मुंबई: आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मीरा भाईंदर येथे सभा पार पडली, या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा हिंदीच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडत आहे, इतर शाळात मराठी सक्तीची केली पाहिजे. ते सोडून हिंदी सक्तीची करत आहात, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे
‘ 28 सप्टेंबर 2018 नीट ऐका. धुंधार साबरकांठा गुजरात 14 महिन्याच्या मुलीवर बलात्कार झाला. त्यानंतर बिहारी लोकांना मारहाण केली. आणि 20 हजार बिहाऱ्यांना गुजरातमधून हाकलून दिलं. झाल्या का बातम्या. कुठेही बातम्या दिसणार नाही. हा माणूस त्यानंतर याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्याला तिकीट दिलं गेलं. तो आमदारही झाला. म्हणजे यांच्या राज्यात वाटेल ते करणार बाहेरच्या राज्यातील लोकांना आत घेणार नाही, मारणार, आता परत गुजरातमध्ये झालं. बिहारी लोकांना बाहेर काढलं. झाल्या बातम्या? नाही झाल्या. इथे एका मिठाईवाल्याच्या कानाखाली मारल्यावर देशाची बातमी झाली, असा हल्लाबोल यावेळी राज ठाकरे यांनी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले देशात वेगळं चित्र रंगवलं जातं. हे काय राजकारण सुरू आहे? हे लक्षात घ्या. कोणती हिंदी घेऊन बसलो. त्याला फक्त 200 वर्षांचा इतिहास आहे. मराठी भाषेला अडीच ते तीन हजार वर्षांचा इतिहास आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. या शिवतीर्थावर मोदींना मी सांगितलं माझ्या पाच गोष्टी आहेत. त्यात मराठी भाषेला दर्जा द्या. दिला, पण वर्ष झालं एक रुपया मराठी भाषेसाठी आला नाही. एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा असेल तर कमीत कमी ती भाषा 1400 वर्ष जुनी पाहिजे. हिंदीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी अजून 1200 वर्ष आहेत. ती भाषा आमच्यावर आणि मुलांवर लादणार. हिंदी भाषेमुळे हिंदी चित्रपटातील नट नट्यांचं भलं झालं, दुसरं कोणाचं भलं झालं?
उत्तर प्रदेश बिहारमध्ये हिंदी बोलली जाते, मग नोकरी धंद्यासाठी हे लोक महाराष्ट्रात का येतात? तुमच्याच भाषेने तुमचं भलं झालं नसेल, तुम्हाला दुसऱ्या प्रदेशात जाऊन नोकऱ्या कराव्या लागत असतील, गुजरातमध्ये जाऊन मार खावा लागत असेल तर हिंदीने तुमचं काय भलं केलं? कोणती भाषा घेऊन बसलो आपण? आणि त्या भाषेसाठी म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पेटला? मला कारणच नाही कळलं. हे पहिल्यांदा सर्वांनी लक्षात घ्या, असा हल्लाबोल यावेळी राज ठाकरे यांनी केला आहे.
लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…
मुंबई: पेपरफुटी प्रकरणावर न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेला कथित लाठीमार अन्यायकारक असून महाराष्ट्रात…
शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील झेनिथ बायोकेमिकल इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीतून तब्बल ८०० लिटर डिझेल…
मुंबई: देशातील एकूण विद्यार्थी संख्येपैकी ८.६१ टक्के विद्यार्थी महाराष्ट्रात शिक्षण घेत असतानाही ‘समग्र शिक्षा’ योजनेच्या…
सिंदेवाही: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सिंदेवाही येथे काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध…
हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…