anubhavanchya-paulkhuna
शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व प्राणीमित्र शेरखान शेख यांनी त्यांच्या विविध कार्यांच्या माध्यमातून केलेल्या कामात आलेल्या अनुभवांतून लिहिलेल्या ‘अनुभवांच्या पाऊलखुणा’ या पुस्तकाचे रविवारी (ता. ३०) प्रकाशन करण्यात आले. ईश्वरी प्रकाशन, पुणे यांच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे, माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसि कुरियन, अध्यक्षा हिराबेगम मुल्ला, सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंतराव गिरी, राहुल देशमुख, विद्युत वितरणचे सहाय्यक अभियंता नितीन महाजन, जुन्नर शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन अन्वर सय्यद, रुक्साना सय्यद, दस्तगीर शेख, उद्योजक पै. गणेश लोखंडे, डॉ. हेमंत दातखिळे, लेखक संतोष धायबर, सचिन बेंडभर, मनोहर परदेशी, राहुल चातुर, संजीव मांढरे, विठ्ठल वळसे पाटील, संभाजी गोरडे, आकाश भोरडे, सामाजिक कार्यकर्ते महेश साबळे, जितेंद्रकुमार थिटे, नागनाथ शिंगाडे, प्रवीणकुमार जगताप, एन. बी. मुल्ला, प्रकाश चव्हाण, जालिंदर आदक, शंकर पाबळे, मंदार तकटे, सचिन धुमाळ, भगवान खुर्पे, मिलिंद देवरे, अनिल जगताप, लखन शिरसकर, अतुल थोरवे, राहुल गायकवाड, वैभव निकाळजे, विक्रम दुपारगुडे, रुपेश बोरुडे यांसह आदी उपस्थित होते.
आयुष्यामध्ये आलेल्या प्रत्येक अनुभवातून माणूस काहीतरी शिकून मोठा होत असतो आणि माणसाला आलेल्या अनुभवांचा इतर लोकांना फायदा होत असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी व्यक्त केले. नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपणे आवश्यक असल्याचे मत माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसि कुरियन, सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंतराव गिरी, राहुल देशमुख यांनी व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीणकुमार जगताप व एन. बी. मुल्ला यांनी केले तर प्रास्ताविक लेखक शेरखान शेख यांनी केले आणि श्रीकांत भाडळे यांनी आभार मानले.
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…
मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…
मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…
मुंबई: सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सुनावणी निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, आजपासून शिंदे…
Pपुणे : महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेत अष्टविनायक यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रीगणेशाची आठ…
नवी दिल्ली: “बाळासाहेब ठाकरे यांना धनुष्यबाण प्राणाहून प्रिय होता. ते देव्हाऱ्यात धनुष्यबाणाची पूजा करायचे. मात्र, २०१९…