कराड: सातारा जिल्ह्यात ड्रग्ज माफियांनी आपली पाळेमुळे किती खोलवर रोवली आहेत, याचा धक्कादायक पर्दाफाश पुन्हा एकदा झाला आहे. कराड तालुक्यातील पाचुपतेवाडी येथे पुण्याच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (DRI) धाड टाकत एमडी ड्रग्ज तयार करणारा एक मोठा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. विशेष म्हणजे, हा संपूर्ण काळा उद्योग एका निर्जन ठिकाणी असलेल्या कोंबड्यांच्या शेडमध्ये सुरू होता.
कोंबड्यांच्या शेडमध्ये ड्रग्ज निर्मिती
मिळालेल्या माहितीनुसार, पाचुपतेवाडी येथील एका निर्जन परिसरात जानेवारी महिन्यापासून एमडी ड्रग्जची निर्मिती सुरू होती. याबाबतची गोपनीय माहिती डीआरआयला मिळाल्यानंतर अत्यंत गुप्तपणे ही कारवाई करण्यात आली. या धाडीत रेकॉर्डवरील गुन्हेगार बाबा मोरे याच्यासह एकूण चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
७ ते ८ कोटींचा तयार माल जप्त
या कारवाईदरम्यान पोलिसांनी अंदाजे ७ ते ८ कोटी रुपयांचा तयार एमडी ड्रग्जचा साठा तसेच मोठ्या प्रमाणात कच्चा माल, रसायने आणि अत्याधुनिक यंत्रसामग्री जप्त केली आहे. तपास यंत्रणेला घटनास्थळी आढळलेल्या साहित्याचे प्रमाण पाहून मोठा धक्का बसला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात हजारो कोटींची उलाढाल शक्य होती
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या कच्च्या मालापासून जर संपूर्ण ड्रग्ज तयार झाले असते, तर त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत हजारो कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असती. मात्र, डीआरआयच्या पथकाने वेळेत कारवाई करत हा मोठा कट उधळून लावला.
स्थानिक पोलिसांना अंधारात ठेवून कारवाई
या कारवाईचे सर्वात धक्कादायक वैशिष्ट्य म्हणजे, इतकी मोठी धाड पडत असताना सातारा किंवा कराड पोलिसांना याची पुसटशीही माहिती नव्हती. हे पथक थेट गुजरात आणि हैदराबाद येथून आले असल्याची माहिती आहे. एनडीपीएस कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, तपासाची गोपनीयता राखण्यासाठी स्थानिक यंत्रणेला दूर ठेवण्यात आले असावे, अशी चर्चा आहे.
महिन्याभरातील दुसरी मोठी कारवाई
सातारा जिल्ह्यातील अमली पदार्थविरोधी ही महिन्याभरातील दुसरी मोठी कारवाई ठरली आहे. यापूर्वी डिसेंबर महिन्यात मुंबई पोलिसांनी सावरी गावात छापेमारी करून ड्रग्ज जप्त केले होते. आता कराडमध्ये थेट ड्रग्ज तयार करणारा कारखानाच उद्ध्वस्त करण्यात आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.या प्रकरणी डीआरआय विभागाकडून अद्याप अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली नसून, पुढील तपास सुरू आहे.
पुणे : काँग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्याइतकेच…
शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व प्राणीमित्र शेरखान शेख यांनी त्यांच्या…
शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात थरारक गुन्ह्याची उकल करणारी घटना…
आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…
जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…
जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…