महाराष्ट्र

विधेयकाचे योग्य संस्करण कायदा निर्मितीत अत्यंत आवश्यक बाब; डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे: एखाद्या विषयाबद्दल कायदा करायचा झाल्यास सध्या कायदा काय आहे त्यात काय बदल करायचे यावर विचारमंथन होते पूर्वी केंद्रात व राज्यात विधी आयोग असायचा विधी आयोगाच्या निर्देशानुसार कायदे तयार केले जावेत असा संकेत होता काही कारणाने राज्यांमधील विधी आयोग गुंडाळले गेले कायदा करताना सध्याच्या कायद्यात कुठे व काय त्रुटी जाणवतात, येथून सुरुवात होत असल्याचे निरीक्षण विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोठे यांनी नोंदविले.पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे ‘कायदा कसा तयार होतो?’ या विषयावर डॉ. गोऱ्हे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.

‘कोणताही कायदा विधिमंडळात रीतसर चर्चा, अभ्यास करूनच तयार केला जातो. काही केंद्रीय स्तरावर केले जातात, तर राज्य सुचीप्रमाणे राज्य आपल्या स्तरावर काही कायदे तयार करते. राज्याने कायदा केला, विधानसभा व विधानपरिषदेत तो मंजूर झाला, तरी तो केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठवावा लागतो. केंद्राच्या हरकती – सूचनांनुसार बदल केल्यानंतर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यानंतर कायदा अस्तित्वात येतो,’ असे सांगून डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ‘राज्याने मंजूर करून पाठवलेल्या विधेयकाला केंद्राकडून मान्यता मिळण्यास मोठा कालावधी लागतो. अनेक हरकती-सूचना येतात. त्यानुसार, कार्यवाही केली जाते. काही वेळा दोषी ठरविण्याबाबत किंवा शिक्षेबाबत बदलही करावे लागतात.

‘विधिमंडळात काही वेळा परिस्थितीनुसार, विधी आयोगाच्या सूचनेनुसार, सरकारच्या राजकीय निर्णयानुसार, न्यायालयाच्या आदेशानुसार नवे कायदे केले जातात. घटनात्मकदृष्ट्या गुंतागुंत नसलेली विधेयके मान्य होतात. आपण तयार करत असलेले विधेयक कायदेशीर कसोटीवर टिकेल, याची जबाबदारी विधी व न्याय विभागाची असते,’ असे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले. पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वप्नील बापट, खजिनदार अभिजित बारभाई यावेळी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कल्याण वाहतूक कोंडीवर उपाययोजना, सॅटीस प्रकल्पाला गती; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…

1 दिवस ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसचा भाजपावर हल्ला; चर्चेसाठी नरेंद्र मोदी यांनाही आणा; प्रणिती शिंदे

मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…

1 दिवस ago

मी उपमुख्यमंत्री नाही, भूमिपुत्र म्हणून आलो;  एकनाथ शिंदे

सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…

1 दिवस ago

नारी शक्ती वंदन की सत्ता शक्ती वंदन? महिला आरक्षणावरून भाजपवर टीका

मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…

2 दिवस ago

मुंबई युवक काँग्रेसचा SIR प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न; ‘गिग वर्कर्स न्याय अभियान’ पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…

2 दिवस ago

मोदींच्या भाषणावर वडेट्टीवारांचा हल्लाबोल; महिला आरक्षणावर भाजपवर ‘इव्हेंटबाजी’चा आरोप

नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…

2 दिवस ago