मुंबई: गेल्या 24 तासांत मुंबईत घडलेल्या सलग दोन हत्याकांडांमुळे संपूर्ण शहर हादरले आहे. मालाडमध्ये लोकल ट्रेनमध्ये झालेल्या हत्येनंतर आता भांडुप परिसरात एका तरुणाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
भांडुप परिसरात राहणाऱ्या शंकर प्रसाद ऊर्फ कली या तरुणावर दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. हल्लेखोरांनी शंकरवर तब्बल 22 ते 30 वेळा वार केल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. हल्ल्याची तीव्रता इतकी भीषण होती की शंकर रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळला.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने शंकरला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, शरीरावर झालेल्या गंभीर जखमा आणि मोठ्या प्रमाणातील रक्तस्रावामुळे उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर भांडुप परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
हत्येची माहिती मिळताच भांडुप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वेगाने सुरू आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक तपासात हा हल्ला जुन्या वादातून किंवा वैयक्तिक शत्रुत्वातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर शनिवारी (24 जानेवारी) मालाड रेल्वे स्थानकात लोकल ट्रेनमध्ये झालेल्या वादातून ओंकार शिंदे या तरुणाने अलोक सिंग नावाच्या प्राध्यापकाची निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली असली तरी अवघ्या काही तासांत भांडुपमध्ये घडलेल्या हत्याकांडामुळे मुंबईकरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.शहरात वाढत चाललेल्या हिंसक घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिस प्रशासनाने कडक उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.
मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…
मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…
गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…
मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…
मुंबई: उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा…
प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप वसुली, अतिरिक्त शुल्काच्या सक्तीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश कल्याण: ॲप-आधारित…