महाराष्ट्र

बाल साहित्य जत्रेत पुढच्यावर्षी सांस्कृतिक विभाग सहभागी होईल

पुणे: पुणे येथे सुरू असणारी बाल पुस्तक जत्रा हा अत्यंत या काळातील स्तुत्य उपक्रम असून पुढच्या वर्षी सांस्कृतिक विभाग ही या बालसाहित्य जत्रेत सहभागी होईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ऍड आशिष शेलार यांनी आज पुणे येथे केली.

राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे महापालिका, संवाद आणि पुणे पुस्तक महोत्सव यांच्यातर्फे आयोजित “स्वर्गीय जयंत नारळीकर भवन” येथे पुणे बाल पुस्तक जत्रा आयोजित करण्यात आली आहे. या जत्रेला राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ऍड आशिष शेलार यांनी भेट दिली. पुस्तकांच्या स्टाँल ला भेट देऊन त्यांनी संपूर्ण जत्रेत फेरफटका मारला. विटीदांडूच्या खेळातही ते सहभागी झाले.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात मंत्री आशिष शेलार म्हणाले की, आज ए आय म्हणजे कृत्रिम प्रज्ञेचा जमाना आहे पण खरी प्रज्ञा ही पुस्तकात आहे. त्यामुळे आजच्या काळात ज्या जत्रेची आवश्यकता होती असा उपक्रम पुणे येथे आयोजित करण्यात आला. आम्ही सांस्कृतिक विभागातर्फे लोककला, लोकवाद्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा, तसेच नाटक आणि या सगळ्या कला प्रकारातून संस्कृती आणि प्रज्ञेचे जतन संवर्धन करीत आहोत त्यामुळे या चांगल्या उपक्रमात पुढच्या वर्षी सांस्कृतिक कार्य विभाग ही सहभागी होईल, असेहि त्यांनी जाहीर केले. या कार्यक्रमाला आयोजक राजेश पांडे, आमदार हेमंत रासने, सुनील महाजन, भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे आणि पदाधिकारी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

12 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

12 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

12 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

12 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

12 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

12 तास ago