मुंबई: बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५% राखीव जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी २०२५ आहे.
अर्जासाठी पात्र शाळा:
स्वयंअर्थसहाय्यित शाळा
विनाअनुदानित शाळा
पोलिस कल्याणकारी शाळा
महानगरपालिका (स्वयंअर्थसहाय्यित) शाळा
ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया
पालकांनी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर जाऊन आवश्यक माहिती भरावी. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत.
आरटीई प्रवेशासाठी पात्रता:
अनुसूचित जाती (SC)
अनुसूचित जमाती (ST)
विमुक्त जाती (VJ)
भटक्या जाती (NT)
इतर मागासवर्ग (OBC)
विशेष मागासवर्ग (SBC)
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक
सामाजिकदृष्ट्या मागास घटक
अनाथ बालके
एचआयव्ही बाधित/प्रभावित बालके
दिव्यांग बालके
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे:
बालकाचे ओळखपत्र (आधार कार्ड किंवा जन्म प्रमाणपत्र)
पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र
निवासी प्रमाणपत्र
जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
बालक दिव्यांग असल्यास त्याचा प्रमाणपत्र
इतर आवश्यक कागदपत्रे
महत्त्वाच्या तारखा
अर्जाची सुरुवात: १४ जानेवारी २०२५
अर्जाची शेवटची तारीख: २७ जानेवारी २०२५
लक्षात ठेवा
अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील. कागदपत्रांची पडताळणी पूर्ण व अचूक करा. अर्ज करण्यासाठी शेवटच्या तारखेपूर्वी प्रक्रिया पूर्ण करा.
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…
मुंबई: राज्यातील वाढत्या ड्रग्ज प्रकरणांवरून काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन…