मनोरंजन

ओटीटीवरील वादग्रस्त कंटेंटवर कडक नियमांची मागणी

‘घुसखोर पंडत’ आणि ‘देवखेळ’वरून राज्य–देशभरात संताप

मुंबई: ओटीटी प्लॅटफॉर्मवरील चित्रपट आणि वेबसीरिजबाबत कठोर नियमावली लागू करावी, अशी जोरदार मागणी देशभरातून होत आहे. नेटफ्लिक्सवरील ‘घुसखोर पंडत’ आणि झी ५ वरील ‘देवखेळ’ या वेबसीरिजभोवती निर्माण झालेल्या वादामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक संवेदनशीलता यातील समतोल पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नीरज पांडे दिग्दर्शित ‘घुसखोर पंडत’ या वेबसीरिजच्या शीर्षकावरून ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप होत असून उत्तर प्रदेशमध्ये या प्रकरणी तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या वेबसीरिजच्या निर्मात्यांविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी याचिका दिल्ली उच्च न्यायालयातही दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान, दिग्दर्शक नीरज पांडे यांनी ही वेबसीरिज पूर्णपणे काल्पनिक असून कोणत्याही जात, धर्म किंवा समुदायाचे प्रतिनिधित्व करत नसल्याचे स्पष्ट केले आहे. वाढता वाद लक्षात घेता सर्व प्रमोशनल साहित्य तात्पुरते काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. अभिनेता मनोज वाजपेयी यांनीही लोकांच्या भावना समजून घेत असल्याचे सांगत, ही कथा एका दोषपूर्ण व्यक्तीच्या आत्मज्ञानाच्या प्रवासावर आधारित असल्याचे स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे, महाराष्ट्रात झी ५ वरील ‘देवखेळ’ या वेबसीरिजवरून कोकणात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गुहागर परिसरातील नागरिक आणि सामाजिक संघटनांनी शिमगोत्सवातील पौराणिक व श्रद्धेचे प्रतीक असलेल्या संकासुर देवाचे अपमानास्पद चित्रण केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी गुहागर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून वेबसीरिजवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

आमदार भास्कर जाधव यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांना निवेदन देत ‘देवखेळ’वर कारवाईची मागणी केली आहे. याबाबत मंत्री आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही बंदीची मागणी केली आहे. तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देवतांचा अपमान करणाऱ्या बाबींवर योग्य ती कारवाई होईल, असे स्पष्ट केले आहे.

या दोन्ही प्रकरणांमुळे ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेंटवर नियंत्रण, स्क्रिप्ट व प्रमोशनल व्हिडिओंची तपासणी आणि स्पष्ट नियमावलीची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे लोकशाहीचे महत्त्वाचे अंग असले, तरी सामाजिक सद्भाव आणि श्रद्धांचा आदर राखणे तितकेच आवश्यक असल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिड महिन्यात दुसऱ्यांदा गोळीबार; पोलिसांचा धाक संपलाय का…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करडे परिसरात अवघ्या दिड महिन्याच्या कालावधीत गोळीबाराच्या दोन…

6 तास ago

घरातून रुसून निघालेल्या अल्पवयीन मुलाचा दौंड रेल्वे स्थानकावर सुखरूप शोध; समन्वयातून मोठी दुर्घटना टळली

दौंड: घरातून रुसून आंध्र प्रदेशातील रेणुगुंठा रेल्वे स्थानकावरून मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये बसून निघालेल्या पवन भाटी या…

8 तास ago

शिरूर! करडे गावात मध्यरात्री पिस्तुलातून तीन राऊंड फायर; गुन्हा दाखल; पाहा नावे…

सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…

14 तास ago

शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; करड्यात आठ जणांकडून तरुणावर गोळीबार

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…

22 तास ago

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

1 दिवस ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

1 दिवस ago