महाराष्ट्र

ज्या भाषेने यूपी, बिहारवाल्यांचं भलं केलं नाही त्या भाषेसाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भांडत आहे

मुंबई: आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मीरा भाईंदर येथे सभा पार पडली, या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा हिंदीच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडत आहे, इतर शाळात मराठी सक्तीची केली पाहिजे. ते सोडून हिंदी सक्तीची करत आहात, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे

‘ 28 सप्टेंबर 2018 नीट ऐका. धुंधार साबरकांठा गुजरात 14 महिन्याच्या मुलीवर बलात्कार झाला. त्यानंतर बिहारी लोकांना मारहाण केली. आणि 20 हजार बिहाऱ्यांना गुजरातमधून हाकलून दिलं. झाल्या का बातम्या. कुठेही बातम्या दिसणार नाही. हा माणूस त्यानंतर याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्याला तिकीट दिलं गेलं. तो आमदारही झाला. म्हणजे यांच्या राज्यात वाटेल ते करणार बाहेरच्या राज्यातील लोकांना आत घेणार नाही, मारणार, आता परत गुजरातमध्ये झालं. बिहारी लोकांना बाहेर काढलं. झाल्या बातम्या? नाही झाल्या. इथे एका मिठाईवाल्याच्या कानाखाली मारल्यावर देशाची बातमी झाली, असा हल्लाबोल यावेळी राज ठाकरे यांनी केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले देशात वेगळं चित्र रंगवलं जातं. हे काय राजकारण सुरू आहे? हे लक्षात घ्या. कोणती हिंदी घेऊन बसलो. त्याला फक्त 200 वर्षांचा इतिहास आहे. मराठी भाषेला अडीच ते तीन हजार वर्षांचा इतिहास आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. या शिवतीर्थावर मोदींना मी सांगितलं माझ्या पाच गोष्टी आहेत. त्यात मराठी भाषेला दर्जा द्या. दिला, पण वर्ष झालं एक रुपया मराठी भाषेसाठी आला नाही. एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा असेल तर कमीत कमी ती भाषा 1400 वर्ष जुनी पाहिजे. हिंदीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी अजून 1200 वर्ष आहेत. ती भाषा आमच्यावर आणि मुलांवर लादणार. हिंदी भाषेमुळे हिंदी चित्रपटातील नट नट्यांचं भलं झालं, दुसरं कोणाचं भलं झालं?

उत्तर प्रदेश बिहारमध्ये हिंदी बोलली जाते, मग नोकरी धंद्यासाठी हे लोक महाराष्ट्रात का येतात? तुमच्याच भाषेने तुमचं भलं झालं नसेल, तुम्हाला दुसऱ्या प्रदेशात जाऊन नोकऱ्या कराव्या लागत असतील, गुजरातमध्ये जाऊन मार खावा लागत असेल तर हिंदीने तुमचं काय भलं केलं? कोणती भाषा घेऊन बसलो आपण? आणि त्या भाषेसाठी म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पेटला? मला कारणच नाही कळलं. हे पहिल्यांदा सर्वांनी लक्षात घ्या, असा हल्लाबोल यावेळी राज ठाकरे यांनी केला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

16 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

16 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

16 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

17 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

18 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

18 तास ago