महाराष्ट्र

हुतात्मा स्मारकावर टपाल तिकीट प्रकाशित करण्यासाठी पुढाकार घ्या…

मुंबई: महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अजरामर ठरलेल्या आणि महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी हुतात्मा झालेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मारक मुंबईमध्ये १९६१ पासून आहे. फाउंटन येथे दिमाखात उभ्या असलेल्या या स्मारकाच्या रूपाने हा सर्व लढा इतिहासाची कायमस्वरूपी प्रेरणा देत आहे. या हुतात्म्यांच्या स्मारकाच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रकाशित करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महादेव गोविंद उर्फ भाऊ सावंत यांनी केलेली आहे. सन २००४ मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारकडून केंद्र सरकारच्या दूरसंचार मंत्रालयाकडे प्रस्ताव दिला होता. पण यावर अजूनही कोणताही निर्णय झालेला नाही.

हा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करून घेण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने पाठपुरावा करण्यात यावा. हे टपाल तिकीट लवकरात लवकर प्रकाशित करण्याबद्दल राज्य सरकारच्या पातळीवरून कार्यवाही करण्याची विनंतीवजा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

महाराष्ट्र दिनी हुतात्मा स्मारकाजवळ सामाजिक कार्यकर्त्यांनी डॉ. गोऱ्हे यांच्याकडे याबाबत राज्य सरकारने पुढाकार घेण्याबाबत विनंती केली होती. केंद्र सरकारने “मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र लढयाचा इतिहास असणाऱ्या हुतात्मा स्मारकावर टपाल तिकीट प्रकाशित करावे” ही मागणी सन १९९९ पासून होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्य सचिव मनोज सौनिक यांना डॉ. गोऱ्हे यांनी आज पत्र दिले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महाराष्ट्र हादरला! ३ वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणाने संताप

मुंबई: महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. नुकत्याच समोर आलेल्या…

10 मिनिटे ago

बारामती पोटनिवडणूक निकाल! ‘हा शेवट नाही, नव्या बारामतीची सुरुवात’; सुनेत्रा अजित पवार

मुंबई: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना मतदारांनी दाखवलेला विश्वास हा “आदरणीय अजितदादांच्या पवित्र…

14 मिनिटे ago

बीडसह राज्यात अल्पवयीनांवरील अत्याचारांच्या घटनांनी खळबळ; जलद न्याय आणि कडक कारवाईची मागणी तीव्र

पालकांची वाढती चिंता, समाजजागृती आणि यंत्रणांच्या जबाबदारीवर पुन्हा प्रश्नचिन्ह मुंबई: महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या सलग…

24 मिनिटे ago

नसरापूर प्रकरणात वेगवान न्यायासाठी सरकार कटिबद्ध; कुटुंबाच्या पुनर्वसनाची हमी; डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या घटनेने राज्यभर संताप व्यक्त होत असताना,…

15 तास ago

विड्याचे पान सेवन करण्याची पद्धत

जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…

23 तास ago

कढीपत्त्यापासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर

बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…

23 तास ago