महाराष्ट्र

रशिया सोबत संबंधाची पायाभरणी काँग्रेस काळात…

रशियन राष्ट्राध्यक्ष मा पुतीन भेट समारंभास काँग्रेसच्या ‘विरोधीपक्ष नेत्यां’ना राष्ट्रपती भवनचे निमंत्रण न देणे, ही परंपरा व संकेतांची पायमल्ली

मुंबई: १९७१ च्या युद्धात अमेरिकेने जेंव्हा बंगालच्या उपसागरात विमानवाहू जहाज पाठवून पाकिस्तान’ला पाठिंबा दिला होता. त्यावेळी २ दशकात झालेली पं नेहरूं, शास्त्रीं व इंदीरा गांधी’च्या नेतृत्वाखालील भारताची प्रगती, सामर्थ्यपुर्ण अस्तित्व, स्वयंसिद्धता व परराष्ट्र नितीची दखल घेऊनच, रशिया’ने भारतास मदत देऊ केली, हे वास्तव आहे. तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदीरा गांधीची परराष्ट्र निती व मुत्सद्देगिरी मुळे ऑगस्ट १९७१ मध्ये भारताचा “शांतता, मैत्री आणि सहकार्याचा भारत-सोव्हिएत करार” होऊ शकला हे ईतिहास साक्ष आहे.

रशिया सोबत उभारलेले गतकाळातील, काँग्रेस कालीन मैत्री संबंध वेळोवेळी भारतास उपयुक्त ठरले. चीनच्या धमक्यांना न घाबरतां रशिया ने भारतास पाठिंबा दिला व सदैव मैत्री जपली. ज्या मैत्री’ची पायाभरणी ही काँग्रेस सत्ताकाळ्त झाल्याचे सांगण्यास काँग्रेसजनांना अभिमान वाटत असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले.

सोव्हिएत नौदलाने अमेरिकेच्या सातव्या ताफ्याला तोंड देण्यासाठी हिंद महासागरात युद्धनौका तैनात केल्या, जो भारतासोबत सोव्हिएत युतीचा एक प्रमुख पथदर्शक होता.मात्र अमेरिका धार्जिण भुमिका घेणारे भाजपचे शिर्ष नेतृत्व रशिया सोबतची साथ संगत सोडण्याच्या भुमिकेत होती हे वास्तव देखील भाजप’ला मान्य करावे लागेल.

केवळ स्वतःच्याच नेतृत्वाची पाठराखण करण्यात मग्न असणारे व धन्यता मानणारे भाषणजीवी पंतप्रधान मा मोदी’जी हे रशिया दौऱ्यावर असतांना “२०१४ पुर्वी भारत निराशा व हतबलतेच्या खाईत होता” अशी देशाची बदनामी करणारी व अहंकारी वक्तव्ये करतात तेंव्हा भारतीय नागरिक म्हणून मनास वेदना होतात.

गेल्या ६५ वर्षात काँग्रेस’ची केंद्रात सरकारे असतांना संसदीय लोकशाही संकेत व परंपरेचे पालन करीत वेळोवेळी प्रोटोकॉल प्रमाणे लोकसभा व राज्यसभेतील विरोधी पक्ष नेत्यास (ज्याला इंग्रजी परंपरेत Shadow PM) संबोधले जाते, त्यांना राष्ट्रपती द्वारा स्वागतपर भेटीच्या कार्यक्रमाला नेहमीच बोलावले जात होते.

तत्कालीन विरोधी पक्षनेते मा अटलजी बाजपेयी, अरुण जेटली, सुषमा स्वराज हे नेते उपस्थित देखील राहिले होते, मात्र मोदी – शहांच्या काँग्रेस प्रती असुयेपोटी व अहंकारी वृत्तीने या प्रथांना पायदळी तुडवले जात असल्याची बाब संविधानीक व लोकशाही परंपरांचे हनन करणारी असल्याचे काँग्रेस वरीष्ठ राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

8 तास ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

8 तास ago

गांधी हत्या समर्थन असंस्कृत; जैन मुनीच्या वक्तव्यावर सपकाळ यांचा संताप

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी राष्ट्रपिता Mahatma Gandhi यांच्या हत्येचे समर्थन…

9 तास ago

मुंबईत वाढत्या ड्रग्ज व्यापारावर कारवाईची मागणी; ‘ड्रगमुक्त मुंबई’ अभियान राबविण्याचा आग्रह

मुंबई: मुंबई शहरात वाढत चाललेल्या ड्रग्जच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते…

9 तास ago

प्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार काळाच्या पडद्याआड

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील सुप्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार (वय ७५ वर्षे) यांचे दीर्घ…

9 तास ago

महिला आरक्षणावर भाजपाला अधिकार नाही; RSS मध्ये महिला सरसंघचालक नेमून दाखवा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर जोरदार टीका…

18 तास ago