औरंगाबाद: खडतर शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. परिश्रम, सखोल अभ्यास, नियोजन आणि कुशाग्र बुध्दीच्या जोरावर परीक्षा पास झालेल्या भावी गुरुजींना प्रमाणपत्राची सहा महिन्यांपासून प्रतीक्षा होती. अखेर आता सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
सेवेत राहण्यासाठी TET अनिवार्य
सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्पष्ट केले आहे की, सेवेत राहण्यासाठी किंवा पदोन्नतीसाठी शिक्षकांनी TET परीक्षा देणे आणि उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र आणि तामिळनाडूसह अनेक राज्यांनी दाखल केलेल्या याचिकांवर हा निकाल देण्यात आला आहे.
TET परीक्षेचे महत्त्व
२०१० मध्ये राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (NCTE) इयत्ता १ ते ८ वीपर्यंतच्या शिक्षकांच्या नियुक्तीसाठी किमान शैक्षणिक पात्रतेचा नियम केला. त्यानंतरच TET परीक्षा सुरू करण्यात आली. या परीक्षेत उत्तीर्ण होणे हे शिक्षकांसाठी आवश्यक ठरले.
पाच वर्षे उरलेल्या शिक्षकांना सूट
न्यायालयाने म्हटले आहे की, ज्या शिक्षकांना निवृत्त होण्यासाठी फक्त 5 वर्षे उरली आहेत, त्यांना परीक्षा न देता सेवा पूर्ण करता येईल.
पण ज्यांच्याकडे 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधी शिल्लक आहे, त्यांनी TET पास करणे अनिवार्य आहे.
अन्यथा राजीनामा द्यावा लागणार
ज्या शिक्षकांना TET परीक्षा पास करणे शक्य होणार नाही, त्यांना दोनच पर्याय राहतील.
राजीनामा देणे
सक्तीची निवृत्ती स्वीकारणे आणि फायदे घेणे
मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…
मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…
नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…
पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…
मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…
पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…