मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे. एकीकडे ज्येष्ठ नेते Sharad Pawar यांनी दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता फेटाळून लावली असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी मात्र मोठा दावा केला आहे.
संजय पवार यांनी एका खासगी कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पुणे आणि मुंबईमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. वाढलेल्या गाठीभेटी आणि घडणाऱ्या राजकीय हालचाली पाहता, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष पुढील सहा महिन्यांत एकत्र येतील. आगामी निवडणुका ‘घड्याळ’ या चिन्हावर लढवल्या जातील, असा दावा त्यांनी केला.
संजय पवार यांनी सांगितले की, अलीकडच्या काळात दोन्ही गटांतील नेत्यांमध्ये संवाद वाढला असून, त्यातून सकारात्मक संकेत मिळत आहेत. त्यामुळे विलिनीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचा त्यांचा दावा आहे.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी संजय पवार यांनी शरद पवार यांची भेट घेत त्यांच्या छायाचित्राचा पक्षाच्या बॅनरवर वापर करण्यासाठी लेखी परवानगी घेतली होती. त्यानंतर अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त लावलेल्या बॅनरवरही शरद पवार यांचा फोटो झळकला होता. या प्रकारावर पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी कोणताही आक्षेप घेतला नव्हता. त्यामुळे दोन्ही गटांतील संबंध सुधारत असल्याच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.
मात्र, या सर्व घडामोडींवर अद्याप दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. त्यामुळे संजय पवार यांचा दावा प्रत्यक्षात कितपत खरा ठरतो, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…
एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…
मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…
सातारा : राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा सहकार चळवळीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती…
मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेते सतीश पुळेकर यांची एकेकाळची गाजलेली मैत्री…
मुंबई: कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन झाले आहे आणि त्याचे नाव शिधापत्रिकेत (रेशन कार्ड) समाविष्ट करायचे…