांतीचौक ते पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येईल असाही इशारा जलील यांनी दिला आहे.
शहरातील नागरिकांत संतापाचे वातावरण!
औरंगाबाद शहरात ज्यांच्यावर सुरक्षेतेची जबाबदारी आहेत तेच पोलीस महिलेचा विनयभंग करत असतील तर नागरिकांनी कोणाकडे मदत मागावी असा प्रश्न औरंगाबादकरांना पडला आहे. त्यामुळे या घटनेने सध्या शहरात मोठ्या संतापाचे वातावरण आहे. तर ढुमे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस दलाकडून याबाबत काय निर्णय घेतला जाणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…
शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…
माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…
श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…
मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…
नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…