महाराष्ट्र

राहुल गांधींच्या भाषणावर मोदी सरकारचा अडथळा; हर्षवर्धन सपकाळांचा सरकारवर गंभीर आरोप

मुंबई: चीनच्या सीमेवरील कारवायांबाबत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत महत्त्वाचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला असतानाही मोदी सरकारने त्यांना बोलू दिले नाही. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावर टीका करत सरकारवर संसदेच्या नियमांचे उल्लंघन करून हुकूमशाही पद्धतीने वागल्याचा आरोप केला आहे.

टिळक भवन येथे पत्रकारांशी संवाद साधताना सपकाळ म्हणाले, “देशाचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी त्यांच्या ‘फोर स्टाफ ॲाफ डेस्टिनी’ या पुस्तकात ‘डंके की चोट’ प्रकरणावर लिहिले असून, मोदी सरकारने यावर जाबबादारी घेतली नाही, हा मुद्दा राहुल गांधी मांडत होते. चीन प्रकरणावर संसदेत चर्चा होणे आवश्यक आहे, पण सरकारने विरोधी पक्ष नेत्याला बोलूच दिले नाही.”

सपकाळ यांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावरही बोलून मोदी सरकारच्या कारवायांची टीका केली. वांगचुक यांनी चीनच्या भारतात प्रवेशाच्या मुद्द्यावर आवाज उठवला होता; त्यावरही त्यांना तुरुंगात टाकल्याचा आरोप सपकाळ यांनी केला.

अजित पवार विमान अपघातावर शंका

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबतही सपकाळ यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांनी सांगितले, “अजित पवार यांचे शेवटचे संभाषण व्हायरल झाले आहे, परंतु ब्लॅकबॉक्समधील संभाषण अद्याप जाहीर झालेले नाही आणि चौकशीही होत नाही. त्यामुळे संशय वाढत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर गंभीर दखल घेतलेली नाही. अपघाताच्या चौकशीसाठी घाई केली गेली नाही, जे आश्चर्यकारक आहे.”सपकाळ म्हणाले की, “अजित पवारसारख्या शिस्तप्रिय नेत्याचा अपघात होणे पटत नाही. जोपर्यंत अपघाताचा कार्यकारणभाव स्पष्ट होत नाही, तोपर्यंत प्रश्न कायम राहतील.”

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर टीका

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, “राज्यात पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडला आहे. कोयता गँग, वाळू माफिया, ड्रग्ज माफिया, आका, खोके आणि बिश्नोई गँग या प्रकरणांमागे सरकारचीच निष्क्रीय भूमिका आहे.”

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

12 तास ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

17 तास ago

आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…

17 तास ago

अहिल्यादेवींच्या विचारांवर राज्यकारभार! चौंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; एकनाथ शिंदे

अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…

17 तास ago

नवनाथ बन यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा सत्याचा अभ्यास करावा; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार…

17 तास ago

भेसळ, विषारी दारू आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर आमदार सत्यजीत तांबे यांची घणाघाती टीका

जळगाव: अन्नपदार्थांतील भेसळ, विषारी दारूच्या घटना, शिक्षण विभागातील भ्रष्टाचार, मराठी माध्यमाच्या शाळांसमोरील आव्हाने आणि अनुदानित…

19 तास ago