महाराष्ट्र

खानापूर–विटा तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचा झेंडा; जिल्हा परिषद–पंचायत समितीवर एकहाती सत्ता

सांगली: सांगली जिल्ह्यातील खानापूर–विटा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) ने ऐतिहासिक कामगिरी नोंदवत विरोधकांचा धुव्वा उडवला आहे. आमदार सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने खानापूर तालुक्यात एकहाती सत्ता मिळवत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

खानापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व ४ जागा आणि पंचायत समितीच्या सर्व ८ जागांवर शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला. या निकालामुळे तालुक्यातील राजकीय चित्र पूर्णपणे भगवेमय झाले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

विशेष म्हणजे नागेवाडी जिल्हा परिषद गटातून आमदार सुहास बाबर यांच्या वहिनी डॉ. शीतल बाबर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. या विजयामुळे खानापूर तालुक्यात ‘बाबर गटाची’ पकड किती मजबूत आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ठरली होती. आमदार सुहास बाबर यांच्या विरोधात भाजपचे वैभव पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी मोठी ताकद लावली होती. महायुतीतीलच या नेत्यांमध्ये झालेली थेट लढत तालुकाभर चर्चेचा विषय ठरली होती. मात्र, मतदारांनी सुहास बाबर यांच्या कामावर विश्वास टाकत भाजपला पूर्णपणे नाकारल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे.

आटपाडी निंबवडे गटात भाजपच्या माधवी पडळकर (आ. गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी) विरुद्ध शिवसेना शिंदे गटाच्या अ‍ॅड. विद्या मोटे यांच्यात चुरशीची लढत झाली.

भाजपला ‘व्हाईट वॉश’ दिल्यानंतर आमदार सुहास बाबर यांनी विटा शहरात शड्डू ठोकून जल्लोष केला. “हा विजय सर्वसामान्य जनतेचा आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आहे. कितीही युती झाली तरी खानापूरची जनता शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभी आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

खानापूरमधील या एकतर्फी निकालामुळे सांगली जिल्ह्याच्या राजकारणात आमदार सुहास बाबर यांचे वजन लक्षणीयरीत्या वाढले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर भगवा फडकल्याने तालुक्याच्या विकासाला आता अधिक वेग मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच, या विजयामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाची दावेदारी अधिक भक्कम झाल्याचे मानले जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिड महिन्यात दुसऱ्यांदा गोळीबार; पोलिसांचा धाक संपलाय का…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करडे परिसरात अवघ्या दिड महिन्याच्या कालावधीत गोळीबाराच्या दोन…

2 तास ago

घरातून रुसून निघालेल्या अल्पवयीन मुलाचा दौंड रेल्वे स्थानकावर सुखरूप शोध; समन्वयातून मोठी दुर्घटना टळली

दौंड: घरातून रुसून आंध्र प्रदेशातील रेणुगुंठा रेल्वे स्थानकावरून मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये बसून निघालेल्या पवन भाटी या…

4 तास ago

शिरूर! करडे गावात मध्यरात्री पिस्तुलातून तीन राऊंड फायर; गुन्हा दाखल; पाहा नावे…

सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…

10 तास ago

शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; करड्यात आठ जणांकडून तरुणावर गोळीबार

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…

18 तास ago

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

1 दिवस ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

1 दिवस ago