कडवई: संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील वाणीवाडी बाजारपेठ येथील स्मशानभूमी कडे जाण्यासाठी मार्गच नसल्याने येथील ग्रामस्थांना अंत्यविधी करताना अक्षरशः मृत्यूशी सामना करावा लागत आहे . गेली सत्तर वर्षे ही पारंपारिक स्मशानभूमी विकासापासून वंचित राहिली असल्याने येथील ग्रामस्थ आत्ता रस्त्यावर उतरण्याचा तयारीत असल्याचे समजते.
कडवई वाणीवाडी ,बाजारपेठ तसेच समर्थनगर या भागातील लोकांना अंत्यविधीसाठी कडवई तुरळ मार्गाच्या लगत नदीच्यापलीकडे एक स्मशानभूमी आहे . गेली सत्तर वर्षांपासून येथील ग्रामस्थ या पारंपरिक स्मशानभूमीत अंत्यविधी करत आहेत .मात्र या स्मशानभूमी कडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने फार मोठी अडचण होत आहे .पावसाळ्यामध्ये तर मोठ्यापाण्यातून कसरत करत शव न्यावे लागत आहे . अनेकवेळा मुसळधार पाऊस असताना येथील तरुण मानवीसाखळी करून शव नेत असताना काही लोक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले असून येथील तरुणांच्या प्रसंगावधनाने अनर्थ टळत आहे.
यापूर्वी या स्मशानभूमीच्या जागेचा वाद न्यायालयात प्रलंबित होता . आता हा वाद येथील ग्रामस्थांनी सामोपचाराने सोडवला आहे . मात्र येथे जाण्यासाठी रस्ता नसल्याने येथील ग्रामस्थांची फार मोठी गैरसोय होत आहे .स्मशानभूमीकडे जाण्यासाठी योग्य रस्ता व पूल व्हावा यासाठी येथील ग्रामस्थ अनेकवर्षे प्रशासनाशी पत्रव्यवहार करत आहेत . मात्र यापूर्वी हा वाद न्यायालयात असल्याचे कारण सांगून या प्रस्तावाना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात होत्या . मात्र आत्ता हा वाद सम्पला असून प्रशासनाने या बाबीकडे विशेष लक्ष घालून स्मशानभूमी कडे जाण्यासाठी रस्ता व पूल बांधण्यासाठी तरतूद करून ग्रामस्थांच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवावा अशी मागणी जोर धरत आहे अन्यथा नाईलाजाने रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या मनस्थितीत येथील ग्रामस्थ असल्याचे दिसून येते.
जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…
बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…
मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली…
मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ दादर येथील टिळक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात…
मुंबई: राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही…
आवडीनुसार पुढील वाटचालीचे आवाहन; मुलींची उत्तीर्णता मुलांपेक्षा 6.35% अधिक मुंबई: उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12…