महाराष्ट्र

महायुती सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे गाजर दाखवायचं आणि तोंडाला पाने पुसायची

मुंबई: महायुती सरकारने जाहीर केलेला अर्थसंकल्प हा स्वप्न विकणारा, पण जमिनीवर कोणताही आधार नसलेला आहे. निवडणुकीपूर्वी मोठमोठी आश्वासने देऊन जनतेला फसवणाऱ्या सरकारने आता अर्थसंकल्पाच्या नावाने लोकांची दिशाभूल केली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे “नुसताच तोंडाचा पट्टा आणि काम शून्य” आहे.

शेतकऱ्यांसाठी मोठी थाप. कर्जमाफीचा फसवा ढोल निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देऊ म्हणणारे आता गप्प का?”हातातोंडाशी आलेला घास हिसकावला” अशी शेतकऱ्यांची अवस्था. हमीभाव आणि खरेदीबाबत सरकार गप्प!सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. हमीभाव वाढणार की नाही?सरकारी खरेदीची ग्वाही नव्हे, तर फक्त “भुलथापा”.

पीक विमा योजनांचा पोरखेळ शेतकऱ्यांच्या हक्काचा विमा मिळेल की नाही? की विमा कंपन्यांना फक्त फायदा?”नाव मोठे आणि लक्षण खोटे.

महिलांना दिलेली आश्वासने गटारात! “लाडकी बहिण” योजना फसवी! २१०० रुपये देण्याच्या घोषणेचा आता गजरा गायब!फक्त अटी वाढवल्या, पैसे मात्र हवेत विरले! महिलांच्या सुरक्षेचे काय?

अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ, पण सरकारला गप्प बसायला वेळ आहे.

“सिंहासन मिळालं की जनतेला विसरायचं” हेच धोरण! असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड.अमोल मातेले यांनी केला.

तरुणाईसाठी नोकऱ्या नाहीत, फक्त फसवणूक!रोजगार निर्मितीचा बट्ट्याबोळ लाखो युवकांना नोकरभरतीचं गाजर दाखवलं, पण आता ती भरतीच नाही.”हात दाखवून अवलक्षण” करणाऱ्या सरकारला जनतेने जागा दाखवायची वेळ आली!शिक्षणावर खर्च नाही, जाहिरातींवर कोटी!विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती नाही, पण जाहिरातींवर अब्जावधींचा खर्च!

“डोंगर पोखरला आणि उंदीर निघाला.

महाराष्ट्रात उद्योग येत नाहीत, उलट गुजरातला जातायत!सरकार कधी महाराष्ट्राच्या विकासासाठी लढणार

गुंतवणूकदारांचे पाठ फिरवणारे सरकार म्हणजे राज्याचा घात.

आरोग्य आणि मूलभूत सुविधांमध्ये सरकारचा बेबंद कारभार ग्रामीण आरोग्य केंद्रं ओसाड, औषधं नाहीत.

सरकारी हॉस्पिटल्समध्ये औषधं नाहीत, पण मंत्र्यांसाठी खासगी इस्पितळं तयार.

गरिबांच्या नशिबी भोपळाच

पाणी, वीज, रस्ते यांची वाट लागली

“एकविसाव्या शतकात महाराष्ट्र असूनही लोकांना प्यायला पाणी नाही – हे कोणत्या मुख्यमंत्र्याचे यश आहे. विकासाच्या नावाखाली केवळ जाहिराती आणि खोटी स्वप्नं दाखवली जातायय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवकचे मुंबई अध्यक्ष यांनी असे म्हटले महायुती सरकार म्हणजे “शब्द मोठे, पण कृती शून्य. राज्य चालवायला पैसा नाही, पण आश्वासने मात्र ढिगानं देतात. कष्टकरी जनतेला हक्काचं दान नाही, पण नेत्यांच्या फायद्यासाठी भरमसाट निधी. “गरिबांना थापा आणि श्रीमंतांना लाभ” हे धोरण आता पुरे. जनतेच्या घशात खडा आणि बड्या उद्योजकांच्या तिजोरीत मोती” हे धोरण महाराष्ट्र सहन करणार नाही. हा अर्थसंकल्प म्हणजे महायुती सरकारच्या अपयशाचा लेखाजोखा! आता वेळ आली आहे, सरकारला जबाबदारीला लावण्याची.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नसरापूर प्रकरणात वेगवान न्यायासाठी सरकार कटिबद्ध; कुटुंबाच्या पुनर्वसनाची हमी; डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या घटनेने राज्यभर संताप व्यक्त होत असताना,…

10 तास ago

विड्याचे पान सेवन करण्याची पद्धत

जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…

18 तास ago

कढीपत्त्यापासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर

बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…

18 तास ago

राज्यात जनगणना मोहिमेला सुरुवात; नागरिकांना ‘स्व-गणना’ची सुविधा

मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली…

18 तास ago

निष्ठा, समर्पण आणि साधेपणाचा वारसा: यशवंत हाप्पे यांना काँग्रेसची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ दादर येथील टिळक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात…

18 तास ago

चिमुरडीवरील अत्याचार-हत्येने पुणे हादरले; कायदा-सुव्यवस्था कोलमडली, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही…

18 तास ago