महाराष्ट्र

संविधान भारतीय माणसाचा आत्मा आहे; ॲड.अनुराधा परदेशी

ठाणे: आपल्याला बोलायचा ,जगण्याचा,श्वास घ्यायचा अधिकार आहे हे आपण विसरून घेलो होतो.हे सर्व अधिकार आपल्याला आपल्या भारतीय संविधानामुळे परत मिळालेले आहेत. माणसाला माणसा सारख जगण्याचा अधिकार आपल्याला संविधानाने दिलाय, असे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कळवा शाखेने आयोजित केलेल्या संविधान दिनाच्या कार्यक्रमात ज्येष्ठ वकिल अनुराधा परदेशी यांनी प्रमुख वक्त्या म्हणुन संविधानावर बोलताना प्रतिपादन केले.

व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणुन कोमसाप चे कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉ. प्रदिप ढवळ ,ठाणे अध्यक्ष बाळ कांदळकर, कळवा शाखेचे अध्यक्ष निशिकांत महांकाळ, कार्यकारिणी सदस्य ॲड. सुदर्शन साळवी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणुन प्राध्यापक डॉ. प्रदिप ढवळ यांनी आपल्या भाषणात संविधान निर्मितीचा संपुर्ण इतिहास सांगितला. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या प्रकृतीची तमा न बाळगता बनविलेलेले संविधान खरं तर प्रत्येक भारतीयाने आपल्या देवघरात ठेवल पाहिजे, असे मत ढवळ यांनी व्यक्त केले.

कोमसाप कळवा शाखेचे अध्यक्ष निशिकांत महांकाळ यांनी आपल्या प्रस्तावनेत शाखेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सांस्कृतीक भारत च्या संविधान गौरव विशेषांकाचे प्रकाशन या निमित्ताने करण्यात आले.कवी राजेंद्र ठाकुर यांनी संविधानावर कवीता सादर केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

5 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

5 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

5 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

6 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

7 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

7 तास ago