मुंबई: गेल्या 24 तासांत मुंबईत घडलेल्या सलग दोन हत्याकांडांमुळे संपूर्ण शहर हादरले आहे. मालाडमध्ये लोकल ट्रेनमध्ये झालेल्या हत्येनंतर आता भांडुप परिसरात एका तरुणाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
भांडुप परिसरात राहणाऱ्या शंकर प्रसाद ऊर्फ कली या तरुणावर दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. हल्लेखोरांनी शंकरवर तब्बल 22 ते 30 वेळा वार केल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. हल्ल्याची तीव्रता इतकी भीषण होती की शंकर रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळला.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने शंकरला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, शरीरावर झालेल्या गंभीर जखमा आणि मोठ्या प्रमाणातील रक्तस्रावामुळे उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर भांडुप परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
हत्येची माहिती मिळताच भांडुप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वेगाने सुरू आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक तपासात हा हल्ला जुन्या वादातून किंवा वैयक्तिक शत्रुत्वातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर शनिवारी (24 जानेवारी) मालाड रेल्वे स्थानकात लोकल ट्रेनमध्ये झालेल्या वादातून ओंकार शिंदे या तरुणाने अलोक सिंग नावाच्या प्राध्यापकाची निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली असली तरी अवघ्या काही तासांत भांडुपमध्ये घडलेल्या हत्याकांडामुळे मुंबईकरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.शहरात वाढत चाललेल्या हिंसक घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिस प्रशासनाने कडक उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.
मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…
नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…
पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…
मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…
पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…
अहिल्यानगर: नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नसून ऊर्जा, श्रद्धा आणि सृष्टीचा आधार आहे—आणि म्हणूनच नदी…