महाराष्ट्र

कारकिर्दीच्या यशस्वीतेत टीम वर्क महत्वाचे; मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई: महाराष्ट्र हा माझ्या रक्तात, स्वभावात आणि आचरणात असून कोणत्याही पदावर यशस्वी होण्यासाठी माती आणि संस्कृतीशी एकरुप होणे गरजेचे आहे. आपल्या भारतीय प्रशासकीय सेवेच्या कारकिर्दीत सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबतचे टीम वर्क महत्त्वाचे ठरल्याची भावना मुख्य सचिव राजेश कुमार यांनी व्यक्त केली.

मुख्य सचिव राजेश कुमार 30 नोव्हेंबर 2025 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागामार्फत त्यांचा सेवापूर्ती समारंभ मंत्रालयात आयोजित करण्यात आला. यावेळी सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय अधिकारी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती अधिकारी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ, आयएएस अधिकारी संघटना यांच्यावतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी राजेश कुमार यांच्या पत्नी अर्चना राजेश कुमार, अपर मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, अपर मुख्य सचिव व्ही.राधा यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, मंत्रालयीन अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी भावना व्यक्त करताना मुख्य सचिव राजेश कुमार म्हणाले, मुख्य सचिव पदावर काम करताना आपण सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न केला. 37 वर्षांहून अधिक काळ सेवा करताना विविध विभागांमध्ये आणि शहरांमध्ये काम केले. यादरम्यान राज्याच्या कानाकोपऱ्यातील लोकांना भेटण्याचा योग आला असून हीच आपली ताकद आहे. राज्यातील प्रत्येक अधिकाऱ्याकडे क्षमता आणि अनुभव असून त्यांनी महाराष्ट्र सर्व क्षेत्रांमध्ये अग्रस्थानी नेण्यासाठी एकमेकांना सहकार्य करीत काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

अपर मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मिलिंद म्हैसकर, विकास खारगे, वेणुगोपाल रेड्डी, अपर मुख्य सचिव अश्विनी भिडे, प्रशासकीय अधिकारी निपूण विनायक, सहसचिव डॉ.श्रीकांत पुलकुंडवार, अवर सचिव विठ्ठल भास्कर आदींनी यावेळी मनोगतात राजेश कुमार यांच्या कारकीर्दीचा गौरव करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. सहसचिव विजय चौधरी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पारोडीतील जिओ टॉवर रात्री बंद; संतप्त ग्रामस्थांचा टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा

शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद…

25 मिनिटे ago

आठवडे बाजारातील चोऱ्यांना आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांची विशेष मोहीम

नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…

2 तास ago

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी सागर रोकडे; उपाध्यक्षपदी सुनिल जिते यांची निवड

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…

3 तास ago

जास्त वेळ झोपल्याने शरीरावर काय होतो परिणाम

सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…

3 तास ago

रुद्राक्षाचं पाणी पिण्याचे फायदे

रुद्राक्षाला हिंदू धर्मात फार धार्मिक महत्व आहे. रुद्राक्षाला भगवान शिवाचा आशीर्वाद मानलं जातं. त्यामुळे जास्तीत…

3 तास ago

फडणवीसांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कार द्यावा; मोदी सरकारच्या दाव्यांवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलण्यात पटाईत असून त्यांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कारच दिला…

3 तास ago