मनोरंजन

ओटीटीवरील वादग्रस्त कंटेंटवर कडक नियमांची मागणी

‘घुसखोर पंडत’ आणि ‘देवखेळ’वरून राज्य–देशभरात संताप

मुंबई: ओटीटी प्लॅटफॉर्मवरील चित्रपट आणि वेबसीरिजबाबत कठोर नियमावली लागू करावी, अशी जोरदार मागणी देशभरातून होत आहे. नेटफ्लिक्सवरील ‘घुसखोर पंडत’ आणि झी ५ वरील ‘देवखेळ’ या वेबसीरिजभोवती निर्माण झालेल्या वादामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक संवेदनशीलता यातील समतोल पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नीरज पांडे दिग्दर्शित ‘घुसखोर पंडत’ या वेबसीरिजच्या शीर्षकावरून ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप होत असून उत्तर प्रदेशमध्ये या प्रकरणी तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या वेबसीरिजच्या निर्मात्यांविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी याचिका दिल्ली उच्च न्यायालयातही दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान, दिग्दर्शक नीरज पांडे यांनी ही वेबसीरिज पूर्णपणे काल्पनिक असून कोणत्याही जात, धर्म किंवा समुदायाचे प्रतिनिधित्व करत नसल्याचे स्पष्ट केले आहे. वाढता वाद लक्षात घेता सर्व प्रमोशनल साहित्य तात्पुरते काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. अभिनेता मनोज वाजपेयी यांनीही लोकांच्या भावना समजून घेत असल्याचे सांगत, ही कथा एका दोषपूर्ण व्यक्तीच्या आत्मज्ञानाच्या प्रवासावर आधारित असल्याचे स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे, महाराष्ट्रात झी ५ वरील ‘देवखेळ’ या वेबसीरिजवरून कोकणात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गुहागर परिसरातील नागरिक आणि सामाजिक संघटनांनी शिमगोत्सवातील पौराणिक व श्रद्धेचे प्रतीक असलेल्या संकासुर देवाचे अपमानास्पद चित्रण केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी गुहागर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून वेबसीरिजवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

आमदार भास्कर जाधव यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांना निवेदन देत ‘देवखेळ’वर कारवाईची मागणी केली आहे. याबाबत मंत्री आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही बंदीची मागणी केली आहे. तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देवतांचा अपमान करणाऱ्या बाबींवर योग्य ती कारवाई होईल, असे स्पष्ट केले आहे.

या दोन्ही प्रकरणांमुळे ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेंटवर नियंत्रण, स्क्रिप्ट व प्रमोशनल व्हिडिओंची तपासणी आणि स्पष्ट नियमावलीची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे लोकशाहीचे महत्त्वाचे अंग असले, तरी सामाजिक सद्भाव आणि श्रद्धांचा आदर राखणे तितकेच आवश्यक असल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरच्या करडे घाटात गोळीबार, विशाल काळेसोबत नेमकं काय घडलं…

शिरूर : शिरूर तालुक्यातील करडे घाटात दोन गुन्हेगार गटांच्या वादातून झालेल्या गोळीबारात विशाल सुनील काळे…

9 तास ago

सांस्कृतिक कार्य विभागातील संचालकपदाची नियुक्ती रखडली; मंत्रालयात चर्चांना उधाण

मुंबई: राज्याच्या सांस्कृतिक चळवळीला दिशा देणाऱ्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातील संचालकपद गेल्या दीड महिन्यांपासून रिक्त असल्याने…

13 तास ago

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा ‘गेम ओव्हर’…

पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…

17 तास ago

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

1 दिवस ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

2 दिवस ago

आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…

2 दिवस ago