महाराष्ट्र

काँग्रेस अर्थसंकल्पावर गंभीर चर्चेसाठी उठली; शेतकरी, सामाजिक न्याय आणि आर्थिक विषमतेवर चिंता

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली टिळक भवन येथे अर्थसंकल्पावर विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या चर्चासत्रात अर्थतज्ञ अजित जोशी, संजीव चांदेारकर, एस. नागराजन, विश्वास उटगी, माजी खासदार कुमार केतकर यांनी भाग घेतला.

सपकाळ म्हणाले की, पूर्वी अर्थसंकल्पावर गंभीर चर्चा होत असे, पण आता त्याचा परिणाम आणि सामाजिक न्याय यावर लक्ष देणे कमी झाले आहे. शेतकरी, बेरोजगारीसारख्या गंभीर विषयांवर आंदोलने होत असताना अर्थसंकल्पाकडे जनतेचे लक्ष कमी आहे. ग्रामीण भाग व बहुजन समाजावर नियंत्रण कमी झाल्याने दलालांचे वर्चस्व वाढल्याचे ते म्हणाले.

अर्थतज्ञ संजीव चांदेारकर यांनी सांगितले की, मोदी सरकारच्या ११ वर्षांच्या अर्थसंकल्प धोरणांचा अभ्यास करणे आवश्यक आहे, कारण आर्थिक धोरणात सातत्यपूर्ण बदल दिसतात. त्यांनी कृषी क्षेत्राचे दुर्लक्ष, वाढते कर्ज, कर संशोधनाकडे दुर्लक्ष आणि वित्तीय स्रोतांच्या व्यवस्थापनावर चिंता व्यक्त केली.

प्रशांत गावंडे म्हणाले की, केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले असून शेतीत तंत्रज्ञान आणि संशोधनासाठी भरीव तरतूद नाही. त्यामुळे भविष्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.बँकिंग तज्ञ के. विठ्ठल यांनी खाजगी व परकीय गुंतवणुकीत वाढीमुळे सार्वजनिक बँकांवरील धोका असल्याचे सांगितले. अजित जोशी म्हणाले की, छोट्या उद्योगांना भांडवलाची गरज आहे, पण ती पुरवली जात नाही. देशातील आर्थिक आणि सामाजिक विषमता वाढत आहे, ज्यामुळे तरुण पिढी परदेशात जात आहे.

माजी खासदार कुमार केतकर यांनी सांगितले की, पूर्वी बजेटसंबंधीची अपेक्षा आणि चर्चासत्रे मोठ्या प्रमाणावर होती, परंतु आता त्यावर गहन विश्लेषण होत नाही. देशात आर्थिक व सामाजिक विषमता वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.संपूर्ण चर्चासत्रातून स्पष्ट झाले की, शेतकरी, ग्रामीण भाग, सामाजिक न्याय, आर्थिक समता आणि सार्वजनिक बँकांवरील धोके यावर सरकारने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

20 वर्षांत 40 बदल्या! तुकाराम मुंढेंनाही मागे टाकणाऱ्या IPS अधिकारी डी. रूपा मौदगिल यांची धडाकेबाज कारकीर्द

मुंबई: प्रशासकीय सेवेत प्रामाणिक आणि कडक शिस्तीच्या अधिकाऱ्यांना अनेकदा राजकीय दबाव आणि वारंवार होणाऱ्या बदल्यांचा…

9 तास ago

चाकण एमआयडीसीतील समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील;  सुनेत्रा पवार

रस्ते, वाहतूक अन् पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक; उद्योग प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा; प्रशासनाला…

17 तास ago

सुखबीर बादलांवर हल्ला करणारा जसपालसिंग कोण? पुण्यात वकिली, दोन वर्षांपासून गुरुद्वारात सेवा

नांदेड : शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये…

17 तास ago

एका वर्षात हजारो सरकारी शाळा घटल्या; महाराष्ट्रातही ३५७ शाळांना फटका

नवी दिल्ली : देशातील सरकारी प्राथमिक शाळांच्या संख्येत एका वर्षात तब्बल ९,८६६ ने घट झाल्याची…

17 तास ago

महागाईचा भडका; घरखर्चाचे गणित कोलमडले! उत्पन्न जैसे थे, मात्र खर्चाचा आलेख वाढता

नाशिक : महागाईचा वाढता आलेख सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती अर्थकारणावर परिणाम करू लागला आहे. किराणा मालासह…

17 तास ago

NCMC स्मार्ट कार्डला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद; १ कोटींहून अधिक नोंदणी

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या NCMC (National Common…

17 तास ago