महाराष्ट्र

चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसचा तिढा सुटला! राजेश अडूर गटनेते, उपमहापौरपदी वसंत देशमुखांचा अर्ज

नागपूर: चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षातील सुरू असलेला तिढा अखेर सुटला आहे. काँग्रेसचे गटनेते म्हणून राजेश अडूर यांची नियुक्ती करण्यात आली असून उपमहापौरपदासाठी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार गटाचे वसंत देशमुख यांनी अर्ज दाखल केला आहे. आज सायंकाळी पाच वाजता काँग्रेसची अधिकृत गटनोंदणी होणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेस नेतृत्वाबाबत संभ्रमाचे वातावरण होते. दिल्ली येथे काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी झालेल्या चर्चेनंतर अखेर या वादावर तोडगा निघाला. वडेट्टीवार समर्थक राजेश अडूर यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे नियुक्तीपत्र अधिकृतपणे विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आले आहे.

दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडूनही महापौरपदासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. उपमहापौरपदासाठी खासदार धानोरकर समर्थकांनी अर्ज दाखल केला असला तरी चर्चेनंतर हे अर्ज मागे घेतले जातील, असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

महाराष्ट्र काँग्रेसचे विदर्भ प्रभारी कुणाल चौधरी यांनी चंद्रपूरच्या जनतेने काँग्रेसला स्पष्ट कौल दिल्याचा दावा करत चंद्रपूरमध्ये काँग्रेसचाच महापौर होणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. सध्या काँग्रेसकडे २७ नगरसेवक असून जनविकास सेना (पप्पू देशमुख) यांचे तीन नगरसेवक काँग्रेससोबत आहेत. MIM च्या पाठिंब्यामुळे एक नगरसेवक जनविकास सेनेसोबत असून बसपानेही काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सध्या एकूण संख्याबळ ३२ असून बहुमतासाठी आणखी दोन नगरसेवकांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. यासाठी सर्व स्तरावर चर्चा सुरू असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

चंद्रपूर महापालिकेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला स्थायी समिती देण्याची तयारी काँग्रेसने दर्शवली असून याबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर टँकर पलटी झाल्याने तब्बल ३२ तास वाहतूक कोंडी झाल्याच्या घटनेवरून विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. “चंद्रावर-मंगळावर जाण्याच्या गोष्टी केल्या जातात, पण द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी यंत्रणा अपयशी ठरते. यातून सरकारची कार्यक्षमता जनतेसमोर आली आहे,” असा टोला त्यांनी लगावला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आनंदआश्रमात गुरुपौर्णिमेचा उत्साह; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवसैनिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव

ठाणे: ठाण्यातील टेंभी नाका येथील शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या आनंदआश्रमात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी…

43 मिनिटे ago

अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; राज्यव्यापी नशामुक्ती अभियानाचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबईतील एनएससीआय डोम येथे होणार प्रारंभ; युवक, विद्यार्थी आणि नागरिकांना प्रतिज्ञेत सहभागी होण्याचे मंत्री मंगलप्रभात…

46 मिनिटे ago

धुराची आग लावणाऱ्यांनाच आता धुराची अॅलर्जी!

मुंबई: देशभरात सध्या जंतर-मंतरवरील आंदोलनाची चर्चा रंगली आहे. काही आंदोलनकर्त्यांनी वापरलेल्या अश्लील, अपमानास्पद आणि खालच्या…

49 मिनिटे ago

एका मुलाखतीने बदलले आयुष्य; तांदळीतील आजोबांच्या मदतीला प्रशासन धावले

७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…

16 तास ago

शिरुर; शेतकरी गोवंश कायद्याच्या कचाट्यात; तांदळीत तीन महिन्यांत 8 ते 10 बेवारस वासरांना सोडले रस्त्यावर

शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…

19 तास ago

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

2 दिवस ago