महाराष्ट्र

खानापूर–विटा तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचा झेंडा; जिल्हा परिषद–पंचायत समितीवर एकहाती सत्ता

सांगली: सांगली जिल्ह्यातील खानापूर–विटा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) ने ऐतिहासिक कामगिरी नोंदवत विरोधकांचा धुव्वा उडवला आहे. आमदार सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने खानापूर तालुक्यात एकहाती सत्ता मिळवत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

खानापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व ४ जागा आणि पंचायत समितीच्या सर्व ८ जागांवर शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला. या निकालामुळे तालुक्यातील राजकीय चित्र पूर्णपणे भगवेमय झाले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

विशेष म्हणजे नागेवाडी जिल्हा परिषद गटातून आमदार सुहास बाबर यांच्या वहिनी डॉ. शीतल बाबर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. या विजयामुळे खानापूर तालुक्यात ‘बाबर गटाची’ पकड किती मजबूत आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ठरली होती. आमदार सुहास बाबर यांच्या विरोधात भाजपचे वैभव पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी मोठी ताकद लावली होती. महायुतीतीलच या नेत्यांमध्ये झालेली थेट लढत तालुकाभर चर्चेचा विषय ठरली होती. मात्र, मतदारांनी सुहास बाबर यांच्या कामावर विश्वास टाकत भाजपला पूर्णपणे नाकारल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे.

आटपाडी निंबवडे गटात भाजपच्या माधवी पडळकर (आ. गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी) विरुद्ध शिवसेना शिंदे गटाच्या अ‍ॅड. विद्या मोटे यांच्यात चुरशीची लढत झाली.

भाजपला ‘व्हाईट वॉश’ दिल्यानंतर आमदार सुहास बाबर यांनी विटा शहरात शड्डू ठोकून जल्लोष केला. “हा विजय सर्वसामान्य जनतेचा आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आहे. कितीही युती झाली तरी खानापूरची जनता शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभी आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

खानापूरमधील या एकतर्फी निकालामुळे सांगली जिल्ह्याच्या राजकारणात आमदार सुहास बाबर यांचे वजन लक्षणीयरीत्या वाढले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर भगवा फडकल्याने तालुक्याच्या विकासाला आता अधिक वेग मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच, या विजयामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाची दावेदारी अधिक भक्कम झाल्याचे मानले जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

10 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

10 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

10 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

10 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

12 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

12 तास ago