महाराष्ट्र

राहुल गांधींच्या भाषणावर मोदी सरकारचा अडथळा; हर्षवर्धन सपकाळांचा सरकारवर गंभीर आरोप

मुंबई: चीनच्या सीमेवरील कारवायांबाबत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत महत्त्वाचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला असतानाही मोदी सरकारने त्यांना बोलू दिले नाही. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावर टीका करत सरकारवर संसदेच्या नियमांचे उल्लंघन करून हुकूमशाही पद्धतीने वागल्याचा आरोप केला आहे.

टिळक भवन येथे पत्रकारांशी संवाद साधताना सपकाळ म्हणाले, “देशाचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी त्यांच्या ‘फोर स्टाफ ॲाफ डेस्टिनी’ या पुस्तकात ‘डंके की चोट’ प्रकरणावर लिहिले असून, मोदी सरकारने यावर जाबबादारी घेतली नाही, हा मुद्दा राहुल गांधी मांडत होते. चीन प्रकरणावर संसदेत चर्चा होणे आवश्यक आहे, पण सरकारने विरोधी पक्ष नेत्याला बोलूच दिले नाही.”

सपकाळ यांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावरही बोलून मोदी सरकारच्या कारवायांची टीका केली. वांगचुक यांनी चीनच्या भारतात प्रवेशाच्या मुद्द्यावर आवाज उठवला होता; त्यावरही त्यांना तुरुंगात टाकल्याचा आरोप सपकाळ यांनी केला.

अजित पवार विमान अपघातावर शंका

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबतही सपकाळ यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांनी सांगितले, “अजित पवार यांचे शेवटचे संभाषण व्हायरल झाले आहे, परंतु ब्लॅकबॉक्समधील संभाषण अद्याप जाहीर झालेले नाही आणि चौकशीही होत नाही. त्यामुळे संशय वाढत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर गंभीर दखल घेतलेली नाही. अपघाताच्या चौकशीसाठी घाई केली गेली नाही, जे आश्चर्यकारक आहे.”सपकाळ म्हणाले की, “अजित पवारसारख्या शिस्तप्रिय नेत्याचा अपघात होणे पटत नाही. जोपर्यंत अपघाताचा कार्यकारणभाव स्पष्ट होत नाही, तोपर्यंत प्रश्न कायम राहतील.”

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर टीका

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, “राज्यात पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडला आहे. कोयता गँग, वाळू माफिया, ड्रग्ज माफिया, आका, खोके आणि बिश्नोई गँग या प्रकरणांमागे सरकारचीच निष्क्रीय भूमिका आहे.”

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिंदोडी येथे माती टाकण्याच्या वादातुन बाहेरचे गुंड आणुन दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

22 मिनिटे ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

6 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

6 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

6 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

7 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

1 दिवस ago