महाराष्ट्र

काँग्रेस अर्थसंकल्पावर गंभीर चर्चेसाठी उठली; शेतकरी, सामाजिक न्याय आणि आर्थिक विषमतेवर चिंता

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली टिळक भवन येथे अर्थसंकल्पावर विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या चर्चासत्रात अर्थतज्ञ अजित जोशी, संजीव चांदेारकर, एस. नागराजन, विश्वास उटगी, माजी खासदार कुमार केतकर यांनी भाग घेतला.

सपकाळ म्हणाले की, पूर्वी अर्थसंकल्पावर गंभीर चर्चा होत असे, पण आता त्याचा परिणाम आणि सामाजिक न्याय यावर लक्ष देणे कमी झाले आहे. शेतकरी, बेरोजगारीसारख्या गंभीर विषयांवर आंदोलने होत असताना अर्थसंकल्पाकडे जनतेचे लक्ष कमी आहे. ग्रामीण भाग व बहुजन समाजावर नियंत्रण कमी झाल्याने दलालांचे वर्चस्व वाढल्याचे ते म्हणाले.

अर्थतज्ञ संजीव चांदेारकर यांनी सांगितले की, मोदी सरकारच्या ११ वर्षांच्या अर्थसंकल्प धोरणांचा अभ्यास करणे आवश्यक आहे, कारण आर्थिक धोरणात सातत्यपूर्ण बदल दिसतात. त्यांनी कृषी क्षेत्राचे दुर्लक्ष, वाढते कर्ज, कर संशोधनाकडे दुर्लक्ष आणि वित्तीय स्रोतांच्या व्यवस्थापनावर चिंता व्यक्त केली.

प्रशांत गावंडे म्हणाले की, केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले असून शेतीत तंत्रज्ञान आणि संशोधनासाठी भरीव तरतूद नाही. त्यामुळे भविष्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.बँकिंग तज्ञ के. विठ्ठल यांनी खाजगी व परकीय गुंतवणुकीत वाढीमुळे सार्वजनिक बँकांवरील धोका असल्याचे सांगितले. अजित जोशी म्हणाले की, छोट्या उद्योगांना भांडवलाची गरज आहे, पण ती पुरवली जात नाही. देशातील आर्थिक आणि सामाजिक विषमता वाढत आहे, ज्यामुळे तरुण पिढी परदेशात जात आहे.

माजी खासदार कुमार केतकर यांनी सांगितले की, पूर्वी बजेटसंबंधीची अपेक्षा आणि चर्चासत्रे मोठ्या प्रमाणावर होती, परंतु आता त्यावर गहन विश्लेषण होत नाही. देशात आर्थिक व सामाजिक विषमता वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.संपूर्ण चर्चासत्रातून स्पष्ट झाले की, शेतकरी, ग्रामीण भाग, सामाजिक न्याय, आर्थिक समता आणि सार्वजनिक बँकांवरील धोके यावर सरकारने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नातं हृदयाशी; बायपास सर्जरी

बायपास सर्जरी म्हटले की हातपाय गाळायचे दिवस आता गेले. बायपास केल्यानंतरही योग्य ती काळजी घेऊन…

33 मिनिटे ago

दक्षिणेत भाजपाला नकार, केरळमध्ये काँग्रेसचा विजय लोकशाहीचा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष ने साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर…

39 मिनिटे ago

पश्चिम बंगाल, आसाम निकालांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

मुंबई: शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम बंगाल व आसाम विधानसभा…

42 मिनिटे ago

महाराष्ट्र हादरला! ३ वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणाने संताप

मुंबई: महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. नुकत्याच समोर आलेल्या…

5 तास ago

बारामती पोटनिवडणूक निकाल! ‘हा शेवट नाही, नव्या बारामतीची सुरुवात’; सुनेत्रा अजित पवार

मुंबई: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना मतदारांनी दाखवलेला विश्वास हा “आदरणीय अजितदादांच्या पवित्र…

6 तास ago

बीडसह राज्यात अल्पवयीनांवरील अत्याचारांच्या घटनांनी खळबळ; जलद न्याय आणि कडक कारवाईची मागणी तीव्र

पालकांची वाढती चिंता, समाजजागृती आणि यंत्रणांच्या जबाबदारीवर पुन्हा प्रश्नचिन्ह मुंबई: महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या सलग…

6 तास ago