महाराष्ट्र

काँग्रेस अर्थसंकल्पावर गंभीर चर्चेसाठी उठली; शेतकरी, सामाजिक न्याय आणि आर्थिक विषमतेवर चिंता

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली टिळक भवन येथे अर्थसंकल्पावर विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या चर्चासत्रात अर्थतज्ञ अजित जोशी, संजीव चांदेारकर, एस. नागराजन, विश्वास उटगी, माजी खासदार कुमार केतकर यांनी भाग घेतला.

सपकाळ म्हणाले की, पूर्वी अर्थसंकल्पावर गंभीर चर्चा होत असे, पण आता त्याचा परिणाम आणि सामाजिक न्याय यावर लक्ष देणे कमी झाले आहे. शेतकरी, बेरोजगारीसारख्या गंभीर विषयांवर आंदोलने होत असताना अर्थसंकल्पाकडे जनतेचे लक्ष कमी आहे. ग्रामीण भाग व बहुजन समाजावर नियंत्रण कमी झाल्याने दलालांचे वर्चस्व वाढल्याचे ते म्हणाले.

अर्थतज्ञ संजीव चांदेारकर यांनी सांगितले की, मोदी सरकारच्या ११ वर्षांच्या अर्थसंकल्प धोरणांचा अभ्यास करणे आवश्यक आहे, कारण आर्थिक धोरणात सातत्यपूर्ण बदल दिसतात. त्यांनी कृषी क्षेत्राचे दुर्लक्ष, वाढते कर्ज, कर संशोधनाकडे दुर्लक्ष आणि वित्तीय स्रोतांच्या व्यवस्थापनावर चिंता व्यक्त केली.

प्रशांत गावंडे म्हणाले की, केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले असून शेतीत तंत्रज्ञान आणि संशोधनासाठी भरीव तरतूद नाही. त्यामुळे भविष्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.बँकिंग तज्ञ के. विठ्ठल यांनी खाजगी व परकीय गुंतवणुकीत वाढीमुळे सार्वजनिक बँकांवरील धोका असल्याचे सांगितले. अजित जोशी म्हणाले की, छोट्या उद्योगांना भांडवलाची गरज आहे, पण ती पुरवली जात नाही. देशातील आर्थिक आणि सामाजिक विषमता वाढत आहे, ज्यामुळे तरुण पिढी परदेशात जात आहे.

माजी खासदार कुमार केतकर यांनी सांगितले की, पूर्वी बजेटसंबंधीची अपेक्षा आणि चर्चासत्रे मोठ्या प्रमाणावर होती, परंतु आता त्यावर गहन विश्लेषण होत नाही. देशात आर्थिक व सामाजिक विषमता वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.संपूर्ण चर्चासत्रातून स्पष्ट झाले की, शेतकरी, ग्रामीण भाग, सामाजिक न्याय, आर्थिक समता आणि सार्वजनिक बँकांवरील धोके यावर सरकारने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; शिंदोडीत विटभट्ट्यांसाठी बेकायदेशीर मातीउपसा; महसूल-पोलिसांचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष…?

शिंदोडी (तेजस फडके) शिंदोडी, ता. शिंदोडी येथील घोड धरणाच्या पात्रातुन शेतीच्या नावाखाली काळ्या मातीचा उपसा…

18 तास ago

शिरुर; शेतकऱ्यांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या सराईत आरोपींच्या पोलिसांनी दोन तासांत आवळल्या मुसक्या

शिंदोडी (तेजस फडके) निमोणे (ता. शिरुर) येथे घोडनदीच्या पात्रातील पाण्याच्या बांधावरुन झालेल्या वादाचे रुपांतर थेट…

19 तास ago

शालेय शिक्षण विभागाचा गुगलसोबत करार; राज्यातील ४ लाख शिक्षकांना एआय प्रशिक्षणाचा लाभ

मुंबई: राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे आधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग…

22 तास ago

पावसाच्या विलंबाची कारणे जाणून घेण्यासाठी जय पवारांची हवामान केंद्राला भेट

मुंबई: महाराष्ट्रात मान्सूनच्या प्रगतीला झालेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते जय पवार यांनी मुंबईतील प्रादेशिक…

22 तास ago

शिवसैनिकच बाळासाहेबांचे खरे वारस; हा फक्त ट्रेलर, पिक्चर अजून बाकी; एकनाथ शिंदे

शिवसेनेच्या हिरक महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यात शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; विधान परिषदेत महायुती सर्व १७ जागा…

22 तास ago

नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द; ‘उत्तर महाराष्ट्राच्या विकासावर घाला’ – सत्यजीत तांबे

नाशिक: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द करून तो नाशिक–शिर्डी–अहिल्यानगर मार्गे नेण्याची…

22 तास ago