राजकीय

मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा क्लीन स्वीप; सुनील शेळके यांच्या नेतृत्वावर मतदारांचा शिक्कामोर्तब

मावळ: मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत यश मिळवत आपले संघटनात्मक वर्चस्व कायम ठेवले आहे. मावळ जिल्हा परिषदेच्या पाचही जागांवर आणि पंचायत समितीच्या सर्व दहा जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.

या निकालामुळे स्थानिक राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वावर मतदारांनी विश्वास टाकल्याचे स्पष्ट झाले आहे.

विजयानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आमदार सुनील शेळके भावूक झाले. “अजित पवार आज हयात असते तर मावळमध्ये मोठा विजयोत्सव साजरा झाला असता. मात्र त्यांच्या अनुपस्थितीत हा विजय साजरा करताना मनात वेदना आहेत,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मावळच्या विकासासाठी अजित पवार यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला, अनेक प्रकल्पांना गती दिली आणि त्याच विकासकामांची पावती मतदारांनी या निकालातून दिली, असे शेळके म्हणाले.

दरम्यान, सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी जिल्हा परिषद गटातूनही राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले आहे. येथून विनायक मासाळ यांनी विजय मिळवला. उमेदवारी जाहीर करताना अजित पवार यांनी स्वतः मार्गदर्शन केले होते. मात्र आज हा विजय पाहण्यासाठी ते हयात नसल्याची खंत असल्याची भावना मासाळ यांनी व्यक्त केली.

मावळसह परिसरातील या निकालांमुळे अजित पवार यांच्या निधनानंतरही त्यांच्या गटाची स्थानिक पातळीवरील पकड मजबूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी स्थानिक व प्रादेशिक राजकारणावर या विजयाचा प्रभाव पडण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

11 तास ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

20 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

21 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

22 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

1 दिवस ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

1 दिवस ago