महाराष्ट्र

…त्यांनी महाराष्ट्राचा अपमान केलाय त्यांच्यावर गंभीर दखल घेऊन कारवाई व्हावी

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे मुख्यमंत्र्यांविषयीचे विधान बेजबाबदारपणाचे 

मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औरंगजेबाशी तुलना करणारे विधान केले होते. त्यांच्या या विधानाचे पडसाद आज विधानपरिषदेत उमटले. भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आक्रमक भुमिका घेत हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची तुलना औरंगजेबशी करून महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी केली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या वक्तव्याचा समाचार घेत आ. दरेकर म्हणाले कि, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उत्तम प्रशासक म्हणून महाराष्ट्राने गेल्या ५ वर्षांत पाहिलेय. आजही राज्याचा कारभार उत्तम चालवत असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांनी देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी केली. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. हा फडणवीस यांचा व्यक्तिगत अपमान नाही तर महाराष्ट्र देशाला आदर्श ठरणारे, दिशा दाखविणारे राज्य आहे. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत अशा प्रकारचे बेजबाबदार वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष करत असतील तर त्याचा मी जाहीर निषेध करतो. याची सभागृहाने गंभीर दखल घेऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर समज किंवा कारवाई करण्याची आवश्यकता आहे. तसेच त्यांचे वक्तव्य राज्याच्या मुख्यमंत्र्यांविषयी असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही केली.

दरम्यान, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेलं वक्तव्य निदर्शनास आले तर नियमाप्रमाणे कारवाई होईल, शासनाने गंभीर दखल घेतली आहे, असे उत्तर दिले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

6 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

6 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

6 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

6 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

6 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

6 तास ago