महाराष्ट्र

शेतावरचा रस्ता रोखणाऱ्यांची ‘वाट’ लागली, वहीवाटीत वाहनानुसार रस्ता द्यावाच लागणार….

मुंबई: शेतकऱ्यांच्या शेतावरील वहीवाटीचा रस्ता काही कारणास्तव अडवला गेलेला आहे, त्यांना दिलासा देणारी बातमी आहे, तर ज्यांनी शेतीवरच्या वाटा रोखून धरल्या आहेत, अशांना मोठा दणका मिळणार आहे. कारण वहीवाटीत वाहन वापरानुसार रस्ता द्यावा लागणार आहे. रस्ता तयार करण्यासंबंधीचा निर्णय तहसीलदारांना घेता यावा यासाठी ‘गाइडलाइन्स’ प्रसिद्ध करण्याच्या सूचना सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्या आहेत.

महत्त्वाचे मुद्दे

वाहनानुसार रस्त्यांचा विस्तार:

आधुनिक शेतीतील यंत्रांसाठी मोठ्या वाहनांचा वापर वाढल्यामुळे अरुंद रस्त्यांमुळे होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी रस्ते वाहन प्रकारानुसार तयार करणे अनिवार्य केले जाणार आहे.

तहसीलदारांना अधिकार

रस्ते तयार करण्याचा अंतिम निर्णय तहसीलदार घेऊ शकतील. यामुळे तक्रारींच्या प्रक्रियेत वेग येईल.

शेत रस्त्यांचे वर्गीकरण आणि नोंदणी

शासनाने शेत रस्त्यांचे वर्गीकरणकरून त्यांना क्रमांक देण्याचे निर्देश दिले आहेत.

शेतजमिनीच्या खरेदी-विक्री दस्तांमध्ये रस्त्यांचा समावेश बंधनकारक केला जाणार आहे.

शेत रस्त्यांची नोंदणी ७/१२ उताऱ्यात इतर हक्कांमध्ये केली जाईल.

तक्रार निवारण प्रक्रियेत सुधारणा 

तक्रारी तहसीलदारांकडे दाखल करून अपीलसाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे जाता येईल.

थेट उच्च न्यायालयात अपील करण्याआधी स्थानिक स्तरावरच प्रश्न सुटण्याची सोय केली जाईल.

बैठकीतील महत्त्वाचे मान्यवर

महसूल मंत्री: चंद्रशेखर बावनकुळे

कृषी व वित्त नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल

आमदार: अभिमन्यू पवार

महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार

सहसचिव अजित देशमुख

शेतकऱ्यांना होणारे फायदे 

रस्ते अरुंद असल्याने होणाऱ्या अडचणी दूर होतील.

वाहतूक सुलभ होईल.

शेत रस्त्यांची सुरक्षितता वाढेल.

तक्रार निवारण प्रक्रिया जलदगतीने पार पडेल.

शेतकऱ्यांचा मार्ग सुकर होणार

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या शेतीसाठीच्या रस्त्यांचे व्यवस्थापन सुकर होईल.

रस्त्यांच्या व्यवस्थापनात आलेल्या या बदलामुळे शेतकऱ्यांना न्याय आणि सुविधा मिळणार आहेत.

सरकारच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांची वाट अधिक सुकर होणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

11 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

11 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

11 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

11 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

16 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

16 तास ago