महाराष्ट्र

सरकार जनतेसाठी नव्हे तर मोजक्या लोकांसाठी काम करतय

मुंबई: सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पातील पंचामृतातील अमृताचा जनतेला कोणताही फायदा झाला नाही. सरकारने फक्त फसव्या घोषणा केल्या जनतेच्या पदरात प्रत्यक्षात निराशा आली. हे सरकार जनतेसाठी नव्हे तर मोजक्या लोकांसाठी काम करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत केला. शेतकरी, कामगार प्रश्नांवर आम्ही विरोधक म्हणून सभागृहात आवाज उठविला. मात्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मूग गिळून गप्प बसले, अशी टीका दानवे यांनी केली.

लोकपाल विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठविण्यात यावा, ही मागणी हिवाळी अधिवेशनात लावून धरली होती, अखेर ती आज मान्य झाली. १९ जणांची संयुक्त समिती आज स्थापन झाली आणि आता हे लोकपाल विधेयक तपासले जाणार आहे. विधानपरिषदेत ६ खासगी विधेयक मांडलेली मंजूर झाली, याचा विरोधी पक्षनेते या नात्याने अभिमान वाटत असल्याचे दानवे म्हणाले.एकीकडे गारपीठ अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असताना सरकारने शेतकऱ्यांना कोणताही दिलासा दिला नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठविला असताना संबंधित मंत्र्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले हे खेदजनक असल्याची प्रतिक्रिया दानवे यांनी व्यक्त केली.

सत्ताधारी आमदारांनी कायदा व सुव्यवस्थेचे दिंढोरे उडविले तरीही त्यांच्यावर कारवाई नाही मात्र विरोधकांवर नाहक खोटे गुन्हे दाखल करत असल्याचे दानवे म्हणाले. आज सभागृहात मांडण्यात आलेला गोसंवर्धन कायदयावर फार चर्चा झाली नाही, हा कायदा लागू करण्यामागे सरकारचा उद्देश काय असा सवाल करत या कायद्यालाही दानवे यांनी विरोध दर्शविला.

सरकारने गुढीपाडव्या निमित्त जारी केलेला ९६ टक्के आनंदाचा शिधा जिल्ह्याच्या ठिकाणी पोहचू शकला नाही. आता दिलेला आनंदाचा शिधा हा जास्त दराने दिला गेलाKज आहे. याची निविदा प्रक्रियाही झाली नाही. याच्या मागचं कारण काय असा प्रश्न दानवे यांनी सरकारला विचारला. या शिधाच्या माध्यमातून काही कंत्राटदार पोसण्याचं काम सरकार करतय असा गंभीर आरोप दानवे यांनी केला.

कॅगच्या अहवालप्रकरणी प्रशासनातील अधिकारी जबाबदार

आज सादर करण्यात आलेल्या कॅगच्या अहवालातील भ्रष्टाचाराला मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त जबाबदार आहे. तसेच आताचे मुख्यमंत्री हे तत्कालीन नगरविकास मंत्री होते. त्यामुळे याला प्रशासनातील अधिकारी जबाबदार असून त्यांच निलंबन केल पाहिजे. तसेच पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचीही चौकशी केली पाहिजे. सरकारकडून पक्षपातीपणा केला जात असल्याचा आरोप दानवे यांनी करत मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शिवसेनेला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दानवे म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; अरणगावच्या निकिताचा संघर्ष यशस्वी; मुंबई लोहमार्ग पोलीस दलात नियुक्ती

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील निकिता संतोष मखर हिने जिद्द,…

18 तास ago

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

2 दिवस ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

2 दिवस ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

2 दिवस ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

2 दिवस ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

2 दिवस ago