महाराष्ट्र

सलग दुसऱ्यांदा हत्याकांड! भांडुपमध्ये तरुणाची निर्घृण हत्या, कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

मुंबई: गेल्या 24 तासांत मुंबईत घडलेल्या सलग दोन हत्याकांडांमुळे संपूर्ण शहर हादरले आहे. मालाडमध्ये लोकल ट्रेनमध्ये झालेल्या हत्येनंतर आता भांडुप परिसरात एका तरुणाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

भांडुप परिसरात राहणाऱ्या शंकर प्रसाद ऊर्फ कली या तरुणावर दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. हल्लेखोरांनी शंकरवर तब्बल 22 ते 30 वेळा वार केल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. हल्ल्याची तीव्रता इतकी भीषण होती की शंकर रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळला.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने शंकरला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, शरीरावर झालेल्या गंभीर जखमा आणि मोठ्या प्रमाणातील रक्तस्रावामुळे उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर भांडुप परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

हत्येची माहिती मिळताच भांडुप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वेगाने सुरू आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक तपासात हा हल्ला जुन्या वादातून किंवा वैयक्तिक शत्रुत्वातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर शनिवारी (24 जानेवारी) मालाड रेल्वे स्थानकात लोकल ट्रेनमध्ये झालेल्या वादातून ओंकार शिंदे या तरुणाने अलोक सिंग नावाच्या प्राध्यापकाची निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली असली तरी अवघ्या काही तासांत भांडुपमध्ये घडलेल्या हत्याकांडामुळे मुंबईकरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.शहरात वाढत चाललेल्या हिंसक घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिस प्रशासनाने कडक उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

4 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

4 तास ago

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कारभारावर काँग्रेसचा हल्लाबोल

गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…

4 तास ago

गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर नवी ओळख देण्याचा उपक्रम; नामांकित मंडळांचा होणार सन्मान

मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…

4 तास ago

UPSC पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी CET-2026 प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई: उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा…

4 तास ago

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीची दखल; ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांवर कारवाईचे आदेश

प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप वसुली, अतिरिक्त शुल्काच्या सक्तीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश कल्याण: ॲप-आधारित…

4 तास ago