महाराष्ट्र

…त्यांनी महाराष्ट्राचा अपमान केलाय त्यांच्यावर गंभीर दखल घेऊन कारवाई व्हावी

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे मुख्यमंत्र्यांविषयीचे विधान बेजबाबदारपणाचे 

मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औरंगजेबाशी तुलना करणारे विधान केले होते. त्यांच्या या विधानाचे पडसाद आज विधानपरिषदेत उमटले. भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आक्रमक भुमिका घेत हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची तुलना औरंगजेबशी करून महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी केली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या वक्तव्याचा समाचार घेत आ. दरेकर म्हणाले कि, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उत्तम प्रशासक म्हणून महाराष्ट्राने गेल्या ५ वर्षांत पाहिलेय. आजही राज्याचा कारभार उत्तम चालवत असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांनी देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी केली. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. हा फडणवीस यांचा व्यक्तिगत अपमान नाही तर महाराष्ट्र देशाला आदर्श ठरणारे, दिशा दाखविणारे राज्य आहे. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत अशा प्रकारचे बेजबाबदार वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष करत असतील तर त्याचा मी जाहीर निषेध करतो. याची सभागृहाने गंभीर दखल घेऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर समज किंवा कारवाई करण्याची आवश्यकता आहे. तसेच त्यांचे वक्तव्य राज्याच्या मुख्यमंत्र्यांविषयी असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही केली.

दरम्यान, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेलं वक्तव्य निदर्शनास आले तर नियमाप्रमाणे कारवाई होईल, शासनाने गंभीर दखल घेतली आहे, असे उत्तर दिले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

8 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

14 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

14 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

14 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

14 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

1 दिवस ago